शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

एकच पीक ठरते आहे शेतकऱ्यांसाठी घातक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 13:18 IST

पीक उत्पादकता वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न होण्याची गरज दिसून येते. 

- विशाल सोनटक्के

कोरडवाहू शेतीमुळे एकच पीक घेण्याकडे मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा कल दिसतो. मात्र, ही पद्धतच शेतकऱ्याच्या जिवावर बेतत असल्याचे जाणवते. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापक आर. डी. अहिरे आणि पी. एस. कापसे यांनी मराठवाड्यातील या ३२० आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील सदस्यांशी संवाद साधला. या संवादानंतर आणि अभ्यासातून त्यांनी शेतकरी आत्महत्या मागील काही निष्कर्ष मांडले आहेत. 

सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या

मराठवाड्यात झालेल्या शेतकरी आत्महत्यांपैकी तब्बल ८२.१८ टक्के शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहिल्या असता, सदर शेतकरी हा एकच पीक (सोल क्रॉपींग) घेत असल्याचे दिसून आले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी १७.८२ टक्के शेतकऱ्यांच्या शेतात अंतर्गत पीक घेतले जात होते. विशेष म्हणजे, उत्पादकतेचा विषयही येथे महत्त्वाचा आहे. या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके आणि त्यांची सरासरी उत्पादकता पाहिल्यास पीक उत्पादकता वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न होण्याची गरज दिसून येते. 

खाजगी सावकारीमुळे शेतकरी अडकतो कर्जाच्या विळख्यात 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांतील ६१.७८ टक्के शेतकऱ्यांनी खरिपामध्ये सोयाबीन पीक घेतले होते. याची सरासरी उत्पादकता हेक्टरी ९.५६ क्विंटल एवढी होती. ५७.१८ टक्के शेतकऱ्यांनी कापूस पीक घेतले होते. याची उत्पादकता प्रतिहेक्टरी ११.२० एवढी होती तर ३३.४३ टक्के शेतकऱ्यांनी वाटाणा लावला होता. याची उत्पादकता प्रतिहेक्टरी ७.३४ क्विंटल एवढी होती. रबीचा विचार करता २८.१२ शेतकऱ्यांकडे हरभरा होता, याची उत्पादकता प्रतिहेक्टरी ७.२० एवढी, ३०.९३ टक्के शेतकऱ्यांनी ज्वारी घेतली होती. याची उत्पादकता हेक्टरी ९.६५ तर गहू घेतलेल्या १६.२५ टक्के शेतकऱ्यांच्या गव्हाची सरासरी उत्पादकता हेक्टरी ११.९९ टक्के एवढी असल्याचे दिसून आले.

मराठवाडयात दुष्काळ, सिंचन सुविधांअभावी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

घटती जमीनधारणा चिंता वाढविणारीघटत्या जमीनधारणेचा प्रश्नही जटील आहे़ मराठवाड्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ३१़५७ टक्के शेतकऱ्यांकडे केवळ १ हेक्टरपर्यंत जमीन होती़ तर ३९़६८ टक्के शेतकऱ्यांकडे १ ते २ हेक्टर एवढीच जमीन होती़ २ ते ४ हेक्टर जमीन असतानाही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या २१़२५ टक्के आहे़ ४ ते १० हेक्टर जमीन असतानाही ६़५६ टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून १० हेक्टरहून अधिक जमीन असताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ०़९४ टक्के इतकी असल्याचे हा अहवाल सांगतो़  

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेतीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ