शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नांदेड जिल्ह्यातील उस्मान नगरमध्ये दगडफेक, रास्ता रोको; समाजकंटकांच्या अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 11:44 IST

आंदोलकांनी आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत महामार्गावर ठिय्या दिला आहे.

नांदेड: कंधार तालुक्यातील उस्मान नगर येथे पंधरा दिवसात दुसऱ्यांदा महात्मा बसेवश्वर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी असलेल्या बॅनरवरील फोटोची विटंबना करण्यात आली. त्यामुळे सकाळपासून गावात तणाव असून रस्त्यावर टायर जाळून वाहतूक अडविण्यात आली आहे. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले असून दगडफेक ही करण्यात आली आहे. 

आरोपींना तात्काळ अटक करून पोलीस निरीक्षक यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी केली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्याशी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. दरम्यान, आंदोलकांनी आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत महामार्गावर ठिय्या दिला आहे.

पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असतानाही पाच वेळेस समाजकंटकांनी फोटोची विटंबना केल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करत आंदोलकांनी पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आरोपींना अटक झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड