शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

खाणाऱ्याला गोडवा,पिकवणाऱ्याच्या हाती भोपळा; कवडीमोल भावामुळे टरबूजावर फिरवला कोयता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 17:02 IST

लागवडीचा खर्चही निघत नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत

- गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड): चार ते पाच रूपये किलो भाव मिळत असल्याने टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील शेतकऱ्याने तर लागदिच्या खर्च सुद्धा निघत नसल्याने टरबूज पिकावर कोयता फिरवला आहे. यामुळे शेतात अक्षरश: टरबूजाचा चिखल दिसत होता. 

अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील शेतकरी विठ्ठल बालाजी सोनवणे यांच्या गट नं.१०६ मध्ये तिन एकर क्षेत्रावर टरबूजाची लागवड केली आहे. यासाठी सरासरी दिड लाख रुपये खर्च केला. टरबूज लागवडीनंतर शेतकऱ्यांनी ३ महिने वेळोवेळी खते, औषधी, पाणी दिले. उत्पादनही भरपूर निघत आहे. परंतु, एप्रिल मे महिन्यात बाजारात टरबुजाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कवडीमोल भाव मिळत आहे. दोन पैसे पदरात पडतील या आशेने लावलेल्या टरबूजांवर केलेला खर्चही निघत नाही. वाहतुकीचा खर्चही निघत नाही. बाजारात तर शेतकऱ्यांवर फुकट टरबूज देण्याची वेळ आली आहे. यामुळे हतबल शेतकरी सोनवणे यांनी टरबूज वेलींवर कोयता फिरवला. 

शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र सध्या बाजारात टरबूजाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांकडून टरबुजाला दोन ते चार रुपये प्रति किलोप्रमाणे दर मिळत आहे. यामुळे पन्नास ते साठ रुपये किमतीचे टरबूज केवळ पाच दहा रुपयांत विक्री होट आहे. कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्चही पडत नाही. अनेक शेतकरी तर विक्रीकरिता आणलेले टरबूज बाजारात तसेच सोडून घरी परतले. अशी बिकट परिस्थिती उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. यासोबतच खरबूज, काकडी आदी पिके कमी दराने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात निराशा आली आहे.

बाजारपेठेत व्यापाऱ्यांचीच चलतीव्यापारी बांधावर येऊन मनमानी भावाने टरबूज माल मागत आहेत. स्वतः शेतकऱ्याने टरबुज बाजारात नेले तरीही आडतीमधील व्यापारी कमी भावात माल खरेदी करत आहेत. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. लागवडीचा खर्च सुद्धा निघाला नाही. आता पुढील पेरणीचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आहे.- विठ्ठल सोनवणे (शेतकरी), पांगरी ता. अर्धापूर

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेड