शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

रेती उत्खननामुळे पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:15 IST

बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरातील माचनूर, गंजगाव, कार्ला (बु.), येसगी, बोळेगाव, सगरोळी येथील मांजरा नदीपात्रातील घाटातून रेती उत्खननाची परवानगी दिली आहे़ त्यामुळे बिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात आला आहे़

ठळक मुद्देमांजरा नदीपात्रातील रेती उत्खननास परवानगीबिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

सगरोळी : बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरातील माचनूर, गंजगाव, कार्ला (बु.), येसगी, बोळेगाव, सगरोळी येथील मांजरा नदीपात्रातील घाटातून रेती उत्खननाची परवानगी दिली आहे़ त्यामुळे बिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात आला आहे़मांजरा नदीपात्रातील विहिरींद्वारे १२ किमी अंतरावर असलेल्या बिलोली शहरासह जवळपास ५० किमी क्षेत्रात असलेल्या सगरोळी परिसरासह बडूर हिंगणी, चिंचाळा, लघूळ, बोळेगाव या पाच गावांची तहान भागविली जाते. या ठिकाणाहून रेती उत्खननामुळे या सर्व गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. सार्वजनिक पाणीपुरवठा ठिकाणापासून काही अंतरावर रेती उत्खननास परवानगी देऊ नये, असा नियम असतानाही रेती उत्खननाची परवानगी दिल्याने पर्यावरण क्षेत्रातील काही व्यक्ती, संस्थाकडून नाराजी व्यक्त होत आहे.सगरोळीसह परिसरातील मांजरा नदीपात्रात बोळेगाव हद्दीतील ३३५ गट नंबरमध्ये बिलोली शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या चार तर बडूर विभागातील पाच गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत दोन अशा एकूण सहा विहिरींद्वारे पाणीपुरवठा होतो.कार्ला बु., नागणी, माचनूर, गंजगाव, सगरोळी मांजरा नदीपात्रातून त्या- त्या गावासह तालुक्यातील एक लाख लोकांची तहान भागविली जाते. १५ वर्षांपासून मांजरा नदी पात्रातील याच गावातील वाळू घाटातून बेसुमार रेती उत्खनन होत आहे.नदीतील जलचर , वनस्पती झाल्या नष्टनियमित रेती उत्खननामुळे नदीचे पात्र बदलले असून नदीतील जलचर तथा आवश्यक असणाऱ्या वनस्पती नष्ट झाल्या असून त्याची जागा आता काटेरी, विषारी व अनावश्यक वनस्पतींनी घेतली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राचे जैविक व रासायनिक पाणी परीक्षण अहवाल पाहिल्यास पाण्यामध्ये नायट्रेट, फ्लोराईड व टीडीएस मोठ्या प्रमाणात असून हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालात स्पष्ट दिसून येते. परिसरातील पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वीच जाहीर केले असून दूषित पाण्यामुळे परिसरात फ्लोरोसिस आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याचेही शासकीय रुग्णालयांच्या आकडेवाडीवरून स्पष्ट होते.पाणीटंचाईस कोण जबाबदार ?बिलोली शहरासह इतर ठिकाणी होणा-या पाणी पुरवठ्याच्या विहिरी बिलोली नगर परिषद तर सगरोळी व बडूर विभाग पाणीपुरवठ्याच्या विहिरी या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मालकीच्या आहेत. रेती उत्खननाचा वाईट परिणाम भविष्यात पाणीपुरवठ्यावर झाला तर त्यास जबाबदार कोण? हा प्रश्न असून यासाठी ग्रामपंचायत, नगर परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने रेती उत्खननास विरोध करावा, परंतु तसे होताना दिसत नाही.

टॅग्स :Nandedनांदेडsandवाळूwater shortageपाणीटंचाई