शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:55 IST

यावर्षी नियोजित वेळेपूर्वी हजेरी लावलेल्या दमदार पावसाने सामान्यांसह शेतकऱ्यांना सुखद दिलासा मिळाला असला तरी मागील आठ दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. परिणामी, बळीराजा चिंतातूर झाला असून शेतकऱ्यांना आता पेरणीयोग्य दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : यावर्षी नियोजित वेळेपूर्वी हजेरी लावलेल्या दमदार पावसाने सामान्यांसह शेतकऱ्यांना सुखद दिलासा मिळाला असला तरी मागील आठ दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. परिणामी, बळीराजा चिंतातूर झाला असून शेतकऱ्यांना आता पेरणीयोग्य दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे.यंदा राज्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून अनेक भागात पाण्याअभावी संकटांचा सामना करणा-या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यावर्षीच्या मोसमात पावसाने वेळेपूर्वी काही दिवस अगोदरच जोरदार लावली. त्यामुळे सुरूवातीला झालेल्या दमदार पावसावरच काही शेतक-यानी पेरणींच्या कामांना सुरूवात केली. परंतु, मागील आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतक-यांची चिंता आता वाढली आहे.दरम्यान, मशागतींची सर्व कामे आटोपून सुरूवातीलाच झालेल्या पावसावर काही शेतकºयांनी पेरणींची कामे पूर्ण केली. परंतु, त्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे पेरणी केलेल्या शेतक-यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता त्यांना भेडसावत आहे.रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मृग नक्षत्राची सुरुवात होईपर्यंत जिल्ह्यातही पावसाचे जोरदार आगमन झाले. परंतु, त्यानंतर पावसाने खंड दिल्यामुळे शेतक-यांच्या नजरा आता आकाशाकडे आहेत.

बळीराजा पेरणीसाठी सज्जयावर्षी समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यासह अनेकांनी वर्तविला. त्यामुळे मागील काही वर्षानंतर यावर्षी तरी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, शेतक-यांनी मशागतीची कामे वेगाने केली. तसेच जमेल त्या परिस्थितीत खते, बियाणांचे नियोजनही केले. दरम्यान, शेतकरी पेरणीच्या तयारीत असतानाच अचानक पावसाने दांडी मारल्याने सामान्यांसह शेतक-यांनाही आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.---ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढमागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. तर दुसरीकडे तापमानाचा पारा जवळपास ३६ ते ३८ अंशापर्यंत गेला आहे. परिणामी, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने सामान्य नागरिकांसह शेतक-यांचीही चिंता वाढविली असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीRainपाऊस