शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात तीव्र दुष्काळातच रोजगार हमी योजनेची कासवगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 19:55 IST

मराठवाड्यातील एका मोठ्या वर्गाची मदार रोहयो योजनेवर अवलंबून आहे़ मात्र मागील वर्षीच्या तूलनेत मराठवाड्यात रोहयोची कामे कमी झाल्याचे खुद्द या विभागाचा अहवालच सांगतो़ 

ठळक मुद्देगरज असताना, कामे कमी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रोजगाराचे हाल

नांदेड : दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्यांच्या हाताला हक्काचे काम मिळवून देणाऱ्या रोजगार हमी योजनेने यंदा मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळातच कच खाल्ल्याचे चित्र आहे़ मराठवाड्यातील ४७ हून अधिक तालुके दुष्काळाचा सामना करीत असून, या भागातील लाखोंना रोजगाराची गरज असताना रोहयोची कामे मात्र मागील वर्षीच्या तुलनेत  घटल्याचे दिसून येत आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटकासाठी वरदान ठरलेली आहे. यामुळेच ही योजना देशपातळीवर राबविली जात आहे. यंदा राज्यातील अनेक भागात अत्यल्प पर्जन्यमान झाले़ पर्जन्यमानातील तूट, भूजलाची कमतरता यामुळे राज्यातील १५१ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला़ यात मराठवाड्यातील स्थिती अधिकच गंभीर आहे़ आठ जिल्ह्यातील तब्बल ४७ तालुके दुष्काळाचा सामना करीत असून, पावसाच्या मोठ्या तुटीमुळे यंदा खरीप हंगामातील उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे़ या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील एका मोठ्या वर्गाची मदार रोहयो योजनेवर अवलंबून आहे़ मात्र मागील वर्षीच्या तूलनेत मराठवाड्यात रोहयोची कामे कमी झाल्याचे खुद्द या विभागाचा अहवालच सांगतो़ 

रोहयोच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात येतात़ सन २०१६-१७ मध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील रस्त्याची ९४४ कामे पूर्ण करण्यात आली होती़ त्या तूलनेत २०१७-१८ मध्ये ६७३ कामेच या योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले़  मागील वर्षी याच योजनेतून ७ हजार ६४१ रस्त्याची कामे सुरु होती़ यंदा सुरु असलेल्या रस्ते कामांची संख्या ७ हजार २२५ एवढी आहे. अशीच स्थिती जलसंधारण व जलसंवर्धनाच्या कामांची दिसून येते़ २०१६-१७ मध्ये मराठवाड्यात ६ हजार ९९० जलसंवर्धनाची कामे पूर्ण करण्यात आली होती़ २०१७-१८ मध्ये ५ हजार ४१८ कामेच पूर्ण झाली़ मागील वर्षी चालू कामांची संख्या २२ हजार ९४३ एवढी होती़ २०१७-१८ मध्ये सुरु असलेली कामे अवघी २० हजार ८७१ एवढी आहेत़ 

दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात २०१७-१८ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे मोठ्याप्रमाणात दुष्काळ प्रतिबंधक कामे हाती घेण्यात येतील असे अपेक्षीत होते़ मात्र या कामातही मराठवाड्यात रोहयोची गतवर्षाच्या तूलनेत पीछेहाट झाल्याचेच चित्र आहे़ २०१६-१७ या वर्षात मराठवाड्यात ३ हजार ५९० दुष्काळ प्रतिबंधक कामे पूर्ण करण्यात आली होती़ २०१७-१८ मध्ये मात्र केवळ ९५३ दुष्काळ प्रतिबंधक कामे पूर्ण करण्यात आली़ २०१६-१७ मध्ये सुरू असलेल्या दुष्काळ प्रतिबंधक कामांची संख्या ६ हजार २९६ एवढी होती़ २०१७-१८ मध्ये मात्र यात वाढ झाली असून, या वर्षात १० हजार ८० कामे सुरु आहेत़ 

दुष्काळात कशी वाढली पूरनियंत्रणाची कामे?महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतून २०१६-१७ च्या तुलनेत १७-१८ मध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कामांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते़  मात्र, त्याचवेळी या योजनेतून पूरनियंत्रण विषयाची कामे मात्र वाढल्याचे या अहवालातील आकडेवारी सांगते. २०१६-१७ या वर्षात पूरनियंत्रणाची ३० कामे पूर्ण करण्यात आली़ तर १०५ कामे सुरु होती़ त्या तुलनेत २०१७-१८ मध्ये पूरनियंत्रणाची ५६ कामे पूर्ण करण्यात आली़, तर २६ कामे सुरु आहेत़ 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी