शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

प्रकल्प आहेत, पाऊसही पडतो; दुष्काळ नियोजनाचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:33 AM

जिल्ह्यात मनार, बाभळी व विष्णूपुरीसारखे मोठे प्रकल्प आहेत़ पावसाचा विचार करता वरुणराजानेही नांदेडवर नेहमीच कृपादृष्टी दाखवलेली आहे़

ठळक मुद्दे३६५ टँकर अपेक्षित टंचाई कार्यक्रमांतर्गत विहीर अधिग्रहणांची प्रस्तावित संख्या १८२४

विशाल सोनटक्के ।नांदेड : जिल्ह्यात मनार, बाभळी व विष्णूपुरीसारखे मोठे प्रकल्प आहेत़ पावसाचा विचार करता वरुणराजानेही नांदेडवर नेहमीच कृपादृष्टी दाखवलेली आहे़ १७ वर्षांत केवळ दोनच वेळा जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाला आहे़ मात्र, त्यानंतरही जिल्हावासियांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो़ उपाययोजनांवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होवूनही प्रशासनाच्या नियोजनाअभावी गावे तहानलेलीच दिसतात़२००२ ते २०१८ या १७ वर्षांतील पर्जन्यमानाचा अभ्यास केला असता, २०१४ साली ४५ टक्के तर २०१५ साली सरासरीच्या ४८़७५ टक्के पाऊस झाला होता़ ही दोन वर्षे वगळली तर जिल्ह्यात सातत्याने समाधानकारक पाऊस होवूनही वाड्या-वस्त्यावरील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे़ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीटंचाई कार्यक्रमांतर्गत यावर्षी विहीर अधिग्रहणांची प्रस्तावित संख्या १८२४ इतकी असून, पंचायत समितीस्तरावर ५९८ प्रस्ताव प्राप्त झाले असून सद्य:स्थितीत ६२८ हून अधिक विहिरींचे ४८६ गावे आणि ३२ वाड्यांवर अधिग्रहण करण्यात आले आहे़पाणी टँकरचा आकडाही असाच वाढत आहे़ प्रशासनाकडे टँकरची ३६५ संख्या प्रस्तावित असून यातील ५८ प्रस्ताव मंजूर झाले आहेत़ येत्या काळात टँकरची ही संख्या वाढण्याची शक्यता आहे़ तर दुसरीकडे टंचाई निवारणार्थ प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे़ यंदाच्या उन्हाळ्यातील उपयायोजनांची ही संख्या तब्बल ५ हजार २८१ वर पोहोचली आहे़ यातून १ हजार ३०५ गावे आणि ६४३ वाड्यांवर टंचाईकृती आराखड्यानुसार ६८२१.३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे़ सद्यस्थितीत विहीर अधिग्रहणाच्या २१६ कामांचे आदेश तहसिलदारांनी जारी केले आहेत़ याचबरोबर ३८ खाजगी तर नऊ शासकीय टँकर्सद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येते आहे़नांदेड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९५४ मि़मी़ इतके आहे़ मागील १७ पैकी १५ वर्षांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असून २००५ मध्ये तर सरासरीहून अधिक म्हणजे १३२ मि़मी़ पाऊस नोंदविला गेला़ २०१० मध्ये १०९ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ तर २०१६ या वर्षात जिल्ह्यात सरासरीहून अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस झाला़ एकूणच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे़ दुसरीकडे, जिल्ह्यात मनार, बाभळी, विष्णूपुरी, उर्ध्व पैनगंगा, सुधा, कुंद्राळा, हणेगाव यासारखे मोठे प्रकल्पही उपलब्ध आहेत़ मात्र त्यानंतरही दरवर्षी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे़ त्यामुळेच पाणीटंचाई निवारणार्थ दरवर्षी होणारा कोट्यवधीचा निधी नेमका जातो कुठे? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे़दरवर्षी होते विशेष नळ अन् विहीर दुरुस्तीपाणीटंचाई निवारणार्थ दरवर्षी कोट्यवधीचा निधी खर्च केला जातो़ जिल्हा परिषदेने घेतलेल्या टंचाई उपाययोजनांची माहिती घेतली असता, २००२ ते २०१८ या १६ वर्षांत प्रशासनाच्या वतीने ६८५ तात्पुरत्या पुरक नळ योजना उभारण्यात आल्या़ याच काळात १७३३ नळयोजनांची विशेष दुरुस्तीही करण्यात आली, हीच बाब विंधन विहिरीसंदर्भात. प्रशासनाने मागील १६ वर्षांत जिल्ह्यात विविध ठिकाणी ४ हजार ७९९ विंधन विहिरी घेतल्या़ तर विंधन विहिरीच्या दुरुस्तीची पंधरा वर्षांत तब्बल १५ हजार २४२ कामे केली़ तात्पुरत्या योजना या टंचाईच्या अनुषंगाने तात्पुरती मलमपट्टी ठरत आहेत़ त्यामुळेच दरवर्षी कोट्यवधीचा निधी खर्चूनही वाड्या-वस्त्या तहानलेल्याच असल्याचे चित्र आहे़१४६४ कामे प्रगतीपथावरयंदा पाणी टंचाई निवारणार्थ १८३४ उपाययोजनांना प्रशासनाने मंजुरी दिली असून यावर ७२०़१३ लाखांचा खर्च झाला आहे़ तर १४६४ उपाययोजनांची कामे प्रगतीपथावर असून या कामांसाठी २७४़२३ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे़ तर ९२४ उपाययोजना प्रशासनाने टंचाई निवारणार्थ पूर्ण केल्या असून यामुळे ५११ गावे आणि ६६ वाड्यांना दिलासा मिळाला आहे़ या उपाययोजनांसाठी १९४़३८ लाखांचा खर्च करण्यात आला आहे़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरणDamधरण