शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

२०१९ मधील अवकाळी पावसाचा फटका; पिकांच्या नुकसानीपोटी मराठवाड्याला २४९ कोटी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 13:18 IST

आॅक्टोबर २०१९ मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून राज्याला अवेळी पावसाने झोडपले होते.

ठळक मुद्देसर्वाधिक ७१ कोटी ८८ लाख रुपये बीड जिल्ह्याला मिळणारशेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी थेट जमा होणार 

- विशाल सोनटक्के 

नांदेड : आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाळी पावसाचा मराठवाड्याला मोठा फटका बसला होता. या पावसामुळे शेती पिकांसह बहुवार्षिक पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. त्यापोटी आता मराठवाड्याला २४९ कोटी ३६ लाखांची मदत देण्यात येणार असून यामध्ये सर्वाधिक ७१ कोटी ८८ लाख रुपये बीड जिल्ह्याला मिळणार आहेत. 

आॅक्टोबर २०१९ मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून राज्याला अवेळी पावसाने झोडपले होते. राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांमधील शेती पिकांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. विशेषत: नांदेडसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्याला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. हातातोंडाशी आलेले उभे पीक अवकाळी पावसामुळे नेस्तनाबूत झाल्यानंतर राज्य शासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे केले होते. ही मदत आपद्ग्रस्तांना मिळाली. यासाठी मागील काही महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडून या संदर्भात उपयोगीता प्रमाणपत्रे सादर करुन बाधित शेतकऱ्यांना निधी देण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणीही करण्यात आली होती.

या अनुषंगाने राज्य शासनाने शेती पिकासाठी प्रति हेक्टरी ८ हजार तर बहुवार्षिक (फळबागा) पिकांसाठी प्रति हेक्टरी १८ हजार रुपये २ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्याच्या महसूल विभागाने आता नुकसानभरपाई देण्याचे निश्चित केले असून यासाठी २४९ कोटी ३६ लाख १५ हजार रुपये मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेती व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना देण्यात येणार आहे. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा२०१९ मध्ये अवकाळी पावसाने राज्यातील शेतीचे मोठे नुकसान केले होते. याचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सोसावा लागला होता. राज्य शासनाने या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३२६ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातील तब्बल २४९ कोटी ३६ लाख रुपये हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० कोटी ६५ लाख ४९ हजार रुपये, लातूर २४ कोटी ४९ लाख, बीड- ७१ कोटी ८८ लाख, जालना ३१ कोटी ९७ लाख, परभणी ३९ कोटी ५९ लाख, हिंगोली २० कोटी ७५ लाख, लातूर २४ कोटी ४९ लाख, उस्मानाबाद ७ कोटी ७१ लाख तर औरंगाबाद जिल्ह्याला २ कोटी २९ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.  

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी थेट जमा होणार २०१९ मधील नुकसानभरपाईपोटी मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना २४९ कोटी ३६ लाखांची मदत मिळणार आहे. संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यात हा निधी थेट जमा करण्यास सांगण्यात आले आहे.  कोणत्याही बाधितांना रोखीने किंवा निविष्टा स्वरूपात मदतीचे वाटप करु नये. तसेच मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर जमा झाल्यानंतर या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये, असे आदेशही  दिले आहेत.   - अशोक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड.................

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीfundsनिधी