शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

'जिल्ह्याजिल्ह्यात पाण्यासाठी भांडणे होतील'; मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंचन विभागाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 18:34 IST

नदी व धरणांमधील पाण्याचे मराठवाड्यात ग्रीड तयार करून ते पाइपलाइनद्वारे जोडण्याचा निर्णय राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने घेतला होता.

ठळक मुद्देमराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये आधीच क्षमतेच्या केवळ ७० टक्के जलसाठा होतो.त्यातही ग्रीड केल्यास एका जिल्ह्यातील पाणी दुसऱ्या जिल्ह्यात जाईल.

नांदेड/औरंगाबाद : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने आणलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंचन विभागाचा तीव्र विरोध आहे. या ग्रीडमुळे जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी भांडणे लागण्याची भीती या विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, मराठवाडा वॉटर ग्रीडच्या या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सर्व संबंधितांची बैठक बोलावली आहे.

मराठवाड्यामध्ये पाण्याची भीषण समस्या आहे. त्यातच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. नदी व धरणांमधील पाण्याचे मराठवाड्यात ग्रीड तयार करून ते पाइपलाइनद्वारे जोडण्याचा निर्णय राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने घेतला होता. तत्कालीन मंत्री बबनराव लोणीकर यांचा या ग्रीडसाठी अधिक आग्रह होता. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या अनुषंगाने २६ हजार कोटींच्या निविदाही काढण्याची तयारी केली गेली होती. भाजपाची मंडळी आजही या ग्रीडसाठी आग्रही आहे; परंतु प्रत्यक्षात हे ग्रीड फायद्याचे नाही, तसा अभिप्राय सिंचन विभागाने नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली. मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये आधीच क्षमतेच्या केवळ ७० टक्के जलसाठा होतो. त्यातही ग्रीड केल्यास एका जिल्ह्यातील पाणी दुसऱ्या जिल्ह्यात जाईल. त्यातून जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी वाद उभे राहतील. आधीच टंचाईचा सामना करणाऱ्या अनेक जिल्ह्यांतील पाणी कमी होईल. त्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड फायद्याचा नसल्याचे सांगण्यात येते. याअनुषंगाने गुरुवारी मुख्यमंत्र्यांची बैठक होत आहे. त्यात काय निर्णय होतो याकडे नजरा लागल्या आहेत.

तेलंगणा सरकारचा नो रिस्पाॅन्समहाराष्ट्रातील हक्काचे पाणी नदीतून तेलंगणामध्ये वाहून जात आहे. या पाण्याचा राज्यातील जनतेला सिंचनासाठी पुरेसा उपयोग होत नाही. हे पाणी अडविणे व इतर उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. दोन्ही राज्यांच्या सचिव स्तरावरही पत्रव्यवहार झाला; परंतु तेलंगणा सरकारकडून महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांना व पत्रव्यवहारांना पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती आहे.

अभिप्राय त्याला पूरक नाहीभाजपा सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड ही संकल्पना मांडली होती. सिंचन विभागाचा अभिप्राय त्याला पूरक नाही. या ग्रीडमुळे पाण्यासाठी भांडणे उद्भवण्याचा धोका आहे. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल.- अशोकराव चव्हाण, पालकमंत्री, नांदेड

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाAshok Chavanअशोक चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस