शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

भोकर तालुक्यात तलावांना दुरुस्तीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:53 IST

तालुक्याची तहान भागविण्याकरिता अस्तित्वात असलेले तलाव गाळात रुतल्यामुळे जलसंकटाच्या भयातून मुक्त होण्यासाठी तलावांना दुरुस्तीची प्रतीक्षा आहे. दिवसेंदिवस सिंचन क्षेत्रात कमालीची घट होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

भोकर : तालुक्याची तहान भागविण्याकरिता अस्तित्वात असलेले तलाव गाळात रुतल्यामुळे जलसंकटाच्या भयातून मुक्त होण्यासाठी तलावांना दुरुस्तीची प्रतीक्षा आहे. दिवसेंदिवस सिंचन क्षेत्रात कमालीची घट होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.तालुक्याला लाभलेली भौगोलिक परिस्थिती, अधिकचा डोंगराळ भाग यामुळे कायम पाण्याच्या स्तोत्राचा अभाव असल्याने पूर्णत: निसर्गाच्या पर्जन्यमानावरच अवलंबून रहावे लागते. शेतकरी सुखी तर सर्व सुखी, असे मानण्यात येवून जगाचा पोशिंदा जगला पाहिजे यासाठी अनेक प्रयत्न होत असतात. येथील कोरडवाहू शेती पाण्याखाली यावी, शेतकरी सुखी व्हावा या दृष्टिकोनातून कै. शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने १९७२ मध्ये मराठवाड्यातील पहिला बंधारा रावणगाव येथे तयार करण्यात आला होता. त्यानंतर ८० च्या दशकापर्यंत तालुक्यात धानोरा, इळेगाव, लामकाणी, किनी, कांडली, भुरभुशी, आमठाणा आदी भागात तलाव झाले. तर तत्कालीन राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्या प्रयत्नाने रेणापूर शिवारात सुधा प्रकल्प तयार झाला.रावणगाव येथील ३०० गेटच्या बंधाऱ्यावर या भागातील शेती सिंचनाखाली येत होती. त्याकाळी लाकडी पाट्या टाकून आत माती भरून पाणी अडविल्या जात असे. त्यानंतर माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्या प्रयत्नाने यावर लोखंडी गेट बसविण्यात आले. सद्य:स्थितीत या बंधा-यात पाणी अडविण्यात येत असल्याने ९९ विद्युत मोटारीद्वारे २०० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येत आहे. सदरील कोल्हापुरी बंधा-यातून काही प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. यामुळे या बंधाºयाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, या बंधा-यावरून शालेय विद्यार्थी ये-जा करत असतात. सदरील कोल्हापुरी बंधाºयाची दुरूस्ती करण्यासाठी लगळूद ग्रामपंचायतीने तीनवेळा ठराव घेवून शासनाकडे पाठविला आहे. बंधारा दुरूस्त झाल्यास या भागातील अधिक शेती सिंचनाखाली येवू शकते, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.सुधा प्रकल्प गाळात, सिंचन क्षमतेची हानीतालुक्यातील सर्वात मोठा सात दशलक्ष घनमीटर पाणीसाठवण क्षमतेचा सुधा प्रकल्पसुद्धा गाळयुक्त झाल्याने यावरील सिंचनक्षमता कमी झाली आहे. रेणापूर शिवारात २० वर्षांपूर्वी सुधा प्रकल्पाची निर्मिती झाली तेव्हापासून अद्यापपर्यंत यातील गाळ काढण्यात आला नाही. दोन कालव्यांच्या आधारे सातशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित होते. परंतु सद्य:स्थितीत कालवे नादुरूस्त असल्याने विद्युत पंपाद्वारे शेती ओलिताखाली येत आहे. मागील वीस वर्षांपूर्वी सातशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत होते. आता या सिंचन क्षेत्रात घट झाली आहे. भोकर शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी प्रकल्पातील १.८० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित ठेवण्यात येते. यामुळे किमान पाचशे हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणे आवश्यक आहे. परंतु दिवसेंदिवस साचत चाललेल्या गाळामुळे आज या प्रकल्पावरून प्रत्यक्षात ३५८ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येत आहे. तर या परिसरातील पाणीपातळीत वाढ झाल्याने शेतात असलेल्या विहीर व बोअरवरून २३८ हेक्टर शेती सिंचनाखाली येत आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पात ३ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. या उपलब्ध पाण्यावर पुढील चार महिन्यांचे नियोजन करावे लागणार आहे. प्रकल्पामधील गाळ काढला तर सिंचनक्षेत्रात आणखी वाढ होणार असल्याने प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीDamधरण