शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

खाणाऱ्याला गोडवा,पिकवणाऱ्याच्या हाती भोपळा; कवडीमोल भावामुळे टरबूजावर फिरवला कोयता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 17:02 IST

लागवडीचा खर्चही निघत नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत

- गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड): चार ते पाच रूपये किलो भाव मिळत असल्याने टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील शेतकऱ्याने तर लागदिच्या खर्च सुद्धा निघत नसल्याने टरबूज पिकावर कोयता फिरवला आहे. यामुळे शेतात अक्षरश: टरबूजाचा चिखल दिसत होता. 

अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील शेतकरी विठ्ठल बालाजी सोनवणे यांच्या गट नं.१०६ मध्ये तिन एकर क्षेत्रावर टरबूजाची लागवड केली आहे. यासाठी सरासरी दिड लाख रुपये खर्च केला. टरबूज लागवडीनंतर शेतकऱ्यांनी ३ महिने वेळोवेळी खते, औषधी, पाणी दिले. उत्पादनही भरपूर निघत आहे. परंतु, एप्रिल मे महिन्यात बाजारात टरबुजाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कवडीमोल भाव मिळत आहे. दोन पैसे पदरात पडतील या आशेने लावलेल्या टरबूजांवर केलेला खर्चही निघत नाही. वाहतुकीचा खर्चही निघत नाही. बाजारात तर शेतकऱ्यांवर फुकट टरबूज देण्याची वेळ आली आहे. यामुळे हतबल शेतकरी सोनवणे यांनी टरबूज वेलींवर कोयता फिरवला. 

शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र सध्या बाजारात टरबूजाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांकडून टरबुजाला दोन ते चार रुपये प्रति किलोप्रमाणे दर मिळत आहे. यामुळे पन्नास ते साठ रुपये किमतीचे टरबूज केवळ पाच दहा रुपयांत विक्री होट आहे. कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्चही पडत नाही. अनेक शेतकरी तर विक्रीकरिता आणलेले टरबूज बाजारात तसेच सोडून घरी परतले. अशी बिकट परिस्थिती उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. यासोबतच खरबूज, काकडी आदी पिके कमी दराने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात निराशा आली आहे.

बाजारपेठेत व्यापाऱ्यांचीच चलतीव्यापारी बांधावर येऊन मनमानी भावाने टरबूज माल मागत आहेत. स्वतः शेतकऱ्याने टरबुज बाजारात नेले तरीही आडतीमधील व्यापारी कमी भावात माल खरेदी करत आहेत. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. लागवडीचा खर्च सुद्धा निघाला नाही. आता पुढील पेरणीचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आहे.- विठ्ठल सोनवणे (शेतकरी), पांगरी ता. अर्धापूर

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेड