शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारांची फौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:56 IST

देशाचे भवितव्य तरुणाईच्या हाती आहे़ तरुणांची ही शक्ती विधायक मार्गावर खर्च करण्यासाठी त्यांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे़ परंतु, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारांची फौज तयार होत आहे़ त्यामुळे पुढील काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट बनू शकतो अशी शंका वाटते़ स्वातंत्र्यलढ्यापासून देशात तरुणार्इंनी अनेक आंदोलने केली असून आजचा लढा हा देशाच्या स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे़ तरुणांसाठी वैचारिक स्वातंत्र्याचा लढा आहे, असे प्रतिपादन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़

ठळक मुद्देसरकारवर डागली तोफअशोकराव चव्हाण यांचा तरुणाईशी संवाद

नांदेड : देशाचे भवितव्य तरुणाईच्या हाती आहे़ तरुणांची ही शक्ती विधायक मार्गावर खर्च करण्यासाठी त्यांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे़ परंतु, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारांची फौज तयार होत आहे़ त्यामुळे पुढील काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट बनू शकतो अशी शंका वाटते़ स्वातंत्र्यलढ्यापासून देशात तरुणार्इंनी अनेक आंदोलने केली असून आजचा लढा हा देशाच्या स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे़ तरुणांसाठी वैचारिक स्वातंत्र्याचा लढा आहे, असे प्रतिपादन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते़ यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आ़डी़पी़सावंत, आ़अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, पप्पू कोंडेकर, विठ्ठल पावडे, मंगेश शिंदे, अभिजित हाळदेकर, बालाजी गाडे, अब्दुल गफार यांची उपस्थिती होती़ तरुणाईच्या उत्साहाने खचाखच भरलेल्या सभागृहात अशोकराव चव्हाण म्हणाले, राज्यात सर्वच विभागात जवळपास साडेसहा हजार किमीचा प्रवास करुन मी शेतकरी, महिला, मजूर यासह तरुणांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत़ देश घडविण्याचे काम तरुणाईला करावयाचे आहे़ त्यामुळे पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनीही संभ्रमात राहू नये़ मतदान करण्यापूर्वी वैचारिक स्पष्टता असणे गरजेचे आहे़ देश आणि राज्यात काय चालले याबाबत एकवाक्यता असली पाहिजे़ आपण निवडून येणाऱ्या उमेदवारालाच मतदान केले पाहिजे़ जेणेकरुन आपले मत वाया जाणार नाही़ देशात विद्यार्थ्यांची परिस्थिती वाईट आहे़ दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन देणाºया मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोट्यवधी बेरोजगार निर्माण झाले आहेत़ पाच वर्षांपूर्वीच्या जाहिराती काढून पाहिल्यास या सरकारने आपली किती फसगत केली हे लक्षात येईल़ परंतु लोकांची स्मरणशक्ती ही कमी असते़ त्यांना आज काय चालले, जे दाखविले जाते तेच खरे वाटते़ परंतु आता वातावरण बदलत आहे़ लोकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आहे़ त्यामुळे आता लोकच ‘अब की बार बस कर यार’ असे म्हणत आहेत़ तरुणांनी शिकून पकोडे तळावे असे भाजपाचे लोक म्हणत आहेत़ चांगली नोकरी मिळावी म्हणूनच पोटाला चिमटा घेत गरीब आई-वडील मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवितात़ परंतु, या असंवेदनशील सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही़धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम सर्व समाजाला आरक्षणाचे आश्वासन देण्यात आले़ ५८ मोर्चे काढल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिले़ त्यावेळी एकमेकांना पेढे भरविणाऱ्यांनी नोकरीच्या वेळी मात्र मराठा समाजाच्या विरोधात आदेश काढून त्याचा लाभ मिळण्यापासून रोखले़ देशाचा जीडीपी ७ टक्के आहे, असे सांगितले जाते़ मग नोकºया का निर्माण होत नाहीत? असा प्रश्न तरुणांनी सरकारला विचारला पाहिजे़ रोजगारासाठी नांदेड एमआयडीसीमध्ये जागा नाही़ आम्ही आरक्षित केलेल्या जागेवरील आरक्षण उठवावे अशी मागणी सवंग लोकप्रियतेसाठी सत्ताधारी पक्षातील काहीजण करीत आहेत़तरुणांच्या प्रश्नांचे चव्हाणांनी केले समाधान

  • युवा संवाद कार्यक्रमात उपस्थित तरुणांनी यावेळी खा़अशोकराव चव्हाण यांच्यापुढे अनेक प्रश्न उपस्थित केले़ त्यामध्ये अल्पसंख्याक समाजावरील वाढते अत्याचार, बेरोजगारी, डी़एड़,बी़एड. विद्यार्थ्यांची समस्या, वैचारिक स्वातंत्र्यावर घाला, स्पर्धा परीक्षांची भरती, बारुळचा प्रकल्प यांचा त्यात समावेश होता़ या सर्व प्रश्नांची चव्हाण यांनी समाधानकारक उत्तरे देत तरुणांची मने जिंकली़ यावेळी तरुणांनीही टाळ्या अन् शिट्ट्या वाजवित त्यांना दाद दिली़
  • पाच वर्षांत भाजपाने नांदेड जिल्ह्यात किती उद्योग आणलेत हा मोठा मुद्दा आहे़ केवळ भावनेला हात घालून मतं मागायची असाच उद्योग त्यांचा सुरु आहे़ नोटबंदी, जीएसटी यामध्ये कुणाचा फायदा झाला ? देशातील १०७ अर्थतज्ज्ञांनी मोदी सरकारने सादर केलेली सर्व आकडेवारी कशी चुकीची आहे हे उघड केले़ शेतकºयांनी मोर्चे काढले़ परंतु, त्यांना आधारभूत किंमत देण्यास हे सरकार अपयशी ठरले़ त्यामुळे या अपयशी सरकारला सत्तेतून घालविल्याशिवाय आपले सर्व प्रश्न सुटणार नाहीत, असेही चव्हाण म्हणाले़
टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक