शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

बाभळी बंधाऱ्याचे पाणी तेलंगणात गेले, ०.४ टीएमसी पाणी शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 20:00 IST

बंधाऱ्यात एकूण ०.१० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यापैकी ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडले.

धर्माबाद (जि.नांदेड) : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत बाभळी बंधाऱ्याच्या पाच दरवाजांद्वारे १ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडण्यात आले. बंधाऱ्यात एकूण ०.१० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यापैकी ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडले. आता बंधाऱ्यात केवळ ०.४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकारामुळे हा बंधारा कोणाच्या फायद्याचा आहे, अशी चर्चा सुरु आहे.

धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधारा बांधकामावरून महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात वाद झाला. यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने २८ फेब्रुवारी २०१३ रोजी बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे दरवर्षी २९ ऑक्टोबर रोजी खाली सोडावेत व नंतर १ जुलै रोजी वर उचलावेत व १ मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी सोडावे, असा निर्णय दिला. त्यानुसार आज १ मार्च रोजी त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत बाभळी बंधाऱ्याचे प्रथम दरवाजा सकाळी ९ वाजता उघडला. दरवाजे ३,४,५,६,७ अशा पाच दरवाजांद्वारे १ वाजेपर्यंत उघडून ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडून दिले व नंतर सर्वच दरवाजे बंद करण्यात आले.

बंधाऱ्यात एकूण २८.५२ दशलक्ष घनमीटर (०.१० टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध होता. १७ दशलक्ष घनमीटर (०.६ टीएमसी) पाणी सोडल्यानंतर आता बंधाऱ्यात ११.५२ दशलक्ष घनमीटर (०.४ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. यावेळी त्रिस्तरीय समितीतील केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता एम.व्यंकटेश्वरलू, तेलंगणा राज्यातील श्रीराम सागरचे कार्यकारी अभियंता एम.चक्रपाणी, महाराष्ट्र पाटबंधारे विभाग, श्रीराम सागरचे अभियंता रवी कोत्ता, बाभळी बंधाऱ्याचे उपविभागीय अभियंता पी. जी. कदम, कनिष्ठ अभियंता सचिन देवकांबळे, कनिष्ठ अभियंता डी. एस. गव्हाणे, आर. बी. खिंडरे, सागर गायकवाड, सुशांत, रिक्की यांच्यासह महावितरण कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणी