शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

रेती उत्खननामुळे पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:15 IST

बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरातील माचनूर, गंजगाव, कार्ला (बु.), येसगी, बोळेगाव, सगरोळी येथील मांजरा नदीपात्रातील घाटातून रेती उत्खननाची परवानगी दिली आहे़ त्यामुळे बिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात आला आहे़

ठळक मुद्देमांजरा नदीपात्रातील रेती उत्खननास परवानगीबिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

सगरोळी : बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरातील माचनूर, गंजगाव, कार्ला (बु.), येसगी, बोळेगाव, सगरोळी येथील मांजरा नदीपात्रातील घाटातून रेती उत्खननाची परवानगी दिली आहे़ त्यामुळे बिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात आला आहे़मांजरा नदीपात्रातील विहिरींद्वारे १२ किमी अंतरावर असलेल्या बिलोली शहरासह जवळपास ५० किमी क्षेत्रात असलेल्या सगरोळी परिसरासह बडूर हिंगणी, चिंचाळा, लघूळ, बोळेगाव या पाच गावांची तहान भागविली जाते. या ठिकाणाहून रेती उत्खननामुळे या सर्व गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. सार्वजनिक पाणीपुरवठा ठिकाणापासून काही अंतरावर रेती उत्खननास परवानगी देऊ नये, असा नियम असतानाही रेती उत्खननाची परवानगी दिल्याने पर्यावरण क्षेत्रातील काही व्यक्ती, संस्थाकडून नाराजी व्यक्त होत आहे.सगरोळीसह परिसरातील मांजरा नदीपात्रात बोळेगाव हद्दीतील ३३५ गट नंबरमध्ये बिलोली शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या चार तर बडूर विभागातील पाच गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत दोन अशा एकूण सहा विहिरींद्वारे पाणीपुरवठा होतो.कार्ला बु., नागणी, माचनूर, गंजगाव, सगरोळी मांजरा नदीपात्रातून त्या- त्या गावासह तालुक्यातील एक लाख लोकांची तहान भागविली जाते. १५ वर्षांपासून मांजरा नदी पात्रातील याच गावातील वाळू घाटातून बेसुमार रेती उत्खनन होत आहे.नदीतील जलचर , वनस्पती झाल्या नष्टनियमित रेती उत्खननामुळे नदीचे पात्र बदलले असून नदीतील जलचर तथा आवश्यक असणाऱ्या वनस्पती नष्ट झाल्या असून त्याची जागा आता काटेरी, विषारी व अनावश्यक वनस्पतींनी घेतली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राचे जैविक व रासायनिक पाणी परीक्षण अहवाल पाहिल्यास पाण्यामध्ये नायट्रेट, फ्लोराईड व टीडीएस मोठ्या प्रमाणात असून हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालात स्पष्ट दिसून येते. परिसरातील पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वीच जाहीर केले असून दूषित पाण्यामुळे परिसरात फ्लोरोसिस आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याचेही शासकीय रुग्णालयांच्या आकडेवाडीवरून स्पष्ट होते.पाणीटंचाईस कोण जबाबदार ?बिलोली शहरासह इतर ठिकाणी होणा-या पाणी पुरवठ्याच्या विहिरी बिलोली नगर परिषद तर सगरोळी व बडूर विभाग पाणीपुरवठ्याच्या विहिरी या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मालकीच्या आहेत. रेती उत्खननाचा वाईट परिणाम भविष्यात पाणीपुरवठ्यावर झाला तर त्यास जबाबदार कोण? हा प्रश्न असून यासाठी ग्रामपंचायत, नगर परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने रेती उत्खननास विरोध करावा, परंतु तसे होताना दिसत नाही.

टॅग्स :Nandedनांदेडsandवाळूwater shortageपाणीटंचाई