शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

स्पेशल रेल्वे रूळावर, पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST

नांदेड : कोरोनामुळे मागील दहा महिन्यांपासून बंद असलेल्या रेल्वे अद्याप सुरू झाल्या नाहीत. मात्र, काही विशेष रेल्वेगाड्या चालू करून ...

नांदेड : कोरोनामुळे मागील दहा महिन्यांपासून बंद असलेल्या रेल्वे अद्याप सुरू झाल्या नाहीत. मात्र, काही विशेष रेल्वेगाड्या चालू करून प्रवाशांची सोय केली आहे. मात्र, या प्रवासासाठी त्यांना दुप्पट दाम द्यावा लागत आहे. त्यामुळे लाॅकडाऊनमुळे आर्थिक गणित कोलमडलेल्या नागरिकांच्या खिशाला अधिकच झळ बसत आहे.

देशभरातील दळणवळणाचे एकमेव सोयीचे साधन म्हणून रेल्वे गाडीचा उल्लेख केला जातो. ‘गरिबांची रेल्वे’ म्हणूनही ओळखले जाते. परंतु कोरोना महामारीमुळे देशात मार्च २०२० पासून रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. लाॅकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आल्यानंतरही रेल्वेगाड्या अद्याप पूर्ण क्षमतेने सोडण्यात आल्या नाहीत. बस वाहतूक सुरळीत झाली असली तरी रेल्वेचे सेवा अद्याप सर्वसामान्यांना मिळत नाही. अनेक रेल्वेगाड्या बंद असून काही मोजक्या रेल्वे सुरू करून रेल्वे विभागाने त्याचे प्रवासभाडे वाढविले आहे. त्यामुळे प्रवाशांना हा प्रवास महागडा झाला आहे.

चौकट-

जिल्ह्यातंर्गत पूर्वी प्रवास करताना आम्ही पूर्णा-परळी, आदिलाबाद-पूर्णा या पॅसेंजर गाड्यांनी प्रवास करत होतो. या गाड्याचे तिकीट कमी होते. आणि वेळेप्रमाणे या गाड्यांची सोय होती. मात्र, आता १० महिन्यांपासून सगळे विस्कळीत झाले आहे. पॅसेंजर गाडी सुरू लवकर सुरू करावी- जगन्नाथ लोखंडे, पूर्णा

नांदेड शहरात कामानिमित्त आम्हाला जावे लागते. मात्र, आता कामे खोळंबली असून प्रवास करण्यासाठी रेल्वे मिळत नाहीत तसेच रेल्वेचे भाडेही परवडत नाही. अगोदर आम्ही ४५ रुपयांत नांदेडला येत होतो. आता दीडशे रुपये द्यावे लागतात.

-गणेश पवार, किनवट

चौकट-

नांदेड रेल्वे विभागाने काही ठरावीक विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत. मात्र, नेहमी धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या अद्याप बंदच आहेत. त्यामुळे विशेष गाड्यांचे प्रवास भाडे महागले आहे. नांदेड-किनवट पॅसेंजर गाडीला पूर्वी ४५ रुपये द्यावे लागत असे. मात्र, आता स्पेशल गाडीला १४५ रुपये प्रवास भाडे द्यावे लागत आहे. एकूणच किनवट- नांदेड या अंतरासाठी रेल्वेने तिप्पट दरवाढ केली आहे.त्यामुळे सर्वसामान्यांना हा प्रवास परवडणार नाही. पॅसेंजर गाड्या सोडण्याची मागणी होत आहे.