शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरी जलाशय १०० टक्के भरला; नांदेडला तीन दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 19:40 IST

विष्णूपुरी जलाशय तुडुंब भरल्याने टंचाईचे संकट टळले

ठळक मुद्देमहापालिकेचा निर्णयपाण्याचे महत्त्व ओळखून काटकसरीने वापर करा

नांदेड :  मागील आठ महिन्यांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या नांदेडकरांना आता तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे़ विष्णूपुरी जलाशय १०० टक्के भरल्याने महापालिकेने शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ यासंदर्भात मंगळवारी अधिकृत पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रसिद्ध केले जाणार आहे़ त्यानंतर तीन दिवसांआड पाणी सोडण्यात येणार आहे़ विघ्नहर्त्या बाप्पांच्या आगमनासोबतच पाण्याचे संकट दूर झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला़  

मागील वर्षी अल्पपावसामुळे  पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ विष्णूपुरी जलाशयात उपलब्ध असलेले पाणी अवैध उपशामुळे जानेवारी, फेब्रुवारीतच कमी झाले़ त्यामुळे नांदेड शहराला मार्चपासून पाच दिवसांआड व   एप्रिल, मे, जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात  सहा ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता़ त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या झळा पावसाळ्यातही कायम होत्या़ अर्धा पावसाळा संपला तरी विष्णूपुरी जलाशयात पुरेसा साठा उपलब्ध झाला नव्हता़ 

मागील तीन महिन्यांत केवळ ४५ टक्के  पाऊस झाल्याने नदी- नाले, धरणे, बंधारे कोरडेच होते़ तर दुसरीकडे नांदेड शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी जलाशयात केवळ १७ दलघमी पाणी उपलब्ध झाले होते़ पावसाचे प्रमुख नक्षत्रे कोरडेच गेल्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ दरम्यान, जायकवाडी धरण पूर्ण भरल्यामुळे या पाण्याची प्रतीक्षा करण्यात येत       होती़ परंतु, जायकवाडीचे पाणी विष्णूपुरी जलाशयातपर्यंत पोहोचले नाही़

जायकवाडीच्या पाण्याचा लाभ ढालेगाव व विटा बंधाऱ्यापर्यंत झाला़ दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट गडद होत होते़ ऐन पावसाळ्यात नागरिक पाण्यासाठी भटकंती करताना दिसत होते़  आठवड्यात एक वेळेस  येणाऱ्या टँकरवर पाण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती़  मागील दहा, पंधरा वर्षांत प्रथमच पाणीटंचाईचे गंभीर संकट नांदेडकरांनी अनुभवले होते़ त्यामुळे विष्णूपुरी जलाशयात कधी पाणी उपलब्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते़ अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे विष्णूपुरी भरण्याची आशा मावळली होती़ त्यामुळे विष्णूपुरी जलाशयात असलेल्या पाण्याचे काटकसरीने नियोजन केले होते़ आठ दिवसांत एक वेळेस पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्याचा संचय करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता़ मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पाण्यासाठी वैतागलेल्या नागरिकांना मोठा दिलासा दिला़  गोदावरी नदीक्षेत्रात या पावसाळ्यात प्रथमच दमदार पाऊस झाल्याने विष्णूपुरी जलाशयात पाण्याचा येवा सुरू झाला़ सोमवारी  विष्णूपुरी जलाशय पूर्ण भरल्याने  नागरिकांनी आनंद व्यक्त केला़ 

पाण्याचे महत्त्व ओळखून काटकसरीने वापर कराच्पाण्यासाठी होरपळून निघालेल्या नागरिकांना आता तीन दिवसांआड पाणी मिळणार आहे़ यासंदर्भात महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले, विष्णूपुरी जलाशय शंभर टक्के भरल्याने नांदेड शहराला आता तीन दिवसांआड पाणी सोडण्यात येणार आहे़ यासंदर्भात मंगळवारी अधिकृत घोषणा होवून या निर्णयाची अंमलबजावणी होईल़ नागरिकांनी पाण्याचे महत्त्व ओळखून यापुढे पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले़ 

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाWaterपाणी