शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

स्वारातीम विद्यापीठाची प्रश्नपत्रिका मोबाईलमध्ये व्हायरल; बी.एस्सी तृतीय वर्षाचे २ पेपर रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 13:52 IST

आता या पेपरची एकाच दिवशी १६ जुलै रोजी होणार पुनर्परीक्षा

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत बी.एस्सी तृतीय वर्षाच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्येच प्रश्नपत्रिका आढळून आली. त्यामुळे १४ जून रोजी घेण्यात आलेले दोन पेपर रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. सदरील दोन्ही पेपर १६ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून बी. एस्सीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यात १४ जून रोजी बी. एस्सी तृतीय वर्षाच्या सहाव्या सत्रासाठी परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये पेपर कोड एसबी-०६९ आणि एसबी - ०७१ या विषयांचा समावेश होता. सदरील पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये आढळून आले. हा प्रकार लातूर जिल्ह्यातील दयानंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर उघडकीस आला. यासंदर्भात आलेल्या तक्रारी आणि सदर प्रकारामुळे १४ जून रोजी घेण्यात आलेले दोन्ही पेपर रद्द करण्याचे आदेश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी दिले आहेत. त्यानुसार आता सदर पेपर एक महिन्यानंतर जुलै महिन्यात होणार आहेत.

दोन्ही पेपर पुन्हा एकाच दिवशीबीएस्सी तृतीय वर्षाचे रद्द करण्यात आलेले पेपर १६ जुलै रोजी घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या नियोजनानुसार दोन्ही विषयाची पुनर्परीक्षा १६ जुलै रोजी सकाळी १० ते १२.३० या वेळेत होईल. यामध्ये पेपर कोड - एसबी ०६९ (गणित) आणि पेपर कोड एसबी - (प्राणिशास्त्र) विषयांचा समावेश आहे. दोन्ही पेपर एकाच वेळेत एकाच दिवशी होणार आहेत.

घडल्या प्रकाराची चौकशी सुरूलातूर जिल्ह्यातील एका केंद्रावर विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका आढळून आल्या. या प्रकाराची चौकशी सुरू आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. परीक्षेत पारदर्शकात राहावी म्हणून दोन्ही पेपर रद्द केले आहेत. १६ जुलै रोजी पुनर्परीक्षा घेऊन निकालदेखील वेळेवर लावला जाईल.- डी. एम. नेटके, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ.

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडexamपरीक्षाEducationशिक्षण