शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

रेती उत्खननामुळे पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:15 IST

बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरातील माचनूर, गंजगाव, कार्ला (बु.), येसगी, बोळेगाव, सगरोळी येथील मांजरा नदीपात्रातील घाटातून रेती उत्खननाची परवानगी दिली आहे़ त्यामुळे बिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात आला आहे़

ठळक मुद्देमांजरा नदीपात्रातील रेती उत्खननास परवानगीबिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

सगरोळी : बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरातील माचनूर, गंजगाव, कार्ला (बु.), येसगी, बोळेगाव, सगरोळी येथील मांजरा नदीपात्रातील घाटातून रेती उत्खननाची परवानगी दिली आहे़ त्यामुळे बिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात आला आहे़मांजरा नदीपात्रातील विहिरींद्वारे १२ किमी अंतरावर असलेल्या बिलोली शहरासह जवळपास ५० किमी क्षेत्रात असलेल्या सगरोळी परिसरासह बडूर हिंगणी, चिंचाळा, लघूळ, बोळेगाव या पाच गावांची तहान भागविली जाते. या ठिकाणाहून रेती उत्खननामुळे या सर्व गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. सार्वजनिक पाणीपुरवठा ठिकाणापासून काही अंतरावर रेती उत्खननास परवानगी देऊ नये, असा नियम असतानाही रेती उत्खननाची परवानगी दिल्याने पर्यावरण क्षेत्रातील काही व्यक्ती, संस्थाकडून नाराजी व्यक्त होत आहे.सगरोळीसह परिसरातील मांजरा नदीपात्रात बोळेगाव हद्दीतील ३३५ गट नंबरमध्ये बिलोली शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या चार तर बडूर विभागातील पाच गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत दोन अशा एकूण सहा विहिरींद्वारे पाणीपुरवठा होतो.कार्ला बु., नागणी, माचनूर, गंजगाव, सगरोळी मांजरा नदीपात्रातून त्या- त्या गावासह तालुक्यातील एक लाख लोकांची तहान भागविली जाते. १५ वर्षांपासून मांजरा नदी पात्रातील याच गावातील वाळू घाटातून बेसुमार रेती उत्खनन होत आहे.नदीतील जलचर , वनस्पती झाल्या नष्टनियमित रेती उत्खननामुळे नदीचे पात्र बदलले असून नदीतील जलचर तथा आवश्यक असणाऱ्या वनस्पती नष्ट झाल्या असून त्याची जागा आता काटेरी, विषारी व अनावश्यक वनस्पतींनी घेतली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राचे जैविक व रासायनिक पाणी परीक्षण अहवाल पाहिल्यास पाण्यामध्ये नायट्रेट, फ्लोराईड व टीडीएस मोठ्या प्रमाणात असून हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालात स्पष्ट दिसून येते. परिसरातील पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वीच जाहीर केले असून दूषित पाण्यामुळे परिसरात फ्लोरोसिस आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याचेही शासकीय रुग्णालयांच्या आकडेवाडीवरून स्पष्ट होते.पाणीटंचाईस कोण जबाबदार ?बिलोली शहरासह इतर ठिकाणी होणा-या पाणी पुरवठ्याच्या विहिरी बिलोली नगर परिषद तर सगरोळी व बडूर विभाग पाणीपुरवठ्याच्या विहिरी या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मालकीच्या आहेत. रेती उत्खननाचा वाईट परिणाम भविष्यात पाणीपुरवठ्यावर झाला तर त्यास जबाबदार कोण? हा प्रश्न असून यासाठी ग्रामपंचायत, नगर परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने रेती उत्खननास विरोध करावा, परंतु तसे होताना दिसत नाही.

टॅग्स :Nandedनांदेडsandवाळूwater shortageपाणीटंचाई