शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

अडीच हजार वीजपंपांद्वारे पाणी उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:00 IST

प्रकल्पातील जलसाठा प्रतिदिन ०.७५ दलघमी कमी होत आहे. याच वेगात पाणी उपसा राहिल्यास फेब्रुवारीमध्येच विष्णूपुरी कोरडे पडणार आहे.

ठळक मुद्देविष्णूपुरी गाठणार तळ १ हजार ३७ विद्युत पंप अनधिकृत, बेसुमार उपसा सुरुच

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातून आजघडीला अडीच हजार विद्युत पंपांद्वारे पाण्याचा उपसा सुरू असून यामध्ये १ हजारांहून अधिक विद्युत पंप अनधिकृत आहेत. प्रकल्पातील जलसाठा प्रतिदिन ०.७५ दलघमी कमी होत आहे. याच वेगात पाणी उपसा राहिल्यास फेब्रुवारीमध्येच विष्णूपुरी कोरडे पडणार आहे.शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पावर नांदेड शहराची पिण्याच्या पाण्याची मदार आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे पहिल्यांदाच पिण्याच्या पाण्यासाठी नांदेडला २७ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले होते. मात्र यामध्ये ३ दलघमीची वाढ करुन हे आरक्षण ३० दलघमी इतके झाले. यावर्षी दुष्काळाची परिस्थिती आहे. जुलै २०१९ पर्यंत नांदेड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा संतुलित व पुरेशा प्रमाणात होण्याच्या दृष्टिकोणातून प्रकल्पातील साठा संरक्षित करण्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात होत असलेला पाणी उपसा लक्षात घेवून पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत अवैध पाणी उपसा रोखण्याची विनंती केली. विष्णूपुरी जलाशयातून प्रतिदिन ०.६० ते ०.७५ दलघमी या वेगाने पाणी कमी होत आहे. हा उपसा असाच सुरू राहिला तर फेब्रुवारीमध्येच पाणी संपणार आहे. त्यामुळे आरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी भविष्यात अडचणी निर्माण होणार आहेत. ही बाब गंभीर असून अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकाने प्रभावी कारवाई केली नसल्याचेही स्पष्ट केले आहे.विष्णूपुरी प्रकल्पक्षेत्रात गोदावरी नदीपात्रात उजव्या बाजूला १२०६ विद्युत पंप आहेत. त्यात ६९१ पंप परवानाधारक आहेत तर ५१५ पंप अनधिकृत आहेत. त्याचवेळी नदीपात्राच्या डाव्या बाजूला १ हजार २९३ पंप आहेत. त्यात ७७१ पंपांना परवानगी आहे. तर ५२२ पंप हे अनधिकृत आहेत. पथकामार्फत कडक कार्यवाहीची गरज असून यामध्ये महावितरणचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना बागायतदारांची यादी पाठवून त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी कळवले होते.मात्र कार्यवाही झालीच नाही. अनधिकृत बागायतदारांचा वीजपुरवठा पूर्णपणे तोडण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी १३ नोव्हेंबर रोजी बैठक घेवून संबंधितांना आदेश देताना अनधिकृत विद्युतपंप तात्काळ काढण्याचे आदेश दिले. १६ नोव्हेंबरपासून राज्य विद्युत वितरण कंपनीने नांदेड व परभणीकडून सर्व पंपांचा विद्युत पुरवठा तोडावा, ज्याद्वारे पाणी उपसा थांबू शकेल.पर्यायी पाणीपुरवठा योजनाही मर्यादितच- आयुक्तशहरासाठी महापालिकेने इसापूर प्रकल्पावर आधारित सांगवी येथील बंधाºयावर पर्यायी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. इसापूर प्रकल्पातून पाणी घेवून शहराला पाणीपुरवठा करणेही वास्तवात शक्य नाही. सांगवी बंधाºयाची क्षमता तसेच पंपगृहाची क्षमता लक्षात घेता काही भागालाच येथून पाणीपुरवठा केला जावू शकतो. त्यामुळे इसापूरहून पाणी घ्यावे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातील शेतकºयांनीही प्रकल्पातील पाणी हे प्राधान्याने पिण्यासाठी असते, ही बाब लक्षात घ्यावी. मानवी भावना लक्षात घेवून नांदेडकरांची तहान भागवण्यासाठी पाणी शिल्लक रहावे यासाठी विष्णूपुरीतील पाण्याचा अवैध उपसा थांबवावा, असे आवाहनही आयुक्त माळी यांनी केले.

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरण