शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

'जिल्ह्याजिल्ह्यात पाण्यासाठी भांडणे होतील'; मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंचन विभागाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 6:32 PM

नदी व धरणांमधील पाण्याचे मराठवाड्यात ग्रीड तयार करून ते पाइपलाइनद्वारे जोडण्याचा निर्णय राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने घेतला होता.

ठळक मुद्देमराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये आधीच क्षमतेच्या केवळ ७० टक्के जलसाठा होतो.त्यातही ग्रीड केल्यास एका जिल्ह्यातील पाणी दुसऱ्या जिल्ह्यात जाईल.

नांदेड/औरंगाबाद : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने आणलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंचन विभागाचा तीव्र विरोध आहे. या ग्रीडमुळे जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी भांडणे लागण्याची भीती या विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, मराठवाडा वॉटर ग्रीडच्या या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सर्व संबंधितांची बैठक बोलावली आहे.

मराठवाड्यामध्ये पाण्याची भीषण समस्या आहे. त्यातच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. नदी व धरणांमधील पाण्याचे मराठवाड्यात ग्रीड तयार करून ते पाइपलाइनद्वारे जोडण्याचा निर्णय राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने घेतला होता. तत्कालीन मंत्री बबनराव लोणीकर यांचा या ग्रीडसाठी अधिक आग्रह होता. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या अनुषंगाने २६ हजार कोटींच्या निविदाही काढण्याची तयारी केली गेली होती. भाजपाची मंडळी आजही या ग्रीडसाठी आग्रही आहे; परंतु प्रत्यक्षात हे ग्रीड फायद्याचे नाही, तसा अभिप्राय सिंचन विभागाने नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली. मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये आधीच क्षमतेच्या केवळ ७० टक्के जलसाठा होतो. त्यातही ग्रीड केल्यास एका जिल्ह्यातील पाणी दुसऱ्या जिल्ह्यात जाईल. त्यातून जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी वाद उभे राहतील. आधीच टंचाईचा सामना करणाऱ्या अनेक जिल्ह्यांतील पाणी कमी होईल. त्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड फायद्याचा नसल्याचे सांगण्यात येते. याअनुषंगाने गुरुवारी मुख्यमंत्र्यांची बैठक होत आहे. त्यात काय निर्णय होतो याकडे नजरा लागल्या आहेत.

तेलंगणा सरकारचा नो रिस्पाॅन्समहाराष्ट्रातील हक्काचे पाणी नदीतून तेलंगणामध्ये वाहून जात आहे. या पाण्याचा राज्यातील जनतेला सिंचनासाठी पुरेसा उपयोग होत नाही. हे पाणी अडविणे व इतर उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. दोन्ही राज्यांच्या सचिव स्तरावरही पत्रव्यवहार झाला; परंतु तेलंगणा सरकारकडून महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांना व पत्रव्यवहारांना पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती आहे.

अभिप्राय त्याला पूरक नाहीभाजपा सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड ही संकल्पना मांडली होती. सिंचन विभागाचा अभिप्राय त्याला पूरक नाही. या ग्रीडमुळे पाण्यासाठी भांडणे उद्भवण्याचा धोका आहे. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल.- अशोकराव चव्हाण, पालकमंत्री, नांदेड

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाAshok Chavanअशोक चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस