शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
4
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
5
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
6
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
7
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
8
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
9
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
10
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
11
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
12
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
13
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
14
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
15
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
16
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
17
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
18
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
19
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
20
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी शौचालये कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:01 IST

सध्या शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून शौचालयांसाठी पाणी कुठूुन आणायचे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी शौचालये कुलूपबंद असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.

ठळक मुद्देबिलोली तालुक्यातील चित्र पुन्हा उघड्यावर शौचास जाण्याची नागरिकांवर आली वेळ

बिलोली : सध्या शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून शौचालयांसाठी पाणी कुठूुन आणायचे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी शौचालये कुलूपबंद असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.परिणामी महिला व लहान मुलांना उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आली.गतवर्षी सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाला, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकेही बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाहीत. त्यांनी खते-बियाण्यांसाठी टाकलेला खर्चही निघाला नाही. त्याचा परिणाम पर्जन्यमान कमी असल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच भूगर्भातील पाणीपातळीत घट झाल्याने एप्रिल, मे महिन्यात अतिशय गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.सद्य:स्थितीला शहरालगत असलेले तलाव, विहिरी कोरडेठाक पडले तर ग्रामीण भागातील बोअर, हातपंपासह पाण्याचे अनेक स्त्रोत बंद झाले झाले आहेत. त्यामुळे बिलोली तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती पाहिल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक गावांत शौचालयाचा वापर बंद करत कुलूपबंद केले आहे. त्यामुळे पुन्हा उघड्यावर शौचास जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.शासनाकडून विविध योजनेअंतर्गत प्रोत्साहन म्हणून आर्थिक सहाय्य देत प्रत्येक गावात घर तिथे शौचालय, या उक्तीप्रमाणे अनेक गावांत शौचालयांची कामे करुन हागणदारीमुक्त गावे म्हणून घोषित करण्यात आली. परंतु, पाणीच नसल्याने शौचालये निरुपयोगी ठरत आहेत.यासाठी प्रत्येकाने पावसाळ्यात पडणाºया पाण्याचे योग्य नियोजन करुन पाण्याची साठवणूक करुन ठेवावी. तसेच उन्हाळ्यात पाण्याची कमतरता पडणार नाही, यासाठी बोअरवेल पुनर्भरण, विहीर पुनर्भरण, शोषखड्डे यांचा वापर करुन पाणी जमिनीत मुरवावे लागणार आहे. अन्यथा येत्या उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.तालुक्यातील हागणदारीमुक्त कागदावरच !बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांनी शौचालयांचे बांधकाम करुन गावे हागणदारीमुक्त झाल्याचे कागदोत्री दाखवून शासनाकडून अनेक पुरस्कारही मिळविले आहेत. परंतु, सध्यातरी ग्रामीण भागात अतिशय कमी प्रमाणात शौचालयाचा वापर करण्यात येत असल्याने हागणदारीमुक्ती कागदावरच असल्याचे पहावयास मिळत आहे.सद्य:स्थितीला शहरालगत असलेले तलाव, विहिरी कोरडेठाक पडले तर ग्रामीण भागातील बोअर, हातपंपासह पाण्याचे स्त्रोत बंद झाले झाले आहेत.

टॅग्स :NandedनांदेडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानWaterपाणीwater shortageपाणीटंचाई