शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

बेरोजगारीने तरुणाई त्रस्त; ‘एसआरपीएफ’च्या भाेजनसेवक पदासाठी उच्च शिक्षितांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 12:23 IST

नाेकरभरती ठप्प असल्याचा परिणाम : पाेलीस भरतीची केवळ घाेषणा, अंमलबजावणीची प्रतीक्षाच

नांदेड : काेराेनासह विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या विविध विभागांतील नाेकरभरती जवळजवळ बंद आहे. त्यातच काेराेनाकाळात कित्येकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे बेराेजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यायाने आता मिळेल ते काम करण्याची सुशिक्षित बेराेजगारांची तयारी आहे. त्यातूनच राज्य राखीव पाेलीस दलाच्या भाेजनसेवक व सफाईगार या वर्ग-४ च्या पदासाठी चक्क उच्चशिक्षितांनी अर्ज केले आहेत.

राज्यात एसआरपीएफच्या १४ गटांसाठी ही नाेकरभरती घेतली जात आहे. चतुर्थ श्रेणी वर्ग-४, गट-ड यातील भाेजनसेवक व सफाईगार या पदासाठी ही सरळसेवा भरती घेतली जात आहे. पुणे, दाैंड, जालना, मुंबई, अमरावती, साेलापूर, नवी मुंबई, हिंगाेली, औरंगाबाद, गाेंदिया, काेल्हापूर येथील जागांसाठी ही भरती हाेत आहे. त्यात भाेजनसेवकाच्या ९४ तर सफाईगाराच्या ४१ जागा काढण्यात आल्या आहेत. त्यातील ३० टक्के जागा महिलांसाठी आहेत. २० जानेवारी ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. त्यासाठी ७ वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता मागण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात या चतुर्थ श्रेणींच्या पदासाठी पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित बेराेजगारांनी अर्ज केले आहेत. हे अर्ज पाहून एसआरपीएफ कमांडंटचे डाेळे विस्फारले आहेत. उच्चशिक्षितांनी केलेले हे अर्ज बेराेजगारीची तीव्रता विशद करते.

मैदानावरील तयारी ठरते व्यर्थशासनाने गेल्या काही वर्षांपासून नाेकरभरतीच घेतलेली नाही. पाेलीस शिपाई पदाच्या हजाराे जागांची भरती घेणार याची घाेषणा वारंवार सरकारमधून करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात या भरतीचा मुहूर्त अद्याप निघालेला नाही. त्यासाठी सातत्याने अलीकडे काेराेना महामारीचे कारण पुढे केले जात आहे. भरतीची घाेषणा झाल्यानंतर इच्छुक तरुण मैदानावर तयारी करताना दिसतात. परंतु प्रत्यक्षात भरती घेतली जात नसल्याने त्यांची घाेर निराशा हाेते. या भरतीच्या प्रतीक्षेत कित्येक तरुणांनी वयाेमर्यादा ओलांडली आहे तर काही त्या वाटेवर आहेत. यापूर्वी नाेकरभरतीसाठी हजाराे उमेदवारांनी अर्जही दाखल केले. परंतु काेराेना लाट उद्भवल्याने ही भरती प्रक्रिया पुढे राबविली गेली नाही.

कंत्राटीतही सेवानिवृत्तांना प्राधान्यशासनाच्या इतर अनेक विभागांत नाेकरभरतीबाबत हीच स्थिती आहे. एकीकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शेकडाे जागा रिक्त आहेत, तर दुसरीकडे आऊटसाेर्सिंग, कंत्राटी पद्धतीने या जागांवर उमेदवार घेतले जात आहेत. विविध विभागात तर सेवानिवृत्तांना प्राधान्य दिले जात असल्याने तरुणांनी राेजगार शाेधावे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसUnemploymentबेरोजगारीNandedनांदेडAurangabadऔरंगाबाद