शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

पाणीटंचाई कायम असताना टँकर बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 01:02 IST

शासकीय टँकरला जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ दिली नसल्याने सेनगाव शहरातील टँकरचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद झाला असून शहरातील भिषण पाणीटंचाई कायम आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती सेनगाव शहरातील तीन दिवसांपासून पाणीप्रश्न गंभीर

सेनगाव : शासकीय टँकरला जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ दिली नसल्याने सेनगाव शहरातील टँकरचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद झाला असून शहरातील भिषण पाणीटंचाई कायम आहे.भिषण पाणीटंचाईने ग्रासलेल्या सेनगाव शहरात जानेवारी महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. यंदा येथे बिकट स्थिती होती. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने उपाययोजना म्हणून पाच शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. परंतु या टँकरचा कालावधी ३० जूनला संपला असल्याने शहरातील टँकरचा पाणीपुरवठा थांबला आहे. तालुक्यात जुलै उजाडला तरी मोठा पाऊस नाही. नदी-नाले, विहीर-बोअर, तलाव कोरठेठाक असताना प्रशासनाने टँकरला तातडीने वाढीव मुदत देण्याची गरज होती. या प्रकाराकडे दुर्लक्ष केले असून मागील तीन दिवसांपासून शहरात पाणीटंचाईने गंभीर रुप धारण केले आहे. एक जुलैपासून शहरात टँकर आले नसल्याने सर्व भागात पाणीटंचाई भिषण बनली आहे. पावसाने पाठ दाखवली असताना दुसरीकडे टँकर बंद झाल्याने शहरवासीयांवर दुहेरी संकट ओढावले आहे. तीन दिवसांपासून पाण्यासाठी भंटकती सुरू आहे. नागरिक प्रशासनाच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त करीत आहे. शहरात बनलेला भिषण पाणी टंचाईचा अनुषंगाने येथील नगराध्यक्ष संदीप बहिरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देवून टँकरला मुदतवाढ देण्याची मागणी केली. परंतु या मागणीची प्रशासनाने गंभीरतेने दखल घेतली नसल्याने सरते शेवटी शहरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. नगरपंचायतच्या वतीने टँकरला मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठविल्याचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी सांगितले. परंतु अद्याप कुठल्याही स्वरूपाची कारवाई झाली नसल्याने टँकरच्या मुदतवाढीसंदर्भात प्रशासन केव्हा निर्णय घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शहरात भीषण पाणीटंचाई; मोठा पाऊसही नाहीसेनगाव तालुक्यात जुलै उजाडला तरी अद्याप मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी-नाले, विहीर-बोअर, तलाव कोरठेठाक आहेत. त्यामुळे येथील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. येथील पाणीप्रश्न पाहता प्रशासनाने टँकरला तातडीने वाढीव मुदत देण्याची गरज होती. या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून सेनगाव शहरात पाणीटंचाईने गंभीर रुप धारण केले आहे. परिणामी भर पावसाळ्यात नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असल्याचे चित्र निर्माण झाले. टँकरचा कालावधी ३० जूनला संपला असल्याने शहरातील टँकरचा पाणीपुरवठा थांबला आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक