शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पूल नाही, पण शेती तर करावीच लागेल; सहा गावांतील ग्रामस्थांचा नदीतून जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 19:20 IST

शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून नदीपात्रातून जावे लागते शेतीकडे

- शेख शब्बीरदेगलूर (नांदेड) : पर्यायी पुलाची व्यवस्था नसल्याने देगलूर तालुक्यातील जवळपास पाच व बिलोली तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेताला जाण्यासाठी जीव धोक्यात घालून नदीपात्रातूनच जावे लागत आहे. यामुळे मन्याड नदीवर पर्यायी पुलाची व्यवस्था करून देण्याच्या मागणीचे निवेदन नुकतेच वझरगा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना देऊन प्रकरणात त्यांचे लक्ष वेधले आहे.देगलुर तालुका व बिलोली तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या मन्याड नदीच्या दोन्ही बाजूला बिलोली तालुक्यातील गळेगाव व देगलूर तालुक्यातील वझरगा, तुपशेळगाव, आलूर, शहापूर, लिंबा या गावातील शेतकऱ्यांची जवळपास 500 एकर शेत जमीनी आहेत.  मात्र या शेतकऱ्यांना शेतातील मशागतीच्या कामासह इतर शेती कामासाठी तसेच ये- जा करण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने सदरील शेतकऱ्यांना मन्याड नदीच्या पात्रातूनच जीव मुठीत धरून ये जा करावे लागत असल्याने या ठिकाणी शासनाने पर्यायी पुलाचे बांधकाम करून देण्याची मागणी अनेक वर्षापासून या भागातील शेतकरी वर्गाकडून सातत्याने  केली जात आहे. यापूर्वीही शासनास दोन वेळेस निवेदन देऊन प्रकरणात त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र या प्रश्नाबाबत शासन फारसे गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी ज्या ज्या वेळेस मन्याड नदीला पूर आला त्या त्यावेळी नदी काठा वरील शेतकरी दोन दोन दिवस शेतातच अडकून राहिला होता. त्यावेळी शासनाकडून  मोठी कसरत करीत त्या शेतकऱ्यांना  बोटीद्वारे सुखरूप बाहेर आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागल्याची घटना यापूर्वी अनेक वेळा घडली आहे.त्यातच मागील वर्षी मन्याड नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यंदा जवळपास 35 ते 40 टक्के शेतकऱ्यांनी पेरणीच केली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शासनाने या मन्याड नदीवर एक लहानसा पूल तयार करून द्यावा जेणेकरून पर्यायी पूल उपलब्ध नसल्याकारणाने जीव मुठीत धरून नदी पात्रातुन शेतीला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेसह शेतीच्या मशागती पासून शेतकरी वंचित राहणार नाही अश्या मागणीचे निवेदन  नुकतेच वझरगा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन केली आहे.

जीवितहानी होण्याची शक्यताशेताला जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने नदीच्या पाण्यातूनच जावे लागते. त्यातच अचानकपणे पाण्याचा प्रवाह वाढून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच यंदा अनेक शेतकऱ्यांना पेरणी पासून वंचित रहावे लागले. त्यामुळे शासनाने तात्काळ छोटासा पूल बांधून द्यावा. - मष्णाजी हुलबा औरादे, सरपंच, वझरगा

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र