शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, संधी मिळाली तर मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी बोलणार: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 13:14 IST

भारत राष्ट्र समितीची भूमिका भाजपविरोधी आहे, ते समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे समजते.

नांदेड : केवळ नांदेड जिल्ह्यासाठीच नव्हे तर मराठवाड्यासाठी पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा आहे. महाराष्ट्रातून वाहून गेलेले पाणी थेट समुद्रात जात आहे. लवादाच्या निर्णयानुसार पाणी सोडावेच लागते. पाणीप्रश्नी महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रव्यवहार केला. मीदेखील पाठपुरावा केला. परंतु, मार्ग निघाला नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, त्यांना बोलण्याची संधी मिळाली तर मी निश्चित पाणी प्रश्नावर बोलणार, असे मत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वेसर्वा तथा आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर हे नांदेड येथे १ फेब्रुवारी रोजी येत आहेत. त्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून अशोकराव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित पत्रपरिषदेत पत्रकारांनी बीआरएसचे के. चंद्रशेखर राव यांच्याविषयी प्रश्न विचारले असता त्यांनी आपली भूमिका विशद केली. भारत राष्ट्र समितीची भूमिका भाजपविरोधी आहे, ते समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे समजते. आम्हीदेखील त्यांचे स्वागत करतो. कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नेत्याला विरोध नसतो, प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते. त्याला विरोध असतो, असेही चव्हाण म्हणाले. बाभळी बंधाऱ्यातून पाणी सोडावे लागते, पुढे ते समुद्रात जाते. त्यामुळे त्याचा कुणालाच फायदा होत नाही. त्यामुळे पाणीप्रश्नावर आपण त्यांच्याशी संवाद साधू, अशी भूमिका चव्हाण यांनी व्यक्त केली.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीबाबत बोलताना त्यांनी अद्यापपर्यंत प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राष्ट्रवादी अथवा काँग्रेसची चर्चा झालेली नाही. याबाबत शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युती झाली आहे. भविष्यात ठाकरे हे महाविकास आघाडीत त्यांना घेण्याबाबत चर्चा करतील आणि त्यानंतरच पुढील दिशा आणि भूमिका ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNandedनांदेड