शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गांजेगाव बंधाऱ्याचे दोन गेट उघडले; दहा गावांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 01:01 IST

इसापूर धरणातून सोडलेले पाणी गांजेगाव बंधा-याच्या वरील शेतक-यांनी अडविले होते़ त्यामुळे खालील ८ ते १० गावच्या शेतकयांनी गेट काढून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली होती़

हिमायतनगर : इसापूर धरणातून सोडलेले पाणी गांजेगाव बंधा-याच्या वरील शेतक-यांनी अडविले होते़ त्यामुळे खालील ८ ते १० गावच्या शेतकयांनी गेट काढून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली होती़ त्यानुसार १३ डिसेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात बंधा-याचे दोन गेट काढून पाणी सोडण्यात आले़इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडा, या मागणीसाठी ९० गावच्या शेतक-यांनी १५ दिवस आंदोलन केल्याने महाराष्ट्राचे ७ दलघमी आणि विदर्भातील ५ दलघमी असे एकूण १२ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्यानुसार पाणीही सोडण्यात आले़ परंतु वरील गावच्या शेतक-यांनी गांजेगाव बंधा-याचे गेट लाऊन पाणी अडविले़ त्यामुळे पाणी टेलपर्यंत म्हणजे सहस्त्रकुंडपर्यंत पोचलेच नाही. त्यामुळे अंदोलनामध्ये सहभागी होऊनही पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ बंधा-याच्या खालील गावक-यांवर आली होती. हि बाब लक्षात घेऊन गांजेगावच्या बंधा-याचे गेट काढून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचवावे, अशी मागणी सिरपल्ली, शेलोडा, एकंबा, कोठा, कोठा तांडा, बोरगाडी, धानोरा, वारंगटाकळी, मुरली, बिटरगाव, पिपंळगाव, सावळेश्वर आदी गेटच्या खालील गावातील गावक-यांनी एका निवेदनाद्वारे उमरखेड आणि हिमायतनगर तहसीलदारांकडे केली होती. त्यामुळे पुन्हा पाण्याचा वाद निर्माण होऊ नये, आणि बंधा-याचे गेट लावणा-या वरील आणि गेटखालील गावक-यांमध्ये पाण्यासाठी आपसात भांडण होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने पाणी टेलपर्यंत पाठवून समान पाण्याचा लाभ नदीकाठावरील गावांना मिळवून दिला आहे.हिमायतनगरचे तहसीलदार आशिष बिराजदार आणि उमरखेडचे तहसीलदार भगवान कांबळे यांनी १३ डिसेंबर रोजी दुपारी पोलीस बंदोबस्तात गंजेगाव बंधा-याचे गेट काढून पाणी सोडले़ ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग उमरखेडेचे विनोद पाटील, सहाय्यक अभियंता शाहू, माने, हिमायतनगरचे नायब तहसीलदार राठोड, मंडळ अधिकारी राठोड, पोलीस निरीक्षक सुरेंद्र बोरसे, बिटरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राऊत आदींसह उमरखेड - हिमायतनगर भागातील गावचे सरपंच उपस्थित होते़ बंधा-याचे २ गेटला लावलेले ८ प्लेट काढून पाणी सोडले आहे. शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाणार नाही, तोपर्यंत गेट चालू ठेवण्यात यावे अशी मागणी राजू पाटील शेलोडेकर, गणेश शिंदे, अरविंद पाटील, आंबराव जोडगदंड, सुदर्शन पाटील, दिलीप चव्हाण, अवधूत शिंदे, बळीराम देवकते, रामराव कोठेकर, शिवाजी पाटील आदींनी केली़

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईDamधरण