शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

पाणीटंचाई कायम असताना टँकर बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 01:02 IST

शासकीय टँकरला जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ दिली नसल्याने सेनगाव शहरातील टँकरचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद झाला असून शहरातील भिषण पाणीटंचाई कायम आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती सेनगाव शहरातील तीन दिवसांपासून पाणीप्रश्न गंभीर

सेनगाव : शासकीय टँकरला जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ दिली नसल्याने सेनगाव शहरातील टँकरचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद झाला असून शहरातील भिषण पाणीटंचाई कायम आहे.भिषण पाणीटंचाईने ग्रासलेल्या सेनगाव शहरात जानेवारी महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. यंदा येथे बिकट स्थिती होती. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने उपाययोजना म्हणून पाच शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. परंतु या टँकरचा कालावधी ३० जूनला संपला असल्याने शहरातील टँकरचा पाणीपुरवठा थांबला आहे. तालुक्यात जुलै उजाडला तरी मोठा पाऊस नाही. नदी-नाले, विहीर-बोअर, तलाव कोरठेठाक असताना प्रशासनाने टँकरला तातडीने वाढीव मुदत देण्याची गरज होती. या प्रकाराकडे दुर्लक्ष केले असून मागील तीन दिवसांपासून शहरात पाणीटंचाईने गंभीर रुप धारण केले आहे. एक जुलैपासून शहरात टँकर आले नसल्याने सर्व भागात पाणीटंचाई भिषण बनली आहे. पावसाने पाठ दाखवली असताना दुसरीकडे टँकर बंद झाल्याने शहरवासीयांवर दुहेरी संकट ओढावले आहे. तीन दिवसांपासून पाण्यासाठी भंटकती सुरू आहे. नागरिक प्रशासनाच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त करीत आहे. शहरात बनलेला भिषण पाणी टंचाईचा अनुषंगाने येथील नगराध्यक्ष संदीप बहिरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देवून टँकरला मुदतवाढ देण्याची मागणी केली. परंतु या मागणीची प्रशासनाने गंभीरतेने दखल घेतली नसल्याने सरते शेवटी शहरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. नगरपंचायतच्या वतीने टँकरला मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठविल्याचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी सांगितले. परंतु अद्याप कुठल्याही स्वरूपाची कारवाई झाली नसल्याने टँकरच्या मुदतवाढीसंदर्भात प्रशासन केव्हा निर्णय घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शहरात भीषण पाणीटंचाई; मोठा पाऊसही नाहीसेनगाव तालुक्यात जुलै उजाडला तरी अद्याप मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी-नाले, विहीर-बोअर, तलाव कोरठेठाक आहेत. त्यामुळे येथील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. येथील पाणीप्रश्न पाहता प्रशासनाने टँकरला तातडीने वाढीव मुदत देण्याची गरज होती. या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून सेनगाव शहरात पाणीटंचाईने गंभीर रुप धारण केले आहे. परिणामी भर पावसाळ्यात नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असल्याचे चित्र निर्माण झाले. टँकरचा कालावधी ३० जूनला संपला असल्याने शहरातील टँकरचा पाणीपुरवठा थांबला आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक