शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

मराठवाड्यात तीव्र दुष्काळातच रोजगार हमी योजनेची कासवगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 19:55 IST

मराठवाड्यातील एका मोठ्या वर्गाची मदार रोहयो योजनेवर अवलंबून आहे़ मात्र मागील वर्षीच्या तूलनेत मराठवाड्यात रोहयोची कामे कमी झाल्याचे खुद्द या विभागाचा अहवालच सांगतो़ 

ठळक मुद्देगरज असताना, कामे कमी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रोजगाराचे हाल

नांदेड : दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्यांच्या हाताला हक्काचे काम मिळवून देणाऱ्या रोजगार हमी योजनेने यंदा मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळातच कच खाल्ल्याचे चित्र आहे़ मराठवाड्यातील ४७ हून अधिक तालुके दुष्काळाचा सामना करीत असून, या भागातील लाखोंना रोजगाराची गरज असताना रोहयोची कामे मात्र मागील वर्षीच्या तुलनेत  घटल्याचे दिसून येत आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटकासाठी वरदान ठरलेली आहे. यामुळेच ही योजना देशपातळीवर राबविली जात आहे. यंदा राज्यातील अनेक भागात अत्यल्प पर्जन्यमान झाले़ पर्जन्यमानातील तूट, भूजलाची कमतरता यामुळे राज्यातील १५१ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला़ यात मराठवाड्यातील स्थिती अधिकच गंभीर आहे़ आठ जिल्ह्यातील तब्बल ४७ तालुके दुष्काळाचा सामना करीत असून, पावसाच्या मोठ्या तुटीमुळे यंदा खरीप हंगामातील उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे़ या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील एका मोठ्या वर्गाची मदार रोहयो योजनेवर अवलंबून आहे़ मात्र मागील वर्षीच्या तूलनेत मराठवाड्यात रोहयोची कामे कमी झाल्याचे खुद्द या विभागाचा अहवालच सांगतो़ 

रोहयोच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात येतात़ सन २०१६-१७ मध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील रस्त्याची ९४४ कामे पूर्ण करण्यात आली होती़ त्या तूलनेत २०१७-१८ मध्ये ६७३ कामेच या योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले़  मागील वर्षी याच योजनेतून ७ हजार ६४१ रस्त्याची कामे सुरु होती़ यंदा सुरु असलेल्या रस्ते कामांची संख्या ७ हजार २२५ एवढी आहे. अशीच स्थिती जलसंधारण व जलसंवर्धनाच्या कामांची दिसून येते़ २०१६-१७ मध्ये मराठवाड्यात ६ हजार ९९० जलसंवर्धनाची कामे पूर्ण करण्यात आली होती़ २०१७-१८ मध्ये ५ हजार ४१८ कामेच पूर्ण झाली़ मागील वर्षी चालू कामांची संख्या २२ हजार ९४३ एवढी होती़ २०१७-१८ मध्ये सुरु असलेली कामे अवघी २० हजार ८७१ एवढी आहेत़ 

दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात २०१७-१८ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे मोठ्याप्रमाणात दुष्काळ प्रतिबंधक कामे हाती घेण्यात येतील असे अपेक्षीत होते़ मात्र या कामातही मराठवाड्यात रोहयोची गतवर्षाच्या तूलनेत पीछेहाट झाल्याचेच चित्र आहे़ २०१६-१७ या वर्षात मराठवाड्यात ३ हजार ५९० दुष्काळ प्रतिबंधक कामे पूर्ण करण्यात आली होती़ २०१७-१८ मध्ये मात्र केवळ ९५३ दुष्काळ प्रतिबंधक कामे पूर्ण करण्यात आली़ २०१६-१७ मध्ये सुरू असलेल्या दुष्काळ प्रतिबंधक कामांची संख्या ६ हजार २९६ एवढी होती़ २०१७-१८ मध्ये मात्र यात वाढ झाली असून, या वर्षात १० हजार ८० कामे सुरु आहेत़ 

दुष्काळात कशी वाढली पूरनियंत्रणाची कामे?महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतून २०१६-१७ च्या तुलनेत १७-१८ मध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कामांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते़  मात्र, त्याचवेळी या योजनेतून पूरनियंत्रण विषयाची कामे मात्र वाढल्याचे या अहवालातील आकडेवारी सांगते. २०१६-१७ या वर्षात पूरनियंत्रणाची ३० कामे पूर्ण करण्यात आली़ तर १०५ कामे सुरु होती़ त्या तुलनेत २०१७-१८ मध्ये पूरनियंत्रणाची ५६ कामे पूर्ण करण्यात आली़, तर २६ कामे सुरु आहेत़ 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी