शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नांदेडमधील भाजी मार्केटचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:34 IST

विमानतळाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्यामुळे महापालिकेने म्हाळजा येथील फळ व भाजीपाला मार्केट पाडण्याची कारवाई केली होती़ मनपाच्या या कारवाईचा व्यापा-यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली होती़ त्यानंतर खा़ चव्हाण यांनी मनपा अधिका-यांची बैठक घेवून व्यापा-यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना दिल्या होत्या़ त्यानुसार बुधवारी व्यापा-यांना बोंढार येथील पर्यायी जागा दाखविण्यात आली़ परंतु व्यापा-यांनी या जागेला विरोध दर्शविल्यामुळे भाजीपाला मार्केटच्या जागेचा तिढा अद्यापही कायमच आहे़

ठळक मुद्देमनपाने सुचविली बोंढारची जागा : मलनिस्सारण केंद्राच्या घाणीमुळे व्यापाऱ्यांचा मात्र विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विमानतळाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्यामुळे महापालिकेने म्हाळजा येथील फळ व भाजीपाला मार्केट पाडण्याची कारवाई केली होती़ मनपाच्या या कारवाईचा व्यापा-यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली होती़ त्यानंतर खा़ चव्हाण यांनी मनपा अधिका-यांची बैठक घेवून व्यापा-यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना दिल्या होत्या़ त्यानुसार बुधवारी व्यापा-यांना बोंढार येथील पर्यायी जागा दाखविण्यात आली़ परंतु व्यापा-यांनी या जागेला विरोध दर्शविल्यामुळे भाजीपाला मार्केटच्या जागेचा तिढा अद्यापही कायमच आहे़म्हाळजा येथील जवळपास नऊ हजार चौ़मी़पेक्षा जास्त जागेवर फळ व भाजीपाला विक्रेत्यासाठी मार्केट बनविण्यात आले होते़ परंतु भाजीपाला आणि फळ मार्केटमुळे विमानतळाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता़ त्यानंतर १२ एप्रिल २०१८ रोजी महापालिकेने नोटीस बजावून मार्केट हटविण्यास सांगितले होते़ त्यानंतर ९ मे रोजी मनपाने या मार्केटवर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त केले़ मार्केट पाडल्यामुळे भाजीपाला आणि फळविक्रेत्यांमध्ये संताप होता़ महापालिकेसमोर त्यांनी आंदोलनही केले होते़ मार्केटची नुकसान भरपाई द्यावी व पुनर्वसन करण्याची मागणी केली होती़ माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांचीही शिष्टमंडळाने भेट घेवून आपली कैफियत मांडली होती़त्यानंतर खा़ चव्हाण यांनी मनपा अधिका-यांची बैठक घेवून व्यापा-यांना शहरात पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना दिल्या होत्या़ त्यानुसार बुधवारी व्यापा-यांचे शिष्टमंडळ आणि मनपा आयुक्त लहूराज माळी व इतर अधिकारी बोंढार येथील मलनिस्सारण प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेले होते़ मनपा अधिका-यांनी व्यापा-यांना मार्केटसाठी ही जागा सुचविली़ परंतु मलनिस्सारण प्रकल्पाच्या घाण वासामुळे या ठिकाणी फळ आणि भाजीपाला मार्केट सुरु करणे अशक्य असल्याचे व त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होणार असल्याचे सांगत व्यापाºयांनी या जागेला विरोध दर्शविला़त्याचबरोबर रात्रीच्या वेळी या ठिकाणी सुरक्षिततेच्या कुठल्याच उपायोजना नसून डासांचा प्रार्दुभावही असतो़ त्यामुळे बहुतांश व्यापाºयांनी बोंढार येथील जागेबाबत नाराजी दर्शविली़ त्यामुळे भाजीपाला मार्केटच्या जागेचा तिढा अद्यापही कायमच आहे़ यावर मनपा प्रशासन आता काय तोडगा काढते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़२०११ मध्येच दिला होता या जागेचा प्रस्ताव२०११ मध्येही महापालिकेकडून बोंढारची जागा देण्याबाबत प्रस्ताव आला होता़ आता पुन्हा तोच प्रस्ताव आणण्यात आला आहे़ परंतु या ठिकाणी घाणीमध्ये मार्केटला व्यापा-यांचा विरोध आहे़ त्यावर तोडगा म्हणून महापालिकेने येत्या तीन दिवसात या भागातील स्वच्छता करुन रस्त्याचे नकाशे दाखविण्यात येणार आहे़ त्यानंतर या विषयावर काय तो निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे़स्वार्थापोटी जागेचा खेळ सुरु-फारुख अहमदमाजी मुख्यमंत्री खा़चव्हाण यांच्या सुचनेवरुन महापालिकेने पर्यायी जागा देण्यास तयार झाली़ सुरुवातीला माळटेकडी परिसरातील डम्पिंग ग्राऊंडची जागा देण्याबाबत चर्चा करण्यात आली होती़ परंतु ही जागा देण्यास नगरसेवक विरोध करीत आहेत़ कारण या ठिकाणी उद्यानाचा प्रस्ताव आहे़ उद्यानाच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी व त्यातून मिळणारा मलिदा या स्वार्थापोटी हा विरोध सुरु असल्याचे कॉफ़ारुख अहमद म्हणाले़

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणMarketबाजारMarket Yardमार्केट यार्ड