शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आगामी काळात साखरेचे दर वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:20 IST

पुढील वर्षी आपल्याच देशाला साखरेची आयात करावी लागण्याची शक्यता आहे़ त्यामुळे साखरेचे भाव वाढणार आहेत़

ठळक मुद्देऊस परिषद : स्वाभिमानीचे खा़ राजू शेट्टी यांची माहिती

नांदेड : यंदा जगभरात साखरेचे उत्पादन कमी झाले आहे़ पुढील वर्षी आपल्याच देशाला साखरेची आयात करावी लागण्याची शक्यता आहे़ त्यामुळे साखरेचे भाव वाढणार आहेत़ त्यामुळे साखर कारखान्यांना एफआरपी वाढवून देणे परवडणारे आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा़ राजू शेट्टी यांनी केले़नांदेडात आयोजित पहिल्या ऊस परिषदेत ते बोलत होते़ खा़शेट्टी म्हणाले, केवळ भाषणे करुन न्याय मिळणार नाही़ तो तसा मिळाला असता तर नाना पाटेकर क्रांतिवीर झाले असते़ भाषणाला चळवळीची जोड देणे आवश्यक आहे़ शेतकऱ्यांची पोरे ज्यावेळी ज्ञानेश्वर होतील त्यावेळी कारखानदारांचे रेडे वेद म्हणतील़ एकरकमी एफआरपी देता येणे शक्य नसल्याची कारखानदारांची ओरड आहे़ परंतु, ऊस दर नियंत्रण अध्यादेशाप्रमाणे तोडणीनंतर १४ दिवसांच्या आत शेतकºयाच्या खात्यावर एकरकमी रक्कम जमा झाली पाहिजे़ अन्यथा जप्तीची कारवाई होवू शकते़ कायदाही शेतकºयांच्याच बाजूने आहे़ कर्जमाफी केली ; पण निकषांनी घात केला़ शेतकºयांच्या हमीभावासंदर्भात मसुदा तयार केला असून २१ पक्षांनी या मसुद्याला पाठिंबा दिल्याचेही खा़शेट्टी म्हणाले़ तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सरकारवर सडकून टीका केली़ ते म्हणाले, शरद जोशींच्या काळात चळवळीचे केंद्र नांदेड होते़ शेतकºयाची मुले ही वाघाची बछडे आहेत़ त्यांनी डरकाळी मारली तर महाराष्ट्र हादरेल़ बोंडअळीने शेतकºयांचे नुकसान केले़ यावर्षी पुन्हा ती आली़ यामागे मंत्री अन् कंपन्यांचे साटेलोटे आहे़ कंपन्याकडून मंत्री कमिशन घेतात़ आरक्षणावरुनही मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा उद्योग सुरु आहे, असेही ते म्हणाले़ प्रास्ताविक प्रा़डॉ़प्रकाश पोपळे यांनी केले़ तर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी एफआरपीचे थकीत दहा कोटी मिळविण्यासाठी कराव्या लागलेल्या संघर्षाचा आढावा घेतला़ जिल्ह्यात स्वाभिमानीचे जाळे निर्माण करताना आलेल्या अडचणीही त्यांनी मांडल्या़ परिषदेच्या अध्यक्षस्थानी माणिकराव राजेगोरे तर प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री सुबोध मोहिते, हनुमंत राजेगोरे, माणिक कदम, देवेंद्र भुयार, भगवानराव शिंदे, किशोर ढगे, अमित आघाव यांची उपस्थिती होती़सेनेच्या अयोध्या दौ-याला भाजपची फूसमहाराष्ट्रात दुष्काळ असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख अयोध्या दौ-यावर गेले़ त्यांच्या अयोध्या दौ-याला भाजपाची फूस आहे़ कारण, मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगवान श्रीराम उद्धव ठाकरे यांना आशीर्वाद देतील असे म्हटले आहे़ तसेच आमची युती आणखी पक्की होईल असेही भाजपाचे नेते सांगत सुटले आहेत़ त्यामुळे सेनेला पुढे जावून ओपनिंग तेवढी तुम्ही करा बाकी बॅटींग आम्ही करतो, असे भाजपाचे धोरण आहे़ श्रीरामाबद्दल आम्हालाही आस्था आहे़ परंतु एवढे वर्षे मंदिर झाले नाही़ तर कुठे फरक पडला काय? पहिले शेतकºयांच्या घामाचे पैसे द्या अन् नंतर मंदिर बांधा असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले़

टॅग्स :NandedनांदेडRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने