शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

मराठवाड्यातील १,३४४ गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 3:47 AM

आॅक्टोबरमध्येच मराठवाड्याच्या ७६ तालुक्यांतील १,३४४ गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

नांदेड : आॅक्टोबरमध्येच मराठवाड्याच्या ७६ तालुक्यांतील १,३४४ गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जानेवारीपर्यंत आणखी १,१६८ गावे तर एप्रिलमध्ये १,८७३ गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भूजल आणि विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणात मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता समोर आली आहे.मराठवाड्यातील ७६ पैकी १२ तालुक्यांत सरासरीच्या ० ते २० टक्क्यांहून कमी पाऊस झालेला आहे. २० ते ३० टक्क्यांहून कमी पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या १२ आहे. ३० ते ५० टक्क्यांहून कमी पर्जन्यमान झालेले तालुके ४० आहेत. ७ तालुक्यांत ५० टक्क्यांहून कमीपाऊस झाला आहे. त्यात बीड, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे.विभागातील ४ हजार ५७२ गावांतील भूजलपातळी १ मीटरपेक्षा अधिक घटली आहे, तर १ हजार ९४८ गावांतील भूजलपातळीत १ ते २ मीटरची घट झाली आहे. २ ते ३ मीटर घट झालेल्या गावांची संख्या१,२१३ आहे.विशेष म्हणजे तब्बल १,४११ गावांत भूजलपातळीत ३ मीटरहून अधिक घट झाल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. ६७ गावांमधील भूजलसाठा चिंताजनक स्तरावरआहे.>प्रशासनाकडून मराठवाड्याची कोंडी?प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर मराठवाड्याची चोहोबाजूंनी कोंडी सुरू आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला रेखांकन मंजुरीसाठी २५०० कोटींच्या अनुदानाची गरज आहे. दुसरीकडे समन्यायी पाणी वाटपाचा अजून निर्णय झालेला नाही. कालवा दुरूस्ती, शेतापर्यंत पाणी देण्याची व्यवस्था करणे, पाणी वापर संस्थांची हद्द ठरविण्यासाठी अनुदानाची गरज आहे.