शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

पाण्याअभावी शौचालये कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:01 IST

सध्या शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून शौचालयांसाठी पाणी कुठूुन आणायचे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी शौचालये कुलूपबंद असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.

ठळक मुद्देबिलोली तालुक्यातील चित्र पुन्हा उघड्यावर शौचास जाण्याची नागरिकांवर आली वेळ

बिलोली : सध्या शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून शौचालयांसाठी पाणी कुठूुन आणायचे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी शौचालये कुलूपबंद असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.परिणामी महिला व लहान मुलांना उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आली.गतवर्षी सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाला, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकेही बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाहीत. त्यांनी खते-बियाण्यांसाठी टाकलेला खर्चही निघाला नाही. त्याचा परिणाम पर्जन्यमान कमी असल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच भूगर्भातील पाणीपातळीत घट झाल्याने एप्रिल, मे महिन्यात अतिशय गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.सद्य:स्थितीला शहरालगत असलेले तलाव, विहिरी कोरडेठाक पडले तर ग्रामीण भागातील बोअर, हातपंपासह पाण्याचे अनेक स्त्रोत बंद झाले झाले आहेत. त्यामुळे बिलोली तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती पाहिल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक गावांत शौचालयाचा वापर बंद करत कुलूपबंद केले आहे. त्यामुळे पुन्हा उघड्यावर शौचास जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.शासनाकडून विविध योजनेअंतर्गत प्रोत्साहन म्हणून आर्थिक सहाय्य देत प्रत्येक गावात घर तिथे शौचालय, या उक्तीप्रमाणे अनेक गावांत शौचालयांची कामे करुन हागणदारीमुक्त गावे म्हणून घोषित करण्यात आली. परंतु, पाणीच नसल्याने शौचालये निरुपयोगी ठरत आहेत.यासाठी प्रत्येकाने पावसाळ्यात पडणाºया पाण्याचे योग्य नियोजन करुन पाण्याची साठवणूक करुन ठेवावी. तसेच उन्हाळ्यात पाण्याची कमतरता पडणार नाही, यासाठी बोअरवेल पुनर्भरण, विहीर पुनर्भरण, शोषखड्डे यांचा वापर करुन पाणी जमिनीत मुरवावे लागणार आहे. अन्यथा येत्या उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.तालुक्यातील हागणदारीमुक्त कागदावरच !बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांनी शौचालयांचे बांधकाम करुन गावे हागणदारीमुक्त झाल्याचे कागदोत्री दाखवून शासनाकडून अनेक पुरस्कारही मिळविले आहेत. परंतु, सध्यातरी ग्रामीण भागात अतिशय कमी प्रमाणात शौचालयाचा वापर करण्यात येत असल्याने हागणदारीमुक्ती कागदावरच असल्याचे पहावयास मिळत आहे.सद्य:स्थितीला शहरालगत असलेले तलाव, विहिरी कोरडेठाक पडले तर ग्रामीण भागातील बोअर, हातपंपासह पाण्याचे स्त्रोत बंद झाले झाले आहेत.

टॅग्स :NandedनांदेडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानWaterपाणीwater shortageपाणीटंचाई