शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

टँकरद्वारे भागविली जाते वन्यजीवांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:25 IST

तालुक्यातील अनेक गावांमध्ये जंगलदृश परिस्थिती असल्याने या ठिकाणी जंगलात राहणारे पशू-पक्षी वास्तव्य करतात. एप्रिल, मे, जून या महिन्याच्या टप्याटप्याने उष्णता वाढत जाते.

ठळक मुद्देबिलोली तालुक्यात बडूर, मिणकीत वनविभागाने तयार केली पाणवठे

बिलोली : तालुक्यातील अनेक गावांमध्ये जंगलदृश परिस्थिती असल्याने या ठिकाणी जंगलात राहणारे पशू-पक्षी वास्तव्य करतात. एप्रिल, मे, जून या महिन्याच्या टप्याटप्याने उष्णता वाढत जाते. मात्र, यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या टप्यात असलेली उष्णता एप्रिल महिन्यात जाणवू लागली आहे. यावर्षी एप्रिल महिन्यातच उन्हाच्या तीव्रतेने ४३ अंश सेल्सीअस पारा ओलांडला असून त्यामुळे जंगलातील व शेतातील पाणवठे आटले आहेत.जंगलात राहणाऱ्या पशु-पक्षी व विविध प्रकारच्या प्राण्याची भटकंती वाढली आहे. पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसत आहेत. याकडे वनविभाग यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे वृत लोकमतमध्ये प्रकाशित होताच बिलोली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवानंद कोळी यांनी या वृत्ताची त्वरीत दखल घेऊन बडूर, बामणी, मिणकीसह अनेक गावांत असलेल्या माळराणावरील पाणवठ्यात पाणी टाकून जंगलातील वन्यजीवांसाठी पाणवठे तयार करुन सदर प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे जंगलातील पशु-प्राण्याला दिलासा मिळाला आहे.जंगलातील पशु-प्राण्यांना सांभाळणे पाणी उपलब्ध करुन देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्या बाबतची आर्थिक तरतूद वन विभागाकडे प्रशासनाने केली आहे. याची जाणीव वनविभागात कार्यरत कर्मचारी अधिकारी यांना आहे. त्यांना पाणी उपलब्ध करुन देणे वनविभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत सर्वच पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी उपलब्ध केले असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवानंद कोळी व वनरक्षक गिरीश कुरुडे यांनी सांगितले आहे.बिलोली तालुक्यातील बडूर, बामणी, मिणकी, सगरोळी, कुंडलवाडी या गावांना वनक्षेत्र आहे. हरीण, काळवीट, वानर-माकड, मोर यासारखे अनेक वन्यजीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. वनविभागाने त्यांच्यासाठी उपाययोजना केल्यामुळे प्राण्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडwildlifeवन्यजीवWaterपाणी