शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अवकाळीने नांदेड जिल्ह्याला घेरले; गारपीट, वारा अन् पावसाने केळी बागा, गहू भुईसपाट 

By श्रीनिवास भोसले | Updated: March 16, 2023 18:39 IST

हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा कमालीचा अस्वस्थ झाला आहे.

नांदेड: जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात गुरूवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. वीजांचा कडकडाटाबरोबर झालेल्या पाऊस आणि गारपीटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुदखेड तालुक्यातील केळींच्या बागा, गहु भुईसपाट झाल्या तर हळद शिजविणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांची धांदल उडाली. 

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने बळीराजा चिंतेत होता. त्यात गुरूवारी दुपारी अचानकपणे वेगाचा वारा अन् वीजांचा कडकडाट होवून पावसाने हजेरी लावली. मुदखेड तालुक्यातील बारड, निवघा, इजळी परिसरात गारपीटसह पावसाने पिकांचे नुकसान केले. वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या झाला. तर कापणी केलेला गहु त्याचबरोबर काढलेली हळद पावसाने भिजली. लोहा, नायगाव तालुक्यात करडी, गहु, ज्वारी पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. पावसामुळे वीजेचे पोल आडवे झाले. 

कापणी केलेला गहू, हळद झाकून ठेवलेल्या फाऱ्या, ताडपत्र्या वाऱ्याबरोबर उडून गेल्या. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा कमालीचा अस्वस्थ झाला आहे. वीजांचा कडकडाट अन् पाऊस सुरू असतानाही शेतकऱ्यांकडून शिजविलेली हळद, कापलेल्या गव्हाची वळई झाकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. परंतु, वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने जीव धोक्यात घालून केलेले शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. पाऊस अन् गारपिटीने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे केले जाणार असल्याचे माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, लोहा, उमरी, भोकर, बिलोली, देगलूर, कंधार, मुखेड आदी तालुक्यातील बहुतांश गावात अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने अन् वेगाच्या वाऱ्याने शेतकऱ्यांसह सामान्यांचीही धांदल उडाली. 

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीNandedनांदेड