शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

यंदापासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषद निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 17:44 IST

तब्बल २५ वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकांचे विद्यार्थी वर्गातून स्वागत होत आहे.

ठळक मुद्दे२५ वर्षानंतर पुन्हा प्रक्रियाकुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांची माहिती

नांदेड: महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद निवडणुकीतून  अनेक नवे नेतृत्व उदयास येत होते. मात्र राजकीय हस्तक्षेप आणि विद्यार्थ्यांच्या गटातील वाढत्या भांडणतंट्यामुळे या निवडणुकाच बंद करण्यात आल्या होत्या. मात्र चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी परीषद निवडणुका घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तब्बल २५ वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकांचे विद्यार्थी वर्गातून स्वागत होत आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभागृहामध्ये कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली. यावेळी शिक्षणतज्ज्ञ आनंद माणूसकर (मुंबई), प्राचार्य डॉ. जोगेंद्रसिंघ बिसेन, कुलसचिव डॉ. आर.एम. मुलानी यांच्यासह परमेश्वर हासबे, ज्ञानोबा मुंडे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार या निवडणुका घेण्यात येणार आहेत. याबाबत कुलगुरु डॉ. भोसले म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण असतात. या गुणाला संधी मिळावी या हेतूने वरील नव्या अधिनियमानुसार निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुका पारदर्शी मोकळ्या वातावरणात आणि भयरहीत होण्यासाठी महाविद्यालयांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. डॉ. बिसेन यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे प्रश्न प्राधान्याने सुटावेत, याच हेतूने सदर निवडणुका घेण्यात येणार असून यामुळे विद्यार्थ्यांत सामाजिक जाणीवही निर्माण होईल. क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील नवे नेतृत्वही या माध्यमातून उदयास येईल. या अनुषंगाने विद्यार्थी परीषदेची दर तीन महिन्याला बैठक होणार असून राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामधूनही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात येईल.

एक विद्यार्थी ५ पदासाठी करणार मतदान शिक्षणतज्ज्ञ माणूसकर यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती दिली. सदर अधिनियम मागच्यावर्षी लागू झाला. मात्र उशीर झाल्यामुळे मागील वर्षी विद्यार्थी परीषदेच्या निवडणुका घेता आल्या नाहीत. त्या यावर्षी घेण्यात येणार आहेत. एका विद्यार्थ्याला पाच मतदान करण्याचा अधिकार राहणार असून, त्यामध्ये एक वर्ग प्रतिनिधी, दुसरा अध्यक्ष, तिसरा सचिव, चौथा महिला प्रतिनिधी आणि पाचवा मागासवर्गीय प्रतिनिधी असणार आहे. वर्ग प्रतिनिधी सोडून इतर चार पदे महाविद्यालयांतून निवडून द्यायची आहेत. त्यानंतर विद्यापीठस्तरावर पसंती क्रमाने या चार विद्यार्थी परिषद गठीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच यासाठी विद्यापीठातर्फे ३१ जुलैपर्यंत निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबरपूर्वी निवडणूक घेऊन विद्यापीठ विद्यार्थी परिषद स्थापन करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले. 

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडStudentविद्यार्थीElectionनिवडणूकNandedनांदेड