शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

थापाड्या सरकारला हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुखेड/देगलूर : मागील चार वर्षांचा अनुभव पाहता हे सरकार ‘आवळा देवून कोहळा’ काढणारे थापाड्यांचे फसवणीस सरकार ...

ठळक मुद्देमुखेड, देगलूरमध्ये जनसंघर्षअशोक चव्हाण यांचा सेना-भाजपवर घणाघाती हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कमुखेड/देगलूर : मागील चार वर्षांचा अनुभव पाहता हे सरकार ‘आवळा देवून कोहळा’ काढणारे थापाड्यांचे फसवणीस सरकार आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या या सत्ताधा-यांना आगामी काळात त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. मुखेड येथे आयोजित विराट सभेत ते बोलत होते.मंचावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात,हर्षवर्धन पाटील,नसीम खान, बस्वराज पाटील, राजू वाघमारे, आ. वसंत चव्हाण यांच्यासह हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, रोहिदास चव्हाण, बाबूराव देबडवार, दिलीप पाटील बेटमोगरेकर, वैशालीताई चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तर देगलूर येथे झालेल्या सभेला माजी आ. रावसाहेब अंतापूरकर, नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, शंकर कंतेवार, शिवाजीराव देशमुख, रामराव नाईक, अनिल पाटील खानापूरकर, जनार्दन बिरादार, दिनेश मुनगिनवार यांच्यासह पदाधिका-यांची उपस्थिती होती.केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरही अशोकराव चव्हाण यांनी घणाघाती हल्ला चढविला. मोदी यांच्या सरकारमुळे देशाच्या संविधानाबरोबरच सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग या संस्था देखील आपली स्वायतत्ता गमावत असल्याचे सांगत मागील काही दिवसांपासून सर्वोच्च तपास यंत्रणा म्हणून ओळख असलेल्या सीबीआयमध्येही सरकारच्या हस्तक्षेपामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील व देशातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून वाढती बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, इंधनाचे वाढलेले दर अशा ज्वलंत प्रश्नांकडे शासनाकडून कानाडोळा केला जात आहे. या प्रश्नांमुळेच शेतक-यांसह सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. अशा सरकारला सर्वसामान्यांनी एकजुटता दाखवून आगामी निवडणुकात धडा शिकवावा, असे आवाहन खा. चव्हाण यांनी केले.समाजा-समाजात तेढ निर्माण करुन मतांची झोळी भरण्याचा या सरकारचा कुटील डाव आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे छिंदम सारखा भाजपाचा नगरसेवक शिवरायांची अवहेलना करतो, हेच भाजपा आ. राम कदम याच्या वक्तव्यावरुनही दिसून आले. सत्ताधारी पक्षातील हा आमदार मुलींना पळवून नेण्याची भाषा करतोच कसा ? असा सवाल करीत अशा निर्लज्ज लोकावर कारवाई करण्याऐवजी सत्ताधारी अशा लोकांची पाठराखण करीत आहेत, ही बाब दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.प्रारंभी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात मराठवाड्यात झालेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. याबरोबरच हर्षवर्धन पाटील यांनीही अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठवाड्यासह खानदेशच्या विकासासाठी घेतलेल्या विविध लोकोपयोगी निर्णयाची आठवण करुन दिली. सध्या दुष्काळाने मराठवाडा होरपळत असताना राज्य सरकार ठोस निर्णय घेण्याऐवजी चालढकल करीत असल्याचा आरोपही हर्षवर्धन पाटील यांनी केला. देगलूर येथील सभेपूर्वी माजी आ. रावसाहेब अंतापूरकर यांनी प्रास्ताविक केले. सभेला विराट जनसमुदाय उपस्थित होता.

अपयशामुळेच ‘मंदिर बनायेंगे’ चा नाराराज्य व केंद्र सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. या सरकारच्या कार्यकाळात समाजातील कोणताही घटक समाधानी नाही. उलट राज्यात तसेच देशात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत या अपयशामुळेच भाजपाने पुन्हा एकदा ‘मंदिर वही बनायेंगे’ चा नारा सुरु केल्याची टिकाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण यांनी केली. निवडणुकीपूर्वी भरमसाठ आश्वासने दिलेले हे सरकार चार वर्षे कारभार पाहिल्यानंतरही काय केले हे सांगण्याऐवजी काय करणार? याचीच उजळणी करीत असल्याचे सांगत हा राज्यातील आणि देशातील जनतेशी केलेला विश्वासघात असल्याचे ते म्हणाले. आगामी काळात सत्ताधारी पक्षाकडून राज्यात हिंदू, मुस्लिम, दलित असा संघर्ष उभा केला जाण्याची शक्यता व्यक्त करीत नांदेड जिल्ह्यातील मतदार धर्मनिरपेक्ष काँग्रेसच्या पाठीशी राहिलेला आहे. आगामी निवडणुकातही जिल्ह्यातील जनता काँग्रेसच्याच पाठीशी ठामपणे उभी राहिलेली दिसेल,असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा