शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

प्रशिक्षण शिबीर सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:54 IST

काँग्रेस पक्षाने मागील साठ वर्षांत सर्वच आघाड्यांवर देशाला प्रगतीपथावर नेले आहे. विकासाचा रथ वेगाने पुढे जात असताना खोटी आश्वासने देणारे मोदी सरकार सत्तेत आले आणि देश पुन्हा संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देअशोकराव चव्हाणकाँग्रेसचा विचार लोकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन

नांदेड : काँग्रेस पक्षाने मागील साठ वर्षांत सर्वच आघाड्यांवर देशाला प्रगतीपथावर नेले आहे. विकासाचा रथ वेगाने पुढे जात असताना खोटी आश्वासने देणारे मोदी सरकार सत्तेत आले आणि देश पुन्हा संकटात सापडला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी व लोकांपर्यंत काँग्रेसचा विचार रुजविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांचे जिल्हानिहाय प्रशिक्षण घेण्यात येत असून हे शिबीर सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.शहरातील आशीर्वाद गार्डन येथे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात दुसºया दिवशीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर प्रशिक्षण शिबिराचे राज्य समन्वयक आ. रामहरी रूपनर, माजी खा. तुकाराम रेंगे, आ. डी. पी. सावंत, आ.वसंतराव चव्हाण, पक्षाचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, महापौर शीला भवरे, माजी आ. माधवराव जवळगावकर, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, रावसाहेब अंतापूरकर यांच्यासह सत्संग मुंडे, हरिभाऊ शेळके, लियाकत अली अन्सारी, प्रशिक्षक राजीव शाहू, नैशद परमार, लेखा नायर, विनोद नायर यांची उपस्थिती होती.खा. चव्हाण म्हणाले की, लोकांचा वाढलेला काँग्रेसमधील जोश आता मतात रूपांतरित करण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आपण खूप केले आहे, पण सांगण्यासाठी कमी पडतो. त्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत देश आणि राज्य वाचविण्यासाठी सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी निवडणुका जिंकणे गरजेचे आहे. जनता शासनावर नाराज आहे. अशावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात जाऊन काँग्रेसचा विचार प्रभावीपणे मांडावा, असे आवाहन त्यांनी केले.भाजपने केलेला जातीवाद, धर्मवाद त्यासोबतच काँग्रेसचा सुरू केलेला अपप्रचार या सर्व बाबी आपल्याला हाणून पाडायच्या आहेत. त्यासाठीच या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नांदेडमधील हे २२ वे शिबीर असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर उर्वरित जिल्ह्यांतही शिबिरे होणार असून २३ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलेले असेल असे ते म्हणाले. यावेळी मुख्य समन्वयक रामहरी रूपनर व आ.अमरनाथ राजूरकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. शिबिराच्या सुरूवातीस आ. डी. पी. सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सेवादलाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव गुंडले व शहराध्यक्ष लक्ष्मीकांत गोणे यांनी यावेळी सलामी दिली. सूत्रसंचालन प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले.

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस