शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

टँकरद्वारे भागविली जाते वन्यजीवांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:25 IST

तालुक्यातील अनेक गावांमध्ये जंगलदृश परिस्थिती असल्याने या ठिकाणी जंगलात राहणारे पशू-पक्षी वास्तव्य करतात. एप्रिल, मे, जून या महिन्याच्या टप्याटप्याने उष्णता वाढत जाते.

ठळक मुद्देबिलोली तालुक्यात बडूर, मिणकीत वनविभागाने तयार केली पाणवठे

बिलोली : तालुक्यातील अनेक गावांमध्ये जंगलदृश परिस्थिती असल्याने या ठिकाणी जंगलात राहणारे पशू-पक्षी वास्तव्य करतात. एप्रिल, मे, जून या महिन्याच्या टप्याटप्याने उष्णता वाढत जाते. मात्र, यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या टप्यात असलेली उष्णता एप्रिल महिन्यात जाणवू लागली आहे. यावर्षी एप्रिल महिन्यातच उन्हाच्या तीव्रतेने ४३ अंश सेल्सीअस पारा ओलांडला असून त्यामुळे जंगलातील व शेतातील पाणवठे आटले आहेत.जंगलात राहणाऱ्या पशु-पक्षी व विविध प्रकारच्या प्राण्याची भटकंती वाढली आहे. पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसत आहेत. याकडे वनविभाग यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे वृत लोकमतमध्ये प्रकाशित होताच बिलोली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवानंद कोळी यांनी या वृत्ताची त्वरीत दखल घेऊन बडूर, बामणी, मिणकीसह अनेक गावांत असलेल्या माळराणावरील पाणवठ्यात पाणी टाकून जंगलातील वन्यजीवांसाठी पाणवठे तयार करुन सदर प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे जंगलातील पशु-प्राण्याला दिलासा मिळाला आहे.जंगलातील पशु-प्राण्यांना सांभाळणे पाणी उपलब्ध करुन देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्या बाबतची आर्थिक तरतूद वन विभागाकडे प्रशासनाने केली आहे. याची जाणीव वनविभागात कार्यरत कर्मचारी अधिकारी यांना आहे. त्यांना पाणी उपलब्ध करुन देणे वनविभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत सर्वच पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी उपलब्ध केले असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवानंद कोळी व वनरक्षक गिरीश कुरुडे यांनी सांगितले आहे.बिलोली तालुक्यातील बडूर, बामणी, मिणकी, सगरोळी, कुंडलवाडी या गावांना वनक्षेत्र आहे. हरीण, काळवीट, वानर-माकड, मोर यासारखे अनेक वन्यजीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. वनविभागाने त्यांच्यासाठी उपाययोजना केल्यामुळे प्राण्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडwildlifeवन्यजीवWaterपाणी