शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

किनवट तालुक्यात ५० गावांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:55 IST

तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे. नदी, नाले कोरडे पडले असून प्रकल्पातील साठ्यात घट होत असल्याने तालुक्यातील ५० हून अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ सर्वाधिक टंचाईची झळ मांडवी, उमरी (बा़) सर्कलमध्ये बसू लागल्याचे चित्र आहे़

ठळक मुद्देमांडवी, उमरी सर्कलला फटका : विहीर, बोअर अधिग्रहणाचे ७० प्रस्ताव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे. नदी, नाले कोरडे पडले असून प्रकल्पातील साठ्यात घट होत असल्याने तालुक्यातील ५० हून अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ सर्वाधिक टंचाईची झळ मांडवी, उमरी (बा़) सर्कलमध्ये बसू लागल्याचे चित्र आहे़किनवट या डोंगराळ तालुक्यात १९१ महसुली गावे, १०५ वाडी-तांडे असून १३४ ग्रामपंचायती आहेत़ तालुक्याची वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी १ हजार २४० मि़मी़ इतकी असताना २०१७ च्या पावसाळ्यात ५६० मि़मी़ म्हणजे ४५ टक्के इतकाच पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश नाले पावसाळ्यातच कोरडे पडले़ प्रकल्पातही पाणीसाठा झालाच नाही़ पावसाळ्यात भूगर्भाची पातळी वर आलीच नाही़ त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच काही गावांना टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली़ संभाव्य पाणीटंचाईचे संकट उद्भवू नये व त्यावर उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने पंचायत समितीने तात्काळ टंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवून मंजुरी मिळवून घेतली़विहीर, बोअर अधिग्रहणाचे ७० प्रस्ताव पं़ स़ च्या पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाले़ त्यापैकी ४३ प्रस्ताव तहसीलला पाठविले़ त्यातील चार प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे़ पाथरी, उमरी बा़, वडोली, निराळा तांडा, पळशी, अंबाडी, टेंभी, निराळा, सारखणी, मानातांडा, गोंडे महागाव, निचपूर, मार्लागुंडा, दरसांगवी (चि़), मोहाडा, लिंगी, नागझरी, रोडानातांडा, अंबाडी तांडा, सिरपूर, दुंड्रा, दीपलाना तांडा, चिंचखेड, रामपूर, नंदगाव, भिसी, तोटंबा, दिग्रस, मलकजांबतांडा, वाळकी बु़, सालाईगुडा, दयालधानोरा, कनकवाडी, नागापूर, कोपरा, सावरगाव, इरेगाव, बोधडी खु़, तल्हारी, कमठाला, मारेगाव खा़सह त्या-त्या ग्रा.प.अंतर्गत येणाऱ्या वस्त्यांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आल्याने तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे़६४७ पैकी ६३० हातपंप सुरूतालुक्यात ६४७ हातपंप असून त्यातील ६३० सुरू आहेत़ मात्र पाणीच नसल्याने ४० हातपंप बंद आहेत़ ३५ हातपंप नादुरुस्त आहेत़ नादुरुस्त हातपंप दुरुस्तीचे काम पाणीपुरवठा विभागाने सुरु केले आहे़ धानोरा सी़ व मारेगाव (वरचे) या दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईriverनदी