शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
4
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
5
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
6
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
7
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
8
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
9
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
10
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
11
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
12
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
13
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
14
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
15
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
16
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
17
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
18
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
19
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
20
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांची कोंडी करण्याची रणनीती; विरोधकांसह मित्र पक्षांचीही घेराबंदी

By शिवराज बिचेवार | Updated: November 13, 2025 18:47 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून खासदार अशोक चव्हाण विरुद्ध सर्व असाच सामना सध्या तरी पहावयास मिळत आहे.

- शिवराज बिचेवार

नांदेड : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या. त्यानंतर आपुसकच जिल्ह्यातील भाजपाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे गेले. परंतु त्यानंतर महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चव्हाणांनाच आपला क्रमांक एकच शत्रू ठरवित आरोपांची राळ उठविली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, उबाठा अन् वंचित बहुजन आघाडीच्या तर चव्हाण अगोदरपासूनच निशाण्यावर आहेत. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून चव्हाण विरुद्ध सर्व असाच सामना सध्या तरी पहावयास मिळत आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक गळ्यात गळे घालून लढलेल्या महायुतीत मात्र त्यानंतर मिठाचा खडा पडला. शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर यांनी अशोकराव चव्हाणांवर सडकून टीका केली. तर अनेक वर्षांचे राजकीय वैर संपवून भाजपात मांडीला मांडी लावून बसलेले प्रतापराव चिखलीकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार झाल्यानंतर त्यांनी ही शत्रुत्व अजून संपले नसल्याचे दाखवित चव्हाणांवर टीकेची एकही संधी सोडली नाही. दोन्ही मित्र पक्षातील नेत्यांकडून विखारी टीका होत असताना चव्हाणांनी मात्र संयमीपणे त्यांचे आरोप खोडून काढले. तर दुसरीकडे काँग्रेसनेही चव्हाणांविरोधात वेगळी आघाडी उघडून आरोपांचा माराच सुरूच ठेवला होता. परंतु त्याची धार काहीशी बोथट होती.

एकीकडे युतीची भाषा तर दुसरीकडे विखारी टीकाआता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचे घोडे अडलेले आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रतापराव चिखलीकर हे युती करण्यास आमची तयारी असल्याचे सांगत असले तरी, त्याच वेळी ते चव्हाण हे जिल्ह्यासाठी व्हिलन असल्याचे विखारी टीकाही करीत आहेत. त्या तुलनेत भाजपाकडून मात्र राज्यात युती असल्यामुळे संयम बाळगण्याचे मवाळ प्रतिउत्तर दिल्या गेल्या.

घेराबंदी करण्याचा प्रयत्नमहायुतीतील नेत्यांमध्ये असे घमासान सुरू असताना आता काँग्रेसने वंचितशी आघाडी केली आहे. आणखी काही मित्र पक्ष जोडण्याची काँग्रेसची तयारी आहे. त्यासाठी सेक्यूलर मतांचे विभाजन होऊ नये असा दावा केला जात आहे. त्यामुळे युती असो की आघाडी सगळीकडूनच खासदार चव्हाणांची घेराबंदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला किती यश मिळते अन् चव्हाण पुन्हा एकदा सर्वांना पुरून उरतात काय हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेडElectionनिवडणूक 2024BJPभाजपाShiv Senaशिवसेना