शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत बांधावर : सोयाबीन, कापूस, फुलशेतीला फटका; तोंडचा हिरावला घास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 07:07 IST

पंधरा दिवसांअगोदर काय होते? आता काय झाले !

गोविंद टेकाळे/ युनूस नदाफ

अर्धापूर/पार्डी (जि़नांदेड) : पंधरा दिवसांअगोदर पिकाची अवस्था शेतकऱ्यांना दिलासा देणारी होती. दृष्ट लागावी, असे पीक होते़ परंतु परतीच्या पावसाने हजेरी लावून पिकांचे वाटोळे केले. पंधरा दिवसांअगोदर काय होते? आता काय होऊन बसले अशी दशा आहे. सोयाबीन, कापूस, फूलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हळदीवर बुरशीसह अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला़ शेतकºयांना खरीप हंगामातील पिकापासून फार मोठी आशा होती़ पिकेही जोमात होती़ खरीप हंगामातील पिकांपासून चार पैसे पदरात पडतील, या पैशातून डोक्यावरील कर्ज कमी होईल, याच पैशातून रबी हंगामातील पिकांसाठी बी- बियाणे खरेदी करता येईल, अशी आशा बाळगून शेतकरी खरिपाची कापणी करीत होता़ परंतु परतीच्या पावसाने शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरले़ आता कोणत्या पिकाच्या सा'ाने जगावे, हा मोठा प्रश्न बळीराजासमोर आहे.

अर्धापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे सोयाबीन कापूस, उडीद, मूग व ज्वारी २६००१ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील़ तालुका कृषी विभागाने सादर केलेल्या नुकसानाच्या प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यात ५६ गावे व एकूण २८००० शेतकरी आहेत. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र २८२७० हेक्टर आहे. त्यापैकी २६००० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. आतापर्यंत १३५०० शेतकºयांचे अर्ज जमा झाले आहेत .अर्धापूर तालुक्यातील दाभडयेथील आत्माराम टेकाळे यांच्याकडे पाच एकर जमीन असून चारएकर जमिनीवर सोयाबीनची पेरणी होती़ सोयाबीनची कापणी सुरू असतानाच पावसाने हाहाकार माजविला़पीकनिहाय एकूण क्षेत्र व बाधित क्षेत्रसोयाबीन - १७४६३ बाधित १५८४३, कापूस १६७३ बाधित १५०५ व इतर ८० बाधित ८०थेंबाथेंबाने जगविलेल्या द्राक्षबागांचा पाऊस झाला वैरीदत्ता पाटील।तासगाव (जि.सांगली) : तासगाव तालुक्यातील सावळजसह परिसरात तीन-चार वर्षांपासून पाऊस नसल्याने दुष्काळाच्या दाहकतेत द्राक्षबागा जगवण्यासाठी टँकरने पाणी घातले. लाखो रुपये खर्च करून पीक छाटणी घेतली. फुटव्यातून दिसणाºया द्राक्षांच्या घडांसोबत, कर्जमुक्तीच्या आशेचा किरण दिसू लागला. मात्र परतीच्या पावसाने थैमान घातल्याने घड कुजून गेले. द्राक्षबागांसाठी दुष्काळी पट्ट्यात पाऊसच वैरी झाला.सावळज गावचे एकूण क्षेत्र ३ हजार १७८ हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे सातशे हेक्टरवर द्राक्षबागा आहेत. सावळजच्या यशवंत पोळ यांची दहा एकर द्राक्षबाग आहे. उन्हाळ्यात बाग जतन करण्यासाठी त्यांनी टँकरने पाणी घातले. त्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपये खर्च केले. सप्टेंबरमध्ये दोन टप्प्यात केलेल्या छाटणीनंतर फुटलेल्या घडांना परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने द्राक्षफळांची कूज झाली. खते, औषधांसाठी जवळपास आठ ते दहा लाख रुपये खर्च केले होते, तेही वाया गेले. या क्षेत्रातून अपेक्षित ३० लाखांचे उत्पन्नही वाया गेले. सावळजच्या प्रत्येक द्राक्ष बागायतदाराची पोळसारखीच अवस्था आहे. अद्याप बागांमध्ये पाणी आहे. त्यामुळे मुळ्या कुजण्याची भीती आहे.पंचनाम्यात नुकसानदिसणार कसे?छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांचे पंचनामे सुरु आहेत. अद्यापही छाटणी न झालेल्या बागांनाही या पावसाचा फटका बसणार आहे. पाऊस जास्त झाल्याने अनेक बागांतून अद्यापही पाणी आहे. त्यामुळे बागांच्या मुळ्यांची वाढ थांबली आहे. शिवाय त्या कुजण्याची भीती आहे. त्यामुळे या नुकसानीचे गणित कशातच होणार नसल्याची खंत शेतकºयांत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसNandedनांदेड