शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सोयाबीनला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 5:28 PM

Rain Hits Nanded महसूल व कृषी विभागाचे पंचनामे जिल्हाभरात अंतिम टप्यात

ठळक मुद्दे जिल्ह्यातील ११२ प्रकल्पांमध्ये ८१ टक्के पाणीसाठाहातातोंडाशी आलेला घास हिरावला

नांदेड :  अतिवृष्ष्टी आणि पुरामुळे ३ लाख ६१ हजार १२८ हेक्टर क्षेत्रातील पीकांना फटका बसला असून, जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत  ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या पिकांमध्ये सर्वाधिक फटका हा सोयाबीनला बसला आहे. 

जिल्ह्यात २ लाख ७३ हजार ३१२ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे नुकसान ३३ टक्क्यांहून अधिक आहे. त्याखालोखाल अतिवृष्टीचा फटका कापूस या दुसरर्या गदी पिकाला बसला आहे. जिल्ह्यात ५७ हजार १९० हेक्टर कापसाचे क्षेत्र बाधित झाले आहे. नायगाव, मुदखेड, किनवट आणि माहूर या तालुक्यात मात्र कापसाचे नुकसान निरंक आहे. ज्वारीचे १४ हजार ३६४.२५ हेक्टर क्षेत्र तर तुरीचे ७ हजार १७६.१५ हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबरच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असले तरी परतीच्या पावसानेही मोठ्या प्रमाणात झोडपले आहे.

याचा फटका काढणीस आलेल्या पिकांना बसला आहे. शेतातील पीक आता पाण्यात उभी आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करून  एकत्रित अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनाने महसूल विभागाला दिले आहेत. त्यामुळे पंचनाम्यांचे काम सुरूच राहिल असेही निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी  यांनी सष्ट केले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात ७ लाख ६२ हजार १५८ हेक्टर क्षेत्रात एकूण पेरणी झाली होती. त्यातील साडेतीन लाखाहून हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका बसला आहे. या नुकसानी पोटी जिल्हा प्रशासनाने २४६ कोटी ३७ लाख २९ हजार २५६ रुपयांची मागणी केली आहे. 

हातातोंडाशी आलेला घास हिरावलाहदगाव तालुक्यातील चाभरा येथे साडेतीन एकर शेतात सोयाबीन पेरले होते. या सोयाबीनमधून अंदाजे सव्वा लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती. सोयाबीनसाठी बियाणे, खते, औषधीसाठी पोटाला चिमटा घेवून २५ ते ३० खर्च करण्यात आला होता. यासाठी पीक कर्जही घेतले होते. आता कर्ज कसे फेडावे ही चिंता आहे. - सुदर्शन कल्याणकरशेतकरी, चाभरा, ता.हदगाव

काढणीचा खर्च अधिकनगदी पीक म्हणून सोयाबीनची चार एकरमध्ये पेरणी केली. यासाठी जवळपास ४० ते ५० हजार रुपये खचर्च झाला. बी-बियाणे, औषधीचा खर्च  उत्पन्नातून भागेल अशी अपेक्षा हेाती. मात्र शेंगा वाळल्यानंतर पाऊस झाला अन् शेतातील उभ्या पीकांना मोड फुटले. आता रब्बीची पेरणी कशी करावी याची चिंता आहे.   - दिगांबर टिपरसे, शेतकरी, बारड, ता.मुदखेड

महसूल व कृषी विभागाचे पंचनामे जिल्हाभरात अंतिम टप्यातकृषी व महसूल विभाग तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत पंचनामे केले जात आहेत. सप्टेंबर अखेरपर्यतचे पंचनामे पूर्ण झाले असून, अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाने खरीप पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरुच आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशा प्रमाणे ऑक्टोबरमधील नुकसानीचेही पंचनामे केले जात असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक आर.बी.चलवदे यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडagricultureशेतीRainपाऊस