शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मद्यनिर्मितीसाठी होणारा पाणीउपसा थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:46 IST

येथे झालेल्या पाणीटंचाई आराखडा निवारण बैठकीत बोअर अधिग्रहण, नवीन बोअर या मागणीबरोबर शेळगाव (ध) येथील मत्स्यव्यवसायासाठी व मद्यनिर्मिती करणा-या कंपनीला दररोज होत असलेल्या लाखो लिटर पाणी पुरवठ्यास विरोध करण्यात आला़ पाणीटंचाईच्या काळात दारूची निर्मिती होत असलेल्या कंपनीला पाणीपुरवठा कशासाठी ? हा प्रश बैठकीत चांगलाच गाजला.

ठळक मुद्देधर्माबादेत आराखडा बैठक पाणीटंचाईचे संकट उभे असताना मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीला पाणीपुरवठा

धर्माबाद : येथे झालेल्या पाणीटंचाई आराखडा निवारण बैठकीत बोअर अधिग्रहण, नवीन बोअर या मागणीबरोबर शेळगाव (ध) येथील मत्स्यव्यवसायासाठी व मद्यनिर्मिती करणा-या कंपनीला दररोज होत असलेल्या लाखो लिटर पाणी पुरवठ्यास विरोध करण्यात आला़ पाणीटंचाईच्या काळात दारूची निर्मिती होत असलेल्या कंपनीला पाणीपुरवठा कशासाठी ? हा प्रश बैठकीत चांगलाच गाजला.आ.वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई निवारण बैठक ६ डिसेंबर रोजी नगरपालिका सभागृहात पार पडली़ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बैठकीत तालुक्यातील सर्व गावांतील पाणीटंचाईच्या समस्या सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रतिनिधींनी मांडल्या़पावसाचे प्रमाण तीन, चार वर्षांपासून कमी झाल्याने गोदावरी पात्रात कमी साठा होत आहे. भविष्यात पाणीटंचाईचे संकट उभे असताना व्यावसायिकांना गोदावरी नदीपात्रातून पाणी का दिले जाते ? जनावरांचा व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असताना हे प्रशासनास दिसत नाही काय? पहिल्यांदा पिण्यासाठी पाणी की दारूसाठी ? असा प्रश्न मनूर येथील सरपंच एकनाथ जिंकले यांनी उपस्थित केला़ शिवराज गाडीवान यांनी मत्स्यव्यवसायाला होणारा पाणीपुरवठा थांबवावा, अशी मागणी केली़धर्माबाद तालुक्यात पाटबंधारे विभाग उमरीअंतर्गत होत असलेले स्वजल, पेयजल पाणीपुरवठ्याचे कामे दहा- दहा वर्षांपासून अर्धवट आहेत़ तर काही बंद अवस्थेत आहेत. लाखो रुपये खर्च करून योजना कुचकामी ठरली आहे ; पण उमरी येथील पाटबंधारे विभाग काहीच लक्ष देत नाही. दरवर्षी प्रत्येक पाणीटंचाई आराखडा बैठकीत अनेक तक्रारी केल्या जातात़ त्यावरसुद्धा बैठकीत गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, असा आरोप सरपंचांनी बैठकीत केला़बन्नाळीचे सरपंच साईनाथ पाटील यांनी पेयजल योजनेची टाकी पाडण्याची विनंती केली़ पाणी पुरवठ्याचे शेख युसूफभाई हे निष्क्रिय अधिकारी असून प्रत्येक बैठकीत उडवाउडवीची उत्तरे देतात. ते कोणतेच कामे करत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला़ पंचायत समितीचे सदस्य सदस्य मारोती कागेरू यांनी शेख युसूफभाई यांच्या कामकाजावर आक्षेप घेतला़ युसूफभाई यांची तालुक्यातून बदली केली तरच पाणीपुरवठ्याची कामे योग्य होतील, असा संताप सदस्यांनी व्यक्त केला. बहुतांश सरपंचांनी पाणी पुरवठा व वीजवितरणबद्दल तक्रारी केल्या़ गेल्यावर्षीच्या पाणीटंचाई आराखडा बैठकीतील समस्या सोडविल्या जात नाही़ पाणीटंचाई आराखडा बैठक केवळ नावालाच असल्याचे अनेक सरपंचांनी नाराजी व्यक्त केली.बैठकीस आ. वसंतराव चव्हाण यांच्यासह तहसीलदार ज्योती चौहाण गटविकास आधिकारी मोहन जाधव, नगर परिषद धर्माबादचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, अब्दुल सत्तार शेठ, जिल्हा परीषदचे कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आकाश रेड्डी, पंचायत समीतीचे सभापती रत्नमाला जयराम पाटील, उपसभापती चंद्रकांत वाघमारे, मारोती कागेरू, नागोराव पाटील रोशनगावकर, दत्ताहारी पाटील चोळाखेकर, प्रा़ रवींद्र मुपडे, संजय मिरजकर आदींसह सर्व गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्तया भागात वारंवार डीपी जळत असून वीज वितरण विभागाकडून वेळेवर डीपी दिल्या जात नाही़ त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेकांची पिके करपून जात आहेत़ दिवस, रात्र विजेचा लपंडाव सुरू राहत असून अनेक गावे अंधारात राहत आहेत़ वीज नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत़ वीज वितरणचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत़ डीपीची मागणी केल्यानंतर त्यास प्रतिसाद देत नाहीत. धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत वीज नसल्याने डिजिटल धडे देणे बंद आहे. त्यामुळे डिजिटल शाळा कशासाठी ? असा प्रश्न बाचेगावचे उत्तमराव पाटील बाचेगावकर यांनी उपस्थित केला. सभापती दत्तात्रय रेड्डी यांनी यावेळी आपले विचार मांडले.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई