शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

गांजेगाव बंधाऱ्याचे दोन गेट उघडले; दहा गावांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 01:01 IST

इसापूर धरणातून सोडलेले पाणी गांजेगाव बंधा-याच्या वरील शेतक-यांनी अडविले होते़ त्यामुळे खालील ८ ते १० गावच्या शेतकयांनी गेट काढून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली होती़

हिमायतनगर : इसापूर धरणातून सोडलेले पाणी गांजेगाव बंधा-याच्या वरील शेतक-यांनी अडविले होते़ त्यामुळे खालील ८ ते १० गावच्या शेतकयांनी गेट काढून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली होती़ त्यानुसार १३ डिसेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात बंधा-याचे दोन गेट काढून पाणी सोडण्यात आले़इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडा, या मागणीसाठी ९० गावच्या शेतक-यांनी १५ दिवस आंदोलन केल्याने महाराष्ट्राचे ७ दलघमी आणि विदर्भातील ५ दलघमी असे एकूण १२ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्यानुसार पाणीही सोडण्यात आले़ परंतु वरील गावच्या शेतक-यांनी गांजेगाव बंधा-याचे गेट लाऊन पाणी अडविले़ त्यामुळे पाणी टेलपर्यंत म्हणजे सहस्त्रकुंडपर्यंत पोचलेच नाही. त्यामुळे अंदोलनामध्ये सहभागी होऊनही पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ बंधा-याच्या खालील गावक-यांवर आली होती. हि बाब लक्षात घेऊन गांजेगावच्या बंधा-याचे गेट काढून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचवावे, अशी मागणी सिरपल्ली, शेलोडा, एकंबा, कोठा, कोठा तांडा, बोरगाडी, धानोरा, वारंगटाकळी, मुरली, बिटरगाव, पिपंळगाव, सावळेश्वर आदी गेटच्या खालील गावातील गावक-यांनी एका निवेदनाद्वारे उमरखेड आणि हिमायतनगर तहसीलदारांकडे केली होती. त्यामुळे पुन्हा पाण्याचा वाद निर्माण होऊ नये, आणि बंधा-याचे गेट लावणा-या वरील आणि गेटखालील गावक-यांमध्ये पाण्यासाठी आपसात भांडण होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने पाणी टेलपर्यंत पाठवून समान पाण्याचा लाभ नदीकाठावरील गावांना मिळवून दिला आहे.हिमायतनगरचे तहसीलदार आशिष बिराजदार आणि उमरखेडचे तहसीलदार भगवान कांबळे यांनी १३ डिसेंबर रोजी दुपारी पोलीस बंदोबस्तात गंजेगाव बंधा-याचे गेट काढून पाणी सोडले़ ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग उमरखेडेचे विनोद पाटील, सहाय्यक अभियंता शाहू, माने, हिमायतनगरचे नायब तहसीलदार राठोड, मंडळ अधिकारी राठोड, पोलीस निरीक्षक सुरेंद्र बोरसे, बिटरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राऊत आदींसह उमरखेड - हिमायतनगर भागातील गावचे सरपंच उपस्थित होते़ बंधा-याचे २ गेटला लावलेले ८ प्लेट काढून पाणी सोडले आहे. शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाणार नाही, तोपर्यंत गेट चालू ठेवण्यात यावे अशी मागणी राजू पाटील शेलोडेकर, गणेश शिंदे, अरविंद पाटील, आंबराव जोडगदंड, सुदर्शन पाटील, दिलीप चव्हाण, अवधूत शिंदे, बळीराम देवकते, रामराव कोठेकर, शिवाजी पाटील आदींनी केली़

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईDamधरण