शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

धनगरांसोबत विश्वासघातकी राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:27 IST

आतापर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच धनगर समाजाचा विश्वासघात केला. कारण, ज्या शिडीवर पाय ठेवून आमदार, खासदार वर गेले त्यांनी आपले घर सावलीत बांधून तुमचे घर उन्हात बांधले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचा आरोप धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही

लोहा : आतापर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच धनगर समाजाचा विश्वासघात केला. कारण, ज्या शिडीवर पाय ठेवून आमदार, खासदार वर गेले त्यांनी आपले घर सावलीत बांधून तुमचे घर उन्हात बांधले. तुमच्यामुळेच २०१४ ला राज्य व केंद्रात सत्तापरिवर्तन झाले. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करणार नसल्याची घोषणा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली.लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रेतील कुस्ती मैदानालगत धनगर आरक्षण जागर महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ना. पंकजा मुंडे बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आयोजक गणेश हाके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, खा. विकास महात्मे, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आ. गोविंद केंद्रे, देवीदास राठोड, अ‍ॅड. मुक्तेश्वर धोंडगे, विठ्ठल रबदाडे, कल्याणी वाघमोडे, निहारिका खोलगे, जि. प. सदस्य दशरथ लोहबंदे, सरपंच गोविंदराव राठोड, माजी जि. प. सदस्य भगवान हाके यांची उपस्थिती होती.प्रारंभी पंकजा मुंडे यांनी हेलिकॉप्टरने पूर्ण माळेगाव यात्रेवर फेरी मारली व खंडेरायाचे दर्शन घेऊन सभास्थळी दाखल झाल्या. उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर व कै. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने काठी आणि घोंगडी देऊन त्यांचा सत्कार केला़यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यातील, देशातील विकास व सामान्य माणसांच्या हितासाठी केलेल्या कामाच्या जोरावर भाजपा पुन्हा सत्ता पादाक्रांत करणार आहे. धनगर आरक्षणाकडे वाकड्या नजरेने पाहिले तर काठी उगारल्याशिवाय राहणार नाही. धनगर समाजाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अहिल्यादेवीच्या आदर्शाने राज्यात जलयुक्त शिवार योजना राबविली.अहिल्यादेवींनी बांधलेले घाट, विहिरी, बंधारे आजही शाबूत आहेत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झालेली कामे कागदोपत्रीच झाली. विकास कागदावरच झाला. त्यांनी स्वत:ची खळगी भरण्याचे काम केले. म्हणून राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. काँग्रेस- राष्ट्रवादीकडे सत्तर वर्षे सत्ता होती़ शेतकऱ्यांना दिलासा का नाही मिळाला. त्यामुळे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. सत्ता परिवर्तन न करता भाजपाला पुनश्च सत्तेत पाठवा. मला सत्तेची लालसा नाही वंचितासाठी मी राजकारणात आहे. मला जातीपातीचे राजकारण आवडत नाही. आरक्षणासाठी मी तुमच्या संघर्षात सोबत आहे. वेळ पडली तर मी आंदोलनात सहभागी होईल.धनगर समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी ५० कोटी खर्चून योजना आणली, पोहरादेवीच्या विकासासाठी २५ कोटी रूपयांचा निधी दिला. भक्तिस्थळापासून शक्तिस्थळापर्यंत कामे केली. राष्ट्रवादीचा आरक्षणाचा डाव फेल गेला़ पुढे राष्ट्रवादीच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या आहेत.धनगर समाजबांधवांनो तुम्हाला शक्तिप्रदर्शन, आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. गरज पडल्यास मी आंदोलनात सहभागी असेल़ असेही त्या म्हणाल्या़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.सदस्य चंद्रसेन पा. गौडगावकर यांनी तर व्यंकट मोकले यांनी आभार मानले.अमित शहा आज नांदेडातभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे रविवारी नांदेड विमानतळावरुन हेलिकॉप्टरने लातूरला गेले़ रविवारी शहा यांनी तीन जिल्ह्यांतील भाजपा पदाधिका-यांची बैठक घेवून आढावा घेतला़ त्यानंतर रात्री शहा हे लातूरलाच मुक्काम करणार आहेत़ त्यानंतर सोमवारी सकाळी ते हेलिकॉप्टरने नांदेडला येणार आहेत़ सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी त्यांचे नांदेडात आगमन होणार आहे़ त्यानंतर ते सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी रवाना होणार आहेत़ गुरुद्वारा दर्शनानंतर ते काही वेळ शहरात थांबणार आहेत़ त्यानंतर ११ वाजता नांदेड विमानतळावरुन ते दिल्लीकडे रवाना होतील़

टॅग्स :NandedनांदेडReligious programmeधार्मिक कार्यक्रमPankaja Mundeपंकजा मुंडेMahadev Jankarमहादेव जानकरreservationआरक्षण