शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
4
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
5
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
6
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
7
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
8
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
9
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
10
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
11
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
12
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
13
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
14
गोविंदा आणि सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या वृत्तांवर लेक टीनाने सोडलं मौन, म्हणाली - "स्वतःला या कुटुंबाचा..."
15
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
16
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
17
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
18
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
19
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
20
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:55 IST

यावर्षी नियोजित वेळेपूर्वी हजेरी लावलेल्या दमदार पावसाने सामान्यांसह शेतकऱ्यांना सुखद दिलासा मिळाला असला तरी मागील आठ दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. परिणामी, बळीराजा चिंतातूर झाला असून शेतकऱ्यांना आता पेरणीयोग्य दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : यावर्षी नियोजित वेळेपूर्वी हजेरी लावलेल्या दमदार पावसाने सामान्यांसह शेतकऱ्यांना सुखद दिलासा मिळाला असला तरी मागील आठ दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. परिणामी, बळीराजा चिंतातूर झाला असून शेतकऱ्यांना आता पेरणीयोग्य दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे.यंदा राज्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून अनेक भागात पाण्याअभावी संकटांचा सामना करणा-या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यावर्षीच्या मोसमात पावसाने वेळेपूर्वी काही दिवस अगोदरच जोरदार लावली. त्यामुळे सुरूवातीला झालेल्या दमदार पावसावरच काही शेतक-यानी पेरणींच्या कामांना सुरूवात केली. परंतु, मागील आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतक-यांची चिंता आता वाढली आहे.दरम्यान, मशागतींची सर्व कामे आटोपून सुरूवातीलाच झालेल्या पावसावर काही शेतकºयांनी पेरणींची कामे पूर्ण केली. परंतु, त्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे पेरणी केलेल्या शेतक-यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता त्यांना भेडसावत आहे.रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मृग नक्षत्राची सुरुवात होईपर्यंत जिल्ह्यातही पावसाचे जोरदार आगमन झाले. परंतु, त्यानंतर पावसाने खंड दिल्यामुळे शेतक-यांच्या नजरा आता आकाशाकडे आहेत.

बळीराजा पेरणीसाठी सज्जयावर्षी समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यासह अनेकांनी वर्तविला. त्यामुळे मागील काही वर्षानंतर यावर्षी तरी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, शेतक-यांनी मशागतीची कामे वेगाने केली. तसेच जमेल त्या परिस्थितीत खते, बियाणांचे नियोजनही केले. दरम्यान, शेतकरी पेरणीच्या तयारीत असतानाच अचानक पावसाने दांडी मारल्याने सामान्यांसह शेतक-यांनाही आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.---ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढमागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. तर दुसरीकडे तापमानाचा पारा जवळपास ३६ ते ३८ अंशापर्यंत गेला आहे. परिणामी, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने सामान्य नागरिकांसह शेतक-यांचीही चिंता वाढविली असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीRainपाऊस