शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

टँकरद्वारे भागविली जाते वन्यजीवांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:25 IST

तालुक्यातील अनेक गावांमध्ये जंगलदृश परिस्थिती असल्याने या ठिकाणी जंगलात राहणारे पशू-पक्षी वास्तव्य करतात. एप्रिल, मे, जून या महिन्याच्या टप्याटप्याने उष्णता वाढत जाते.

ठळक मुद्देबिलोली तालुक्यात बडूर, मिणकीत वनविभागाने तयार केली पाणवठे

बिलोली : तालुक्यातील अनेक गावांमध्ये जंगलदृश परिस्थिती असल्याने या ठिकाणी जंगलात राहणारे पशू-पक्षी वास्तव्य करतात. एप्रिल, मे, जून या महिन्याच्या टप्याटप्याने उष्णता वाढत जाते. मात्र, यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या टप्यात असलेली उष्णता एप्रिल महिन्यात जाणवू लागली आहे. यावर्षी एप्रिल महिन्यातच उन्हाच्या तीव्रतेने ४३ अंश सेल्सीअस पारा ओलांडला असून त्यामुळे जंगलातील व शेतातील पाणवठे आटले आहेत.जंगलात राहणाऱ्या पशु-पक्षी व विविध प्रकारच्या प्राण्याची भटकंती वाढली आहे. पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसत आहेत. याकडे वनविभाग यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे वृत लोकमतमध्ये प्रकाशित होताच बिलोली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवानंद कोळी यांनी या वृत्ताची त्वरीत दखल घेऊन बडूर, बामणी, मिणकीसह अनेक गावांत असलेल्या माळराणावरील पाणवठ्यात पाणी टाकून जंगलातील वन्यजीवांसाठी पाणवठे तयार करुन सदर प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे जंगलातील पशु-प्राण्याला दिलासा मिळाला आहे.जंगलातील पशु-प्राण्यांना सांभाळणे पाणी उपलब्ध करुन देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्या बाबतची आर्थिक तरतूद वन विभागाकडे प्रशासनाने केली आहे. याची जाणीव वनविभागात कार्यरत कर्मचारी अधिकारी यांना आहे. त्यांना पाणी उपलब्ध करुन देणे वनविभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत सर्वच पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी उपलब्ध केले असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवानंद कोळी व वनरक्षक गिरीश कुरुडे यांनी सांगितले आहे.बिलोली तालुक्यातील बडूर, बामणी, मिणकी, सगरोळी, कुंडलवाडी या गावांना वनक्षेत्र आहे. हरीण, काळवीट, वानर-माकड, मोर यासारखे अनेक वन्यजीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. वनविभागाने त्यांच्यासाठी उपाययोजना केल्यामुळे प्राण्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडwildlifeवन्यजीवWaterपाणी