शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एकच पीक ठरते आहे शेतकऱ्यांसाठी घातक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 13:18 IST

पीक उत्पादकता वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न होण्याची गरज दिसून येते. 

- विशाल सोनटक्के

कोरडवाहू शेतीमुळे एकच पीक घेण्याकडे मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा कल दिसतो. मात्र, ही पद्धतच शेतकऱ्याच्या जिवावर बेतत असल्याचे जाणवते. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापक आर. डी. अहिरे आणि पी. एस. कापसे यांनी मराठवाड्यातील या ३२० आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील सदस्यांशी संवाद साधला. या संवादानंतर आणि अभ्यासातून त्यांनी शेतकरी आत्महत्या मागील काही निष्कर्ष मांडले आहेत. 

सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या

मराठवाड्यात झालेल्या शेतकरी आत्महत्यांपैकी तब्बल ८२.१८ टक्के शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहिल्या असता, सदर शेतकरी हा एकच पीक (सोल क्रॉपींग) घेत असल्याचे दिसून आले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी १७.८२ टक्के शेतकऱ्यांच्या शेतात अंतर्गत पीक घेतले जात होते. विशेष म्हणजे, उत्पादकतेचा विषयही येथे महत्त्वाचा आहे. या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके आणि त्यांची सरासरी उत्पादकता पाहिल्यास पीक उत्पादकता वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न होण्याची गरज दिसून येते. 

खाजगी सावकारीमुळे शेतकरी अडकतो कर्जाच्या विळख्यात 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांतील ६१.७८ टक्के शेतकऱ्यांनी खरिपामध्ये सोयाबीन पीक घेतले होते. याची सरासरी उत्पादकता हेक्टरी ९.५६ क्विंटल एवढी होती. ५७.१८ टक्के शेतकऱ्यांनी कापूस पीक घेतले होते. याची उत्पादकता प्रतिहेक्टरी ११.२० एवढी होती तर ३३.४३ टक्के शेतकऱ्यांनी वाटाणा लावला होता. याची उत्पादकता प्रतिहेक्टरी ७.३४ क्विंटल एवढी होती. रबीचा विचार करता २८.१२ शेतकऱ्यांकडे हरभरा होता, याची उत्पादकता प्रतिहेक्टरी ७.२० एवढी, ३०.९३ टक्के शेतकऱ्यांनी ज्वारी घेतली होती. याची उत्पादकता हेक्टरी ९.६५ तर गहू घेतलेल्या १६.२५ टक्के शेतकऱ्यांच्या गव्हाची सरासरी उत्पादकता हेक्टरी ११.९९ टक्के एवढी असल्याचे दिसून आले.

मराठवाडयात दुष्काळ, सिंचन सुविधांअभावी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

घटती जमीनधारणा चिंता वाढविणारीघटत्या जमीनधारणेचा प्रश्नही जटील आहे़ मराठवाड्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ३१़५७ टक्के शेतकऱ्यांकडे केवळ १ हेक्टरपर्यंत जमीन होती़ तर ३९़६८ टक्के शेतकऱ्यांकडे १ ते २ हेक्टर एवढीच जमीन होती़ २ ते ४ हेक्टर जमीन असतानाही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या २१़२५ टक्के आहे़ ४ ते १० हेक्टर जमीन असतानाही ६़५६ टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून १० हेक्टरहून अधिक जमीन असताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ०़९४ टक्के इतकी असल्याचे हा अहवाल सांगतो़  

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेतीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ