शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हवामान बदलामध्ये तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:40 IST

देशपातळीवर दिवसेंदिवस हवामानामध्ये मोठे बदल होत आहेत़ याचा सूक्ष्म पद्धतीने शास्त्र अभ्यास करीत आहेत़ अनेक प्रगत तंत्रज्ञानाद्वारे सूक्ष्म पद्धतीने या बदलाची नोंद होत आहे़

ठळक मुद्देकुलगुरू डॉ़ उद्धव भोसले यांचे प्रतिपादन

नांदेड : देशपातळीवर दिवसेंदिवस हवामानामध्ये मोठे बदल होत आहेत़ याचा सूक्ष्म पद्धतीने शास्त्र अभ्यास करीत आहेत़ अनेक प्रगत तंत्रज्ञानाद्वारे सूक्ष्म पद्धतीने या बदलाची नोंद होत आहे़ त्यामुळे हवामान बदलामध्ये तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे, असे मत स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़उद्धव भोसले यांनी व्यक्त केले़स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूशास्त्र संकुलातर्फे दोन दिवसीय ‘पर्यावरणविषयक हवामान बदल आणि जैविक साधनसंपत्ती : व्यवस्था’ या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी कुलसचिव डॉ़ रमजान मुलाणी, प्रा़ डॉ़ शंकर मूर्ती, प्रा़डॉ़प्रवीण सप्तर्षी, प्रा़ डॉ़ मुळे, प्रा़डॉ़ एस़ गंगाधरराव यांची प्रमुख उपस्थिती होती़कुलगुरू डॉ़ भोसले म्हणाले, जागतिक तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे त्यावर सर्वच राष्ट्र सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करीत आहेत़ या तापमानवाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत़ भारतामधील तरूण शास्त्रज्ञाने पुढे येवून भरीव योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले़चर्चासत्रात पुणे विद्यापीठाचे प्रा़डॉ़सप्तर्षी यांनी हवामान बदल व आजचे बदलते पर्यावरण, मुंबई येथील प्रा़डॉ़शंकर मूर्ती यांनी सुरक्षा नियमानुसार पर्यावरणाचे संरक्षण, औरंगाबाद विद्यापीठातील प्रा़ मुळे यांनी प्रदूषणाचे पर्यावरणावर होणारे परिणाम तर प्रा़ डॉ़ व्ही़ राजमणी, प्रा़डॉ़ एम़ शेषासाई आदींनी चर्चा केली़ यावेळी भूशास्त्र संकुलाचे संचालक प्रा़ डॉ़ के़ विजयकुमार, प्रा़डॉ़ आऱ डी़ कपले, डॉ़ एच़ एस़ पाटोडे, डॉ़दीपाली साबळे, डॉ़योगेश लोळगे, डॉ़ डी़ बी़ पानसकर, डॉ़ पी़ ए़ खडके, डॉ़ ए़ एस़ कदम, डॉ़व्ही़ एम़ वाघ, प्रा़ डॉ़ कृष्णम्माचार्युलु यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन डॉ़ टी़ विजयकुमार यांनी केले तर डॉ़अर्जुन भोसले यांनी आभार मानले़

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड