शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

महायुतीतील 'गृह'कलहामुळे रिपोर्ट कार्डचा फंडा, संभाव्य मंत्र्यांची गोची

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 19:56 IST

आमदार म्हणताहेत, मी कार्यकर्ता, साहेब विचार करतील

नांदेड : महायुतीला जनतेने एकहाती सत्ता देऊनही सत्ता स्थापनेसाठी विलंब होत आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री भाजपचा होणार, असे ठरले आहे. परंतु, महायुतीतील 'गृह'कलहामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माजी मंत्री, आमदारांचे रिपोर्ट कार्ड तपासूनच मंत्रिमंडळात संधी देण्याचा नवा फंडा समोर आणला आहे. 

नांदेड लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊनही दोनवेळा भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपसह महायुतीच्या मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांची गोची झाली आहे. महाविकास आघाडीतील बिघाडीनंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले आणि नांदेडला आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या माध्यमातून भरभरून निधी मिळाला. तसेच माजी खासदार हेमंत पाटील यांची विधान परिषदेवर वर्णी लागली. त्याचबरोबर भाजपनेदेखील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेवर घेतले. पहिल्यांदाच एका जिल्ह्यातून दोघांना राज्यसभेवर संधी मिळाल्याचे उदाहरण नांदेडात पाहायला मिळाले. 

केंद्रातील भाजप आणि राज्यातील शिंदेसेनेने नांदेडला भरभरून दिले. त्या बदल्यात नांदेडकरांसह शेजारच्या हिंगोली जिल्ह्याने संपूर्णपणे महायुतीला कौल देत नांदेडमधील नऊ आणि हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांवर महायुतीचा झेंडा फडकवला. परंतु, दोन्ही जिल्ह्यांचा लोकसभा निवडणुकीतील परफाॅर्मन्स धक्कादायक राहिला. विशेष म्हणजे नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लागल्यानंतर मागील चुका आणि उणिवा भरून काढण्याची संधी येथील नेत्यांना मिळाली होती. मात्र, भाजपचा पुन्हा निसटता पराभव झाला. प्रत्येक गोष्टीत नियोजन करणारा, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत बूथ अन् कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बांधणीवर जोर देत शिस्त बाळगणारा पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांना पोस्टल मतदानाचे गणित जुळविता आले नाही आणि भाजपच्या डॉ. संतुकराव हंबर्डे यांचा निसटता पराभव झाला. त्याचा परिणाम आता नांदेडला केंद्रात अन् राज्यात मंत्रिपद देण्यावर होऊ शकतो, अशी भीती नांदेड जिल्ह्यातील नेत्यांना आहे.

विधानसभा अन् लोकसभेत मतदानात फरकलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीतील आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेसला लीड होती, तर पुन्हा विधानसभेसोबत लोकसभा पोटनिवडणूक झाली. त्यातही मतदानात फरक पडला आहे. काही मतदारसंघांत महायुतीच्या विधानसभेच्या उमेदवाराला मतदारांनी साथ दिली. पण, लोकसभेच्या उमेदवाराला सोडले. त्यामुळे आमदाराला अधिक मते अन् भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारास कमी मते मिळाली. हा संबंधित उमेदवाराचा परफाॅर्मन्स पकडला जाणार आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघात लोकसभेला घटलेली लीड आता संबंधित आमदाराच्या मंत्रिपदाच्या स्वप्नात अडसर ठरू शकते. त्याचबरोबर मागील अडीच वर्षांत महायुतीचा धर्म पाळत घटक पक्षांना दिलेला मान-सन्मानही रिपाेर्ट कार्डमध्ये द्यावा लागणार आहे.

अंतर्गत गटबाजी पोहोचू शकते दिल्लीतभाजपमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. त्यात भाजपच्या आजी-माजी खासदारांचेही फारसे जुळले नाही. तसेच माजी खासदार आणि भाजपच्या विद्यमान आमदारांमधील मतभेद जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यातूनच एकमेकांच्या कार्यक्रमांना एकमेकांना न बोलावणे अन् बॅनरवर केवळ आपल्याच समर्थकांचे फोटो झळकावणे. आता हे सर्व अंतर्गत कलह आणि गटबाजी थेट दिल्लीपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वत:चे अस्तित्व तयार करून पक्ष आणि पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांपेक्षा आपणच मोठा म्हणून घेणाऱ्या आमदारांचा मंत्रिपदाच्या रेसमधून आपोआपच पत्ता कट होईल, असे बोलले जात आहे.

टॅग्स :Nandedनांदेडmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४