शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
2
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
3
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
4
OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली... 
5
लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण 
6
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
7
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
8
Stock Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण, ३०० अंकांपेक्षा जास्त घसरण; Nifty २५००० च्या खाली, NBFC Stocks आपटले
9
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
10
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
11
'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."
12
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
13
'मुरांबा'मध्ये एन्ट्री केलेल्या 'या' चिमुकलीने हिंदीतही केलंय काम, ओळखलंत का?
14
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
15
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
16
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
17
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
18
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
19
पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय
20
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब

पाणीटंचाई कायम असताना टँकर बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 01:02 IST

शासकीय टँकरला जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ दिली नसल्याने सेनगाव शहरातील टँकरचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद झाला असून शहरातील भिषण पाणीटंचाई कायम आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती सेनगाव शहरातील तीन दिवसांपासून पाणीप्रश्न गंभीर

सेनगाव : शासकीय टँकरला जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ दिली नसल्याने सेनगाव शहरातील टँकरचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद झाला असून शहरातील भिषण पाणीटंचाई कायम आहे.भिषण पाणीटंचाईने ग्रासलेल्या सेनगाव शहरात जानेवारी महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. यंदा येथे बिकट स्थिती होती. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने उपाययोजना म्हणून पाच शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. परंतु या टँकरचा कालावधी ३० जूनला संपला असल्याने शहरातील टँकरचा पाणीपुरवठा थांबला आहे. तालुक्यात जुलै उजाडला तरी मोठा पाऊस नाही. नदी-नाले, विहीर-बोअर, तलाव कोरठेठाक असताना प्रशासनाने टँकरला तातडीने वाढीव मुदत देण्याची गरज होती. या प्रकाराकडे दुर्लक्ष केले असून मागील तीन दिवसांपासून शहरात पाणीटंचाईने गंभीर रुप धारण केले आहे. एक जुलैपासून शहरात टँकर आले नसल्याने सर्व भागात पाणीटंचाई भिषण बनली आहे. पावसाने पाठ दाखवली असताना दुसरीकडे टँकर बंद झाल्याने शहरवासीयांवर दुहेरी संकट ओढावले आहे. तीन दिवसांपासून पाण्यासाठी भंटकती सुरू आहे. नागरिक प्रशासनाच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त करीत आहे. शहरात बनलेला भिषण पाणी टंचाईचा अनुषंगाने येथील नगराध्यक्ष संदीप बहिरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देवून टँकरला मुदतवाढ देण्याची मागणी केली. परंतु या मागणीची प्रशासनाने गंभीरतेने दखल घेतली नसल्याने सरते शेवटी शहरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. नगरपंचायतच्या वतीने टँकरला मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठविल्याचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी सांगितले. परंतु अद्याप कुठल्याही स्वरूपाची कारवाई झाली नसल्याने टँकरच्या मुदतवाढीसंदर्भात प्रशासन केव्हा निर्णय घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शहरात भीषण पाणीटंचाई; मोठा पाऊसही नाहीसेनगाव तालुक्यात जुलै उजाडला तरी अद्याप मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी-नाले, विहीर-बोअर, तलाव कोरठेठाक आहेत. त्यामुळे येथील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. येथील पाणीप्रश्न पाहता प्रशासनाने टँकरला तातडीने वाढीव मुदत देण्याची गरज होती. या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून सेनगाव शहरात पाणीटंचाईने गंभीर रुप धारण केले आहे. परिणामी भर पावसाळ्यात नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असल्याचे चित्र निर्माण झाले. टँकरचा कालावधी ३० जूनला संपला असल्याने शहरातील टँकरचा पाणीपुरवठा थांबला आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक