शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी भाजपात चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 18:20 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घोषित झाली असून बँकेतील सत्ताधारी महाआघाडीच्या करारानुसार यावेळी अध्यक्षपद भाजपाला दिले जाणार आहे. परिणामी भाजपाचे गंगाधर राठोड व लक्ष्मण ठक्करवाड यांच्यात चुरस लागली आहे.

ठळक मुद्देनांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी २३ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.बँकेचे २१ संचालक निवडीसाठी २०१५ मध्ये निवडणूक पार पडली होती. आ. चिखलीकर यांनी ३० सप्टेंबर रोजी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घोषित झाली असून बँकेतील सत्ताधारी महाआघाडीच्या करारानुसार यावेळी अध्यक्षपद भाजपाला दिले जाणार आहे. परिणामी भाजपाचे गंगाधर राठोड व लक्ष्मण ठक्करवाड यांच्यात चुरस लागली आहे.  

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी २३ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. बँकेचे २१ संचालक निवडीसाठी २०१५ मध्ये निवडणूक पार पडली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ संचालक, काँग्रेस-५, भाजपा-७ तर शिवसेनेचा एक संचालक निवडून आले होते. त्यानंतर  भाजपा-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्रित येवून सत्ता स्थापन केली. दरम्यान, प्रत्येक पक्षाला एक वर्ष अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे बापुसाहेब गोरठेकर यांना अध्यक्षपद देण्यात आले. वर्षभरानंतर शिवसेनेचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

आ. चिखलीकर यांनी ३० सप्टेंबर रोजी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेंव्हापासून सदर पद रिक्त असून येत्या ३० डिसेंबर रोजी पुन्हा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. दोन वर्षापूर्वी झालेली महाआघाडी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता. राष्ट्रवादी, शिवसेनेनंतर आता अध्यक्षपद भाजपाकडे येणार आहे. बँकेच्या संचालकामध्ये भाजपचे दिलीप कंदकुर्ते, गंगाधरराव राठोड, लक्ष्मण ठक्करवाड यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. पक्षश्रेष्ठी यातील कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालतात याची उत्सुकता आहे.

निवडणूक कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणवीस यांना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.  त्यानुसार २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ११.३० या कालावधीत नामनिर्देशन पत्राचे वितरण तसेच स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर लगेच नामनिर्देशन पत्राची छाननी करुन निकाल दिला जाणार आहे. सकाळी ११.४५ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास दुपारी ११.५० ते १२.१५ या कालावधीत मतदान घेवून निकाल घोषित केला जाईल असे फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडPoliticsराजकारणBJPभाजपा