शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

अवकाळीने नांदेड जिल्ह्याला घेरले; गारपीट, वारा अन् पावसाने केळी बागा, गहू भुईसपाट 

By श्रीनिवास भोसले | Updated: March 16, 2023 18:39 IST

हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा कमालीचा अस्वस्थ झाला आहे.

नांदेड: जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात गुरूवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. वीजांचा कडकडाटाबरोबर झालेल्या पाऊस आणि गारपीटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुदखेड तालुक्यातील केळींच्या बागा, गहु भुईसपाट झाल्या तर हळद शिजविणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांची धांदल उडाली. 

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने बळीराजा चिंतेत होता. त्यात गुरूवारी दुपारी अचानकपणे वेगाचा वारा अन् वीजांचा कडकडाट होवून पावसाने हजेरी लावली. मुदखेड तालुक्यातील बारड, निवघा, इजळी परिसरात गारपीटसह पावसाने पिकांचे नुकसान केले. वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या झाला. तर कापणी केलेला गहु त्याचबरोबर काढलेली हळद पावसाने भिजली. लोहा, नायगाव तालुक्यात करडी, गहु, ज्वारी पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. पावसामुळे वीजेचे पोल आडवे झाले. 

कापणी केलेला गहू, हळद झाकून ठेवलेल्या फाऱ्या, ताडपत्र्या वाऱ्याबरोबर उडून गेल्या. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा कमालीचा अस्वस्थ झाला आहे. वीजांचा कडकडाट अन् पाऊस सुरू असतानाही शेतकऱ्यांकडून शिजविलेली हळद, कापलेल्या गव्हाची वळई झाकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. परंतु, वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने जीव धोक्यात घालून केलेले शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. पाऊस अन् गारपिटीने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे केले जाणार असल्याचे माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, लोहा, उमरी, भोकर, बिलोली, देगलूर, कंधार, मुखेड आदी तालुक्यातील बहुतांश गावात अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने अन् वेगाच्या वाऱ्याने शेतकऱ्यांसह सामान्यांचीही धांदल उडाली. 

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीNandedनांदेड