शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

अवैध रेती उपशानेच विद्यार्थ्यांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:46 IST

शहरातील नावघाट परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली़ ज्या ठिकाणी ही मुले बुडाली त्याच ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अवैधपणे वाळूचा उपसा करण्यात येत आहे़ त्यामुळे नदीपात्रात मोठ-मोठे खड्डे पडले असून मुलांना खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले़ महसूल प्रशासनाने या वाळू उपशाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला़

ठळक मुद्देबुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू : गोदावरीवरील सर्वच घाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील नावघाट परिसरात गोदावरीनदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली़ ज्या ठिकाणी ही मुले बुडाली त्याच ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अवैधपणे वाळूचा उपसा करण्यात येत आहे़ त्यामुळे नदीपात्रात मोठ-मोठे खड्डे पडले असून मुलांना खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले़ महसूल प्रशासनाने या वाळू उपशाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला़साईबाबा कमानीजवळ गोदावरीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या शिवनगर येथील शुभम जाधव, शुभम जगताप व आनंद केंद्रे या तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ पाण्यात उतरल्यानंतर वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या अन् पाण्याने भरलेल्या खड्ड्यात ते बुडाले़ या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र वाळू उपसा करण्यात येत आहे़ बिनदिक्कतपणे हा वाळू उपसा सुरु आहे़विशेष म्हणजे, या ठिकाणी वाळू उपसा करण्यासाठी कुठलीही परवानगी नाही़ तरीही वाळू उपशामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत़ विशेष म्हणजे, याबाबत गोदावरी जीवरक्षक सेवाभावी संस्थेने २० जुलै २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून या ठिकाणी होणारा वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी केली होती़ जीवरक्षक सेवाभावी संस्थेने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असून त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ रेती उपसा करणाºयांना याबाबत जाब विचारला असता, त्यांच्याकडून संस्थेच्या सदस्यांनाच धमकावण्यात आले़दरवर्षी याच घाटावर गणेश विसर्जन करण्यात येते़ त्यामुळे त्यावेळी रेती उपशामुळे जीवितहानी होवू शकते़ या घाटावरील रेती उपसा त्वरित बंद करुन उपसा करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती़ परंतु, प्रशासनाने जीवरक्षक सेवाभावी संस्थेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले़ शनिवारी त्याच ठिकाणी या मुलांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला़दरम्यान, विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी नागरिकांचा मोठा जमाव जमला होता़ तो पाहून या ठिकाणी वाळू उपसा करणाºयांनी घाटावरुन पळ काढला़ काही वेळातच या ठिकाणचे वाळूचे ट्रकही गायब झाले़ यावेळी नागरिकांनी त्यांचा शोधही घेतला़ परंतु, ते सापडले नाहीत़---नदीपात्रात ठिकठिकाणी २० फूट खोल खड्डेगोदापात्रात सर्वच घाटांवर अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे़ शनिवारी बुडालेले विद्यार्थी काढण्यासाठी जीवरक्षक दलाचे जवान नदीपात्रात उतरले असता, त्या ठिकाणी जवळपास २० फुटांपर्यंतचे खोल खड्डे पडलेले दिसून आले़ सर्वच घाटांवर अवैध वाळू उपशामुळे असे खड्डे पडले आहेत़ त्यामुळे आतापर्यंत अनेकांचा जीवही गेला आहे़ याबाबत प्रशासनाला निवेदन देवूनही कारवाई करण्यात आली नाही़ त्यामुळे या खड्ड्यामध्ये पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे़याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे गोदावरी जीवरक्षक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सय्यद नूर सय्यद इकबाल यांनी सांगितले़---भाजपची निवेदनाद्वारे कारवाईची मागणीभारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले़ त्यानुसार, गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करण्यात येत आहे़ त्यामुळे पडलेल्या खड्ड्यामुळेच तीन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला़ या ठिकाणी दररोज वाळू उपसा होत असताना अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले़ अशा दोषी अधिकाºयांवर त्वरित कठोर कारवाई करावी, असे म्हटले आहे़ त्यावर दिलीपसिंघ सोढी, गुरुप्रितकौर सोढी, परमजितसिंघ ढिल्लो यांच्या स्वाक्षºया आहेत़

टॅग्स :Nandedनांदेडgodavariगोदावरीriverनदी