शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

किनवट तालुक्यात ५० गावांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:55 IST

तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे. नदी, नाले कोरडे पडले असून प्रकल्पातील साठ्यात घट होत असल्याने तालुक्यातील ५० हून अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ सर्वाधिक टंचाईची झळ मांडवी, उमरी (बा़) सर्कलमध्ये बसू लागल्याचे चित्र आहे़

ठळक मुद्देमांडवी, उमरी सर्कलला फटका : विहीर, बोअर अधिग्रहणाचे ७० प्रस्ताव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे. नदी, नाले कोरडे पडले असून प्रकल्पातील साठ्यात घट होत असल्याने तालुक्यातील ५० हून अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ सर्वाधिक टंचाईची झळ मांडवी, उमरी (बा़) सर्कलमध्ये बसू लागल्याचे चित्र आहे़किनवट या डोंगराळ तालुक्यात १९१ महसुली गावे, १०५ वाडी-तांडे असून १३४ ग्रामपंचायती आहेत़ तालुक्याची वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी १ हजार २४० मि़मी़ इतकी असताना २०१७ च्या पावसाळ्यात ५६० मि़मी़ म्हणजे ४५ टक्के इतकाच पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश नाले पावसाळ्यातच कोरडे पडले़ प्रकल्पातही पाणीसाठा झालाच नाही़ पावसाळ्यात भूगर्भाची पातळी वर आलीच नाही़ त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच काही गावांना टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली़ संभाव्य पाणीटंचाईचे संकट उद्भवू नये व त्यावर उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने पंचायत समितीने तात्काळ टंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवून मंजुरी मिळवून घेतली़विहीर, बोअर अधिग्रहणाचे ७० प्रस्ताव पं़ स़ च्या पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाले़ त्यापैकी ४३ प्रस्ताव तहसीलला पाठविले़ त्यातील चार प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे़ पाथरी, उमरी बा़, वडोली, निराळा तांडा, पळशी, अंबाडी, टेंभी, निराळा, सारखणी, मानातांडा, गोंडे महागाव, निचपूर, मार्लागुंडा, दरसांगवी (चि़), मोहाडा, लिंगी, नागझरी, रोडानातांडा, अंबाडी तांडा, सिरपूर, दुंड्रा, दीपलाना तांडा, चिंचखेड, रामपूर, नंदगाव, भिसी, तोटंबा, दिग्रस, मलकजांबतांडा, वाळकी बु़, सालाईगुडा, दयालधानोरा, कनकवाडी, नागापूर, कोपरा, सावरगाव, इरेगाव, बोधडी खु़, तल्हारी, कमठाला, मारेगाव खा़सह त्या-त्या ग्रा.प.अंतर्गत येणाऱ्या वस्त्यांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आल्याने तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे़६४७ पैकी ६३० हातपंप सुरूतालुक्यात ६४७ हातपंप असून त्यातील ६३० सुरू आहेत़ मात्र पाणीच नसल्याने ४० हातपंप बंद आहेत़ ३५ हातपंप नादुरुस्त आहेत़ नादुरुस्त हातपंप दुरुस्तीचे काम पाणीपुरवठा विभागाने सुरु केले आहे़ धानोरा सी़ व मारेगाव (वरचे) या दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईriverनदी