शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

'जिल्ह्याजिल्ह्यात पाण्यासाठी भांडणे होतील'; मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंचन विभागाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 18:34 IST

नदी व धरणांमधील पाण्याचे मराठवाड्यात ग्रीड तयार करून ते पाइपलाइनद्वारे जोडण्याचा निर्णय राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने घेतला होता.

ठळक मुद्देमराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये आधीच क्षमतेच्या केवळ ७० टक्के जलसाठा होतो.त्यातही ग्रीड केल्यास एका जिल्ह्यातील पाणी दुसऱ्या जिल्ह्यात जाईल.

नांदेड/औरंगाबाद : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने आणलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंचन विभागाचा तीव्र विरोध आहे. या ग्रीडमुळे जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी भांडणे लागण्याची भीती या विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, मराठवाडा वॉटर ग्रीडच्या या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सर्व संबंधितांची बैठक बोलावली आहे.

मराठवाड्यामध्ये पाण्याची भीषण समस्या आहे. त्यातच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. नदी व धरणांमधील पाण्याचे मराठवाड्यात ग्रीड तयार करून ते पाइपलाइनद्वारे जोडण्याचा निर्णय राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने घेतला होता. तत्कालीन मंत्री बबनराव लोणीकर यांचा या ग्रीडसाठी अधिक आग्रह होता. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या अनुषंगाने २६ हजार कोटींच्या निविदाही काढण्याची तयारी केली गेली होती. भाजपाची मंडळी आजही या ग्रीडसाठी आग्रही आहे; परंतु प्रत्यक्षात हे ग्रीड फायद्याचे नाही, तसा अभिप्राय सिंचन विभागाने नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली. मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये आधीच क्षमतेच्या केवळ ७० टक्के जलसाठा होतो. त्यातही ग्रीड केल्यास एका जिल्ह्यातील पाणी दुसऱ्या जिल्ह्यात जाईल. त्यातून जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी वाद उभे राहतील. आधीच टंचाईचा सामना करणाऱ्या अनेक जिल्ह्यांतील पाणी कमी होईल. त्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड फायद्याचा नसल्याचे सांगण्यात येते. याअनुषंगाने गुरुवारी मुख्यमंत्र्यांची बैठक होत आहे. त्यात काय निर्णय होतो याकडे नजरा लागल्या आहेत.

तेलंगणा सरकारचा नो रिस्पाॅन्समहाराष्ट्रातील हक्काचे पाणी नदीतून तेलंगणामध्ये वाहून जात आहे. या पाण्याचा राज्यातील जनतेला सिंचनासाठी पुरेसा उपयोग होत नाही. हे पाणी अडविणे व इतर उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. दोन्ही राज्यांच्या सचिव स्तरावरही पत्रव्यवहार झाला; परंतु तेलंगणा सरकारकडून महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांना व पत्रव्यवहारांना पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती आहे.

अभिप्राय त्याला पूरक नाहीभाजपा सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड ही संकल्पना मांडली होती. सिंचन विभागाचा अभिप्राय त्याला पूरक नाही. या ग्रीडमुळे पाण्यासाठी भांडणे उद्भवण्याचा धोका आहे. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल.- अशोकराव चव्हाण, पालकमंत्री, नांदेड

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाAshok Chavanअशोक चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस