शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

एकच पीक ठरते आहे शेतकऱ्यांसाठी घातक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 13:18 IST

पीक उत्पादकता वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न होण्याची गरज दिसून येते. 

- विशाल सोनटक्के

कोरडवाहू शेतीमुळे एकच पीक घेण्याकडे मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा कल दिसतो. मात्र, ही पद्धतच शेतकऱ्याच्या जिवावर बेतत असल्याचे जाणवते. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापक आर. डी. अहिरे आणि पी. एस. कापसे यांनी मराठवाड्यातील या ३२० आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील सदस्यांशी संवाद साधला. या संवादानंतर आणि अभ्यासातून त्यांनी शेतकरी आत्महत्या मागील काही निष्कर्ष मांडले आहेत. 

सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या

मराठवाड्यात झालेल्या शेतकरी आत्महत्यांपैकी तब्बल ८२.१८ टक्के शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहिल्या असता, सदर शेतकरी हा एकच पीक (सोल क्रॉपींग) घेत असल्याचे दिसून आले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी १७.८२ टक्के शेतकऱ्यांच्या शेतात अंतर्गत पीक घेतले जात होते. विशेष म्हणजे, उत्पादकतेचा विषयही येथे महत्त्वाचा आहे. या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके आणि त्यांची सरासरी उत्पादकता पाहिल्यास पीक उत्पादकता वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न होण्याची गरज दिसून येते. 

खाजगी सावकारीमुळे शेतकरी अडकतो कर्जाच्या विळख्यात 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांतील ६१.७८ टक्के शेतकऱ्यांनी खरिपामध्ये सोयाबीन पीक घेतले होते. याची सरासरी उत्पादकता हेक्टरी ९.५६ क्विंटल एवढी होती. ५७.१८ टक्के शेतकऱ्यांनी कापूस पीक घेतले होते. याची उत्पादकता प्रतिहेक्टरी ११.२० एवढी होती तर ३३.४३ टक्के शेतकऱ्यांनी वाटाणा लावला होता. याची उत्पादकता प्रतिहेक्टरी ७.३४ क्विंटल एवढी होती. रबीचा विचार करता २८.१२ शेतकऱ्यांकडे हरभरा होता, याची उत्पादकता प्रतिहेक्टरी ७.२० एवढी, ३०.९३ टक्के शेतकऱ्यांनी ज्वारी घेतली होती. याची उत्पादकता हेक्टरी ९.६५ तर गहू घेतलेल्या १६.२५ टक्के शेतकऱ्यांच्या गव्हाची सरासरी उत्पादकता हेक्टरी ११.९९ टक्के एवढी असल्याचे दिसून आले.

मराठवाडयात दुष्काळ, सिंचन सुविधांअभावी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

घटती जमीनधारणा चिंता वाढविणारीघटत्या जमीनधारणेचा प्रश्नही जटील आहे़ मराठवाड्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ३१़५७ टक्के शेतकऱ्यांकडे केवळ १ हेक्टरपर्यंत जमीन होती़ तर ३९़६८ टक्के शेतकऱ्यांकडे १ ते २ हेक्टर एवढीच जमीन होती़ २ ते ४ हेक्टर जमीन असतानाही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या २१़२५ टक्के आहे़ ४ ते १० हेक्टर जमीन असतानाही ६़५६ टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून १० हेक्टरहून अधिक जमीन असताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ०़९४ टक्के इतकी असल्याचे हा अहवाल सांगतो़  

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेतीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ