शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'ताई, आई-वडिलांची काळजी घे...'; सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:03 IST

काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल लागला असून संतोषला ८४ टक्के गुण मिळाले होते.

नांदेड: शहरात शिकण्यासाठी आलेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २७ जून रोजी दुपारी नांदेडच्या उदयनगर येथे घडली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. संतोष गंगाधर राऊळ असे मृत मुलाचे नाव आहे. 

शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या उदयनगर येथे साईप्रसाद या इमारतीत मानवत येथील संतोष गंगाधर राऊळ (वय १७) हा विद्यार्थी भाड्याने राहत होता. तो अभ्यासात हुशार होता, काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल लागला असून संतोषला ८४ टक्के गुण मिळाले होते. तर दहावीत तो ९४ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. दरम्यान, नांदेडात खासगी शिकवणीसाठी तो रूम घेऊन राहत होता. अभ्यासाच्या ताण-तणावातून संतोषने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, नेमके कारण समजू शकलेले नाही.

सोमवारी सकाळी संतोष आपल्या मित्रांसाेबत चहा घ्यायला गेला होता. रूमवर परतल्यानंतर काही वेळाने याच इमारतीत राहणाऱ्या संतोषच्या मित्राने ११ वाजता दार वाजवून त्याला आवाज दिला. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मित्राने खिडकीतून पाहिले असता त्याचा मृतदेह लटकलेला दिसला. त्यानंतर इतर मित्र आणि घरमालकांना ही माहिती दिली. दरम्यान, पोलिसांना कळविल्याने भाग्यनगर ठाण्यातील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. संतोषच्या पालकांना मानवत येथून पाचारण करण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांनी सांगितले.

ताई आई-वडिलांची काळजी घे...संतोषने आत्महत्येपूर्वी इंग्रजीमध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात बहिणीला आई-वडिलांची शेवटपर्यंत काळजी घे, अशी भावनिक साद संतोषने घातली आहे. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या आई-वडिलांनी संतोषचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला.

टॅग्स :Deathमृत्यूEducation Sectorशिक्षण क्षेत्रNandedनांदेडparabhaniपरभणी