शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

किनवट तालुक्यात ५० गावांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:55 IST

तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे. नदी, नाले कोरडे पडले असून प्रकल्पातील साठ्यात घट होत असल्याने तालुक्यातील ५० हून अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ सर्वाधिक टंचाईची झळ मांडवी, उमरी (बा़) सर्कलमध्ये बसू लागल्याचे चित्र आहे़

ठळक मुद्देमांडवी, उमरी सर्कलला फटका : विहीर, बोअर अधिग्रहणाचे ७० प्रस्ताव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे. नदी, नाले कोरडे पडले असून प्रकल्पातील साठ्यात घट होत असल्याने तालुक्यातील ५० हून अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ सर्वाधिक टंचाईची झळ मांडवी, उमरी (बा़) सर्कलमध्ये बसू लागल्याचे चित्र आहे़किनवट या डोंगराळ तालुक्यात १९१ महसुली गावे, १०५ वाडी-तांडे असून १३४ ग्रामपंचायती आहेत़ तालुक्याची वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी १ हजार २४० मि़मी़ इतकी असताना २०१७ च्या पावसाळ्यात ५६० मि़मी़ म्हणजे ४५ टक्के इतकाच पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश नाले पावसाळ्यातच कोरडे पडले़ प्रकल्पातही पाणीसाठा झालाच नाही़ पावसाळ्यात भूगर्भाची पातळी वर आलीच नाही़ त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच काही गावांना टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली़ संभाव्य पाणीटंचाईचे संकट उद्भवू नये व त्यावर उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने पंचायत समितीने तात्काळ टंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवून मंजुरी मिळवून घेतली़विहीर, बोअर अधिग्रहणाचे ७० प्रस्ताव पं़ स़ च्या पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाले़ त्यापैकी ४३ प्रस्ताव तहसीलला पाठविले़ त्यातील चार प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे़ पाथरी, उमरी बा़, वडोली, निराळा तांडा, पळशी, अंबाडी, टेंभी, निराळा, सारखणी, मानातांडा, गोंडे महागाव, निचपूर, मार्लागुंडा, दरसांगवी (चि़), मोहाडा, लिंगी, नागझरी, रोडानातांडा, अंबाडी तांडा, सिरपूर, दुंड्रा, दीपलाना तांडा, चिंचखेड, रामपूर, नंदगाव, भिसी, तोटंबा, दिग्रस, मलकजांबतांडा, वाळकी बु़, सालाईगुडा, दयालधानोरा, कनकवाडी, नागापूर, कोपरा, सावरगाव, इरेगाव, बोधडी खु़, तल्हारी, कमठाला, मारेगाव खा़सह त्या-त्या ग्रा.प.अंतर्गत येणाऱ्या वस्त्यांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आल्याने तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे़६४७ पैकी ६३० हातपंप सुरूतालुक्यात ६४७ हातपंप असून त्यातील ६३० सुरू आहेत़ मात्र पाणीच नसल्याने ४० हातपंप बंद आहेत़ ३५ हातपंप नादुरुस्त आहेत़ नादुरुस्त हातपंप दुरुस्तीचे काम पाणीपुरवठा विभागाने सुरु केले आहे़ धानोरा सी़ व मारेगाव (वरचे) या दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईriverनदी