शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

पाणी गेले तेलंगणात : बाभळीला अटी, नियमांचे काटे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 19:18 IST

प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने बाभळी बांधकामास मंजुरी दिली़ मात्र, त्यावेळी अटीही टाकल्या़

ठळक मुद्देमुख्यमंत्रीस्तरावर तोडगा काढण्याची गरज३२ टक्के पाणी तेलंगणात वाहून गेले 

- विशाल सोनटक्के

नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ जुलै रोजी बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडून सुमारे ३२ टक्के पाणीतेलंगणात सोडल्याने जिल्ह्यातील चार तालुक्यांची भिस्त असलेला बाभळी बंधारा कोरडाठाक पडला आहे़  नियमांच्या जटिलतेमुळे महाराष्ट्रावर गरजेच्या वेळी पाणी सोडून देण्याची नामुष्की येत असल्याने बाभळीचे काटे आता टोचू लागले आहेत़ याप्रश्नी मुख्यमंत्रीस्तरावर तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे़  

महाराष्ट्र व तेलंगणा यांच्यामध्ये बाभळी बंधारानिर्मितीवरुन मोठा वाद झाला होता़ प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर २०१३ मध्ये न्यायालयाने निकाल देत १ जुलै रोजी बाभळीचे दरवाजे उघडावेत व १ आॅक्टोबर रोजी दरवाजे बंद करावेत, असे निर्देश दिले़ या बरोबरच त्यानंतर उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यापैकी ०़६० टि़एम़सी़ पाणी दरवर्षी १ मार्च रोजी तीव्र पाणी टंचाई असताना सोडावे लागते़ त्यामुळे करोडो रुपये खर्चून उभारलेल्या या बंधाऱ्याच्या उपयुक्ततेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़   बाभळी बंधाऱ्याची क्षमता २़७४ टि. एम. सी. आहे तर तेलंगणातील पोचमपाड प्रकल्पाची क्षमता ११२ टि. एम. सी. आहे़ पोचमपाडचा ३२ कि़मी़चे बॅकवॉटर क्षेत्र महाराष्ट्रात आहे़ या क्षेत्रात बंधारा बांधता येणार नाही, असा तेलंगणाचा आक्षेप होता, तर आमच्या हद्दीत आम्ही बंधारा बांधू शकतो, असे महाराष्ट्राचे म्हणणे होते़ प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने बाभळी बांधकामास मंजुरी दिली़ मात्र, त्यावेळी अटीही टाकल्या़ याच अटी आज बाभळीच्या मुळावर उठल्याचे आहेत. पुरेसा पाऊस न झाल्यास या तालुक्यांसह परिसरात टंचाईचा सामना करावा लागणार आहे़ 

३२ टक्के पाणी तेलंगणात वाहून गेले 0.628़टि. एम. सी.  म्हणजेच १७़८० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा यंदा या बंधाऱ्यात होता़ १ जुलै रोजी १४ गेट उघडल्यानंतर सुमारे ३२ टक्के पाणी तेलंगणात वाहून गेल्याने आता नांदेड जिल्ह्यातील चार तालुक्यांची भिस्त पावसावर आहे़ 

 

राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची गरज

बाभळीप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी होत आहे़ मात्र, ही वेळखाऊ प्रक्रिया आहे़ आॅक्टोबर महिन्यामध्ये आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, केंद्रीय जल आयोगाकडे दाद मागण्याची, तसेच महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली होती़ सदर प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे़   - प्रा़ डॉ़ बालाजी कोम्पलवार, सचिव, बाभळी संघर्ष समिती 

टॅग्स :DamधरणWaterपाणीNandedनांदेडTelanganaतेलंगणा