शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

मुख्यालयी न राहता घरभाडे घेतले; ग्रामसेवक, शिक्षकांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 17:17 IST

आता घर भाडे प्रकरणी राज्य सरकार काय भूमिका घेणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

- गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड) : मुख्यालयी न राहता भाडे घेतल्या प्रकरणी पंचायत समितीच्या ३१८ कर्मचाऱ्यांविरुद्ध शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात ग्रामसेवक व शिक्षकांचाही समावेश होता. तर शिक्षकांवर दाखल झालेले गुन्हे औरंगाबाद खंडपीठाने रद्द केले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी याचिका दाखल करून घेत राज्य शासनाला एका महिन्यात बाजू मांडण्यासाठी आदेशित केले आहे. आता घर भाडे प्रकरणी राज्य सरकार काय भूमिका घेणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

नांदेड जिल्हा अर्धापूर पंचायत समिती अंतर्गत असलेले शिक्षक व ग्रामसेवक मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता उचलत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सय्यद युनूस यांनी प्रशासनाला निदर्शनास आणून दिले. त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अनेक आंदोलने करूनही अधिकारी व प्रशासनाने दखल घेतली नाही. यामुळे सय्यद युनुस यांनी न्यायालयात धाव घेतली. ३० मार्च २०२२ रोजी सदर प्रकरण जेष्ठ विधिज्ञ अँड.ए.आर.चाऊस माध्यमातून अर्धापूर न्यायालयात दाखल केले. या प्रकरणी पंचायत समितीचे २९२ शिक्षक व २६ ग्रामसेवक अशा ३१८ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.यावरून दि.१० जुलै २०२२ रोजी शिक्षक, ग्रामसेवक यांच्यावर अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शिक्षक, ग्रामसेवक यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. ३१८ शिक्षकव ग्रामसेवक यांना ५ ऑगस्ट रोजी जिल्हा सत्र न्यायालय नांदेड यांनी जामीन मंजूर केला होता. तसेच या प्रकरणी दि.३ रोजी औरंगाबाद खंडपीठाने शिक्षकांवरील गुन्हे रद्द करण्याचा निकाल  दिला. आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहे. सय्यद युनूस यांनी ॲड.असीम सरोदे यांच्यामार्फत या प्रकरणी अपील केली. 

दि.२० ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती सी.टी. रवीकुमार, न्यायमूर्ती संजीवकुमार यांच्यासमोर सुनावणी झाली. महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी केली. ८ डिसेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्र सरकारने त्यांचे म्हणणे सादर करावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.सय्यद युनूस यांच्यातर्फे ॲड.असीम सरोदे, ॲड.अभय अंतुरकर, ॲड.सुरभी कपूर, ॲड. अनिरुद्ध  हे बाजू मांडत आहेत. मुख्यालयी न राहता घर भाडे भत्ता घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न आता थेट दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या गटात एकच खळबळ उडाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे राज्यसरकारला आदेशमुख्यालयी न राहता घर भाडे भत्ता प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा गैरव्यवहार नक्कीच उघड होईल. दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने ८ डिसेंबर पर्यंत महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका सादर करावी असे आदेश दिले आहेत. - ॲड.असीम सरोदे

टॅग्स :Teacherशिक्षकgram panchayatग्राम पंचायतNandedनांदेड