शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

पाण्याअभावी शौचालये कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:01 IST

सध्या शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून शौचालयांसाठी पाणी कुठूुन आणायचे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी शौचालये कुलूपबंद असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.

ठळक मुद्देबिलोली तालुक्यातील चित्र पुन्हा उघड्यावर शौचास जाण्याची नागरिकांवर आली वेळ

बिलोली : सध्या शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून शौचालयांसाठी पाणी कुठूुन आणायचे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी शौचालये कुलूपबंद असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.परिणामी महिला व लहान मुलांना उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आली.गतवर्षी सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाला, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकेही बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाहीत. त्यांनी खते-बियाण्यांसाठी टाकलेला खर्चही निघाला नाही. त्याचा परिणाम पर्जन्यमान कमी असल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच भूगर्भातील पाणीपातळीत घट झाल्याने एप्रिल, मे महिन्यात अतिशय गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.सद्य:स्थितीला शहरालगत असलेले तलाव, विहिरी कोरडेठाक पडले तर ग्रामीण भागातील बोअर, हातपंपासह पाण्याचे अनेक स्त्रोत बंद झाले झाले आहेत. त्यामुळे बिलोली तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती पाहिल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक गावांत शौचालयाचा वापर बंद करत कुलूपबंद केले आहे. त्यामुळे पुन्हा उघड्यावर शौचास जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.शासनाकडून विविध योजनेअंतर्गत प्रोत्साहन म्हणून आर्थिक सहाय्य देत प्रत्येक गावात घर तिथे शौचालय, या उक्तीप्रमाणे अनेक गावांत शौचालयांची कामे करुन हागणदारीमुक्त गावे म्हणून घोषित करण्यात आली. परंतु, पाणीच नसल्याने शौचालये निरुपयोगी ठरत आहेत.यासाठी प्रत्येकाने पावसाळ्यात पडणाºया पाण्याचे योग्य नियोजन करुन पाण्याची साठवणूक करुन ठेवावी. तसेच उन्हाळ्यात पाण्याची कमतरता पडणार नाही, यासाठी बोअरवेल पुनर्भरण, विहीर पुनर्भरण, शोषखड्डे यांचा वापर करुन पाणी जमिनीत मुरवावे लागणार आहे. अन्यथा येत्या उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.तालुक्यातील हागणदारीमुक्त कागदावरच !बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांनी शौचालयांचे बांधकाम करुन गावे हागणदारीमुक्त झाल्याचे कागदोत्री दाखवून शासनाकडून अनेक पुरस्कारही मिळविले आहेत. परंतु, सध्यातरी ग्रामीण भागात अतिशय कमी प्रमाणात शौचालयाचा वापर करण्यात येत असल्याने हागणदारीमुक्ती कागदावरच असल्याचे पहावयास मिळत आहे.सद्य:स्थितीला शहरालगत असलेले तलाव, विहिरी कोरडेठाक पडले तर ग्रामीण भागातील बोअर, हातपंपासह पाण्याचे स्त्रोत बंद झाले झाले आहेत.

टॅग्स :NandedनांदेडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानWaterपाणीwater shortageपाणीटंचाई