शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

नांदेडच्या गुरुद्वारासमोर गोळीबार अन् खुनाच्या घटनेने ‘मोस्ट वॉन्टेड’ रिंदाचे भूत पुन्हा जिवंत

By राजेश निस्ताने | Updated: March 21, 2025 18:26 IST

कुख्यात रिंदा हा अनेक राज्याच्या पोलिसांना हवा आहे. मोस्ट वॉन्टेड रिंदा नांदेडचा आहे. तो पाकिस्तानात दडून असल्याचा सुरक्षा एजन्सीला संशय आहे

आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर संधू ऊर्फ रिंदा हा मरण पावल्याची वार्ता पसरल्याने नांदेडमधील उद्योजक, व्यापारी बरेच महिने रिलॅक्स होते; परंतु येथील गुरुद्वारा भागात झालेल्या गोळीबार व खुनाच्या घटनेने रिंदाचे भूत पुन्हा एकदा जिवंत झाले आहे. त्यामुळे व्यापारी व उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळते.

कुख्यात रिंदा हा अनेक राज्याच्या पोलिसांना हवा आहे. मोस्ट वॉन्टेड रिंदा नांदेडचा आहे. तो पाकिस्तानात दडून असल्याचा सुरक्षा एजन्सीला संशय आहे; मात्र पाकिस्तानात राहूनही तो नांदेडमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांकडून खंडणी गोळा करतो. यावरून त्याची दहशत लक्षात येते. रिंदाच्या कारवायांची माहिती घेण्यासाठी एनआयए, आयबी, एटीएस, सीबीआय या एजन्सी कायम नांदेड पोलिसांच्या संपर्कात असतात. बहुचर्चित बिल्डर संजय बियाणी यांच्या खून प्रकरणात रिंदा टोळीचा सहभाग उघड झाला होता. रिंदाच्या साथीदारांच्या शोधार्थ नांदेड पोलिसांनी दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश व इतरही राज्यं पालथी घातली होती. त्यावेळी रिंदाचा अन्नातील विषबाधेने मृत्यू झाल्याची वार्ता पसरली होती. या वार्तेमुळे नांदेडमध्ये खंडणीच्या प्रकरणांना काही काळ ब्रेक लागला होता. व्यापारी वर्गही निश्चिंत झाला होता; मात्र आता पुन्हा रिंदा सक्रिय झाला आहे. 

पोलिसांनी त्यावेळी जाणीवपूर्वक रिंदाच्या मृत्यूची वार्ता पसरविल्याची माहिती आहे. या वार्तेमुळे रिंदा व त्याचे साथीदार बेसावध होतील, एखादी चूक करतील व पोलिसांच्या हाती लागतील, हा त्यामागचा उद्देश होता; मात्र रिंदाच्या मृत्यूची अफवा पसरविण्याचा फंडा फेल ठरला. रिंदा व त्याच्या टोळीकडून होणाऱ्या कारवाया नांदेड पोलिसांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरल्या आहेत. भावाच्या खुनातील पॅरोलवर सुटलेल्या आरोपीला संपविण्यासाठी रिंदा टोळीने नुकताच गुरुद्वारा परिसरात भरदिवसा गोळीबार केला; मात्र त्यात आरोपी वाचला. त्याचा साथीदार बळी ठरला. ते पाहता त्या आरोपीला उडविण्यासाठी रिंदा टोळीकडून पुन्हा हालचाली होतील, एवढे निश्चित. एकदा गोळीबार करायचा, त्यातून दहशत निर्माण करायची आणि वर्षभर खंडणी उकळायची हा रिंदा टोळीचा मनसुबा आहे. 

आजही खंडणीसाठी रिंदाचे कॉल येत असल्याचे सांगितले जाते; मात्र कोणी व्यापारी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. संजय बियाणी खून प्रकरणानंतर व्यापारी, उद्योजकांनी रिव्हॉल्व्हर परवाना मिळविण्यासाठी पोलिसांकडे अर्ज करण्याचा सपाटा लावला होता. कोणी तक्रारी देण्यासाठी पुढे येत नसल्यानेच खंडणीखोरांचे फावते आहे. रिंदा टोळीला पकडण्याबाबत पोलिसांच्याही मर्यादा आहेत. थेट पोलिसांनाच धमकी देण्याचेही प्रकार घडतात. एका पोलिस अधिकाऱ्याने रिंदाला गोळ्या घालून ठार मारू असे वक्तव्य खासगीत केले; मात्र हे वक्तव्य खाकीतीलच कुण्या खबऱ्याने रिंदा टोळीपर्यंत पोहोचविले. त्यानंतर रिंदानेच त्या पोलिस अधिकाऱ्याला फोन करून मुलाबाळांना पाहून घेण्याची धमकी दिली. तेव्हापासून हा अधिकारी रिंदा या विषयावर शांतच झाल्याचे सांगितले जाते. रिंदा व त्याचे साथीदार कारागृहातूनही आपल्या कारवाया सुरूच ठेवतात. रिंदा व त्याची टोळी नांदेड पोलिसच नव्हे तर राज्य व देशातील तमाम सुरक्षा एजन्सीसाठी खुले आव्हान ठरले आहे.

रिंदाच कॉल करतोय की आणखी कुणी ?रिंदाच्या कॉलबाबत नेहमीच संशयाचे वातावरण पाहायला मिळते. रिंदाच्या नावाने दुसरेच लोक कॉल करतात, त्याचे नाव व दहशत वापरून खंडणी उकळतात. त्यामुळे खंडणी खरंच रिंदा उकळतो की त्याच्या नावाचा वापर होतो, याबाबत व्यापारीच नव्हे तर पोलिस यंत्रणेतही कायम संशयाचे वातावरण पाहायला मिळते. या खंडणीपायी अनेकांनी आपले उद्योग, व्यापार शेजारील राज्यात तसेच पुण्याला शिफ्ट केले आहेत. आणखी काही जण नांदेड सोडण्याच्या मानसिकतेप्रत आले आहेत. रिंदाची अटक होईस्तोवर नांदेडमधील व्यापारी, उद्योजकांचा जीव टांगणीला राहील, एवढे निश्चित.

पोलिसातही शीतयुद्धपोलिस अधिकाऱ्यांपुढे आंतरराष्ट्रीय दहशतवादी रिंदाच्या अटकेचे आव्हान असताना पोलिस यंत्रणा मात्र अंतर्गत लढाईतच गुंतून पडली आहे. अवैध धंदे बंद करा या पोलिस उपमहानिरीक्षकाच्या आदेशाने जिल्ह्याची संपूर्ण पोलिस यंत्रणा त्रस्त आहे. त्यात अधिकारी आपल्या स्तरावरच जमेल तसे 'ॲडजेस्ट' करीत असल्याने कर्मचाऱ्यांना कुणी विचारेना झाले आहे. याच धंद्यावरील धाडीतून दोन पोलिस अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. कंधार तालुक्यातील एका रेती घाटावर वरिष्ठाने धाड घातली होती. त्यानंतर कनिष्ठाने स्वत:कडे वरिष्ठाचा प्रभार असताना पुन्हा त्याच घाटावर धाड घातली. १५ दिवसांत दुसऱ्यांदा धाड कशाला म्हणून त्या वरिष्ठ व कनिष्ठामध्ये शीतयुद्ध पेटल्याचे सांगितले जाते. आजघडीला पोलिसांचे डिटेक्शन दिसते आहे. त्याचा प्रॉपर गाजावाजाही करून घेतला जात आहे. प्रकाशित बातम्या दुसऱ्या दिवशी मोबाइल स्टेटसवर ठेवून कामगिरी दाखविण्याचाही प्रयत्न होतो आहे; मात्र सहा वर्षांपूर्वी आपल्याच एका पोलिस जमादाराचा भरदिवसा झालेल्या खुनातील आरोपी जिल्ह्याच्या तमाम एक्सपर्ट पोलिस यंत्रणेला अद्याप शोधता आलेला नाही. यातच जिल्हा पोलिस दलाचे डिटेक्शनमधील खरे अपयश लपलेले आहे. पोलिसाचा हा खून व त्यातील सहा वर्षांपासून हुलकावणी देणारा मारेकरी स्थानिक तमाम पोलिस यंत्रणेला आत्मचिंतन करायला लावणारा आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीterroristदहशतवादी