शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

दक्षिण नांदेडाला २५ मेपर्यंतचाच जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:46 IST

विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यात अपयशच येत असून वारंवार पथके स्थापन करुनही प्रत्यक्षात पाणी उपसा सुरुच आहे. त्यात महावितरणचे अवैध पाणी उपशाला अप्रत्यक्षरित्या होणाऱ्या सहकार्याचा फटका दक्षिण नांदेडला बसणार आहे. विष्णूपुरीत केवळ ३ दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे.

ठळक मुद्देपथके नावालाच, पाण्याचा उपसा सुरुचमृतसाठा उपलब्ध होण्याबाबतही साशंकता

नांदेड : विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यात अपयशच येत असून वारंवार पथके स्थापन करुनही प्रत्यक्षात पाणी उपसा सुरुच आहे. त्यात महावितरणचे अवैध पाणी उपशाला अप्रत्यक्षरित्या होणाऱ्या सहकार्याचा फटका दक्षिण नांदेडला बसणार आहे. विष्णूपुरीत केवळ ३ दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे.नांदेड शहराला पाणीपुरवठा होणा-या विष्णूपुरी प्रकल्पातील अवैध पाणीउपसा रोखण्याचा विषय आॅक्टोबरपासून चर्चेत आहे. उपाययोजनाही केल्या जात आहेत. पण त्या उपाययोजना यशस्वी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गांधी जयंती दिनी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणला १६ डिसेंबर २०१८ ते जुलै २०१९ पर्यत प्रकल्प परिसरातील बागायतदारांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी २५ एप्रिल रोजी घेतलेल्या बैठकीनंतर झाली. पण त्यातही शेतकºयांनी वेगवेगळ्या क्लुप्त्याद्वारे वीजपुरवठा घेत पाणी उपसा सुरुच ठेवला आहे. केवळ तीन टक्के पाणी उरल्यानंतर प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे.जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता सब्बीनवार, कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, पोफळे आदी अधिकारी मंगळवारी विष्णूपुरी प्रकल्प परिसरात पोहोचले. यावेळी दोनशे ते अडीचशे पंपाद्वारे पाणीउपसा सुरु असल्याचे वास्तव चित्र दिसले. पोलिसांच्या मदतीने या पथकाने विद्युतपंपाचे वायर जप्त करण्याची कारवाई केली. यावेळी गावकºयांनी विरोधही केला. यावेळी पोलीस बंदोबस्त नसल्याने गावक-यांच्या रोषाला अधिका-यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे आता पोलीस बंदोबस्तातच कारवाई केली जाणार आहे.प्रत्यक्षात विष्णूपुरी प्रकल्पातून प्रतिदिन ०.२६ दलघमी पाणी कमी होत आहे. महापालिका केवळ ०.१३ दलघमी पाणी घेत आहे. ०.८ दलघमी पाणी एमआयडीसी, ०.३ दलघमी पाणी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी घेतले जात आहे. उर्वरित ०.१३ दलघमी पाणी कुठे जात आहे, याचा उलगडा मंगळवारी अधिकाºयांना झाला. त्यानंतर आता पुन्हा आहे ते पाणी कसे जतन करायचे यावर मंथन केले जात आहे.राजकीय हस्तक्षेपामुळे दक्षिण नांदेडचा पाणीप्रश्न आता ऐरणीवर आला आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. मृतसाठ्यातून पाणी उपलब्ध न झाल्यास कोणताही पर्याय नाही. त्यामुळे दक्षिण नांदेडकरांना मात्र आता पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.दरम्यान, शहरातील काही भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे़ दोन दिवसापूर्वी तरोडा खू़ भागातील सिद्धांतनगरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता़ त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता़प्रकल्पात गाळ किती यावरच पुढील निर्णयविष्णूपुरीतील जीवंत जलसाठा संपल्यानंतर मृत जलसाठा उचलण्यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. कोटीतीर्थ आणि काळेश्वर येथील विहिरीमध्ये दहा पंपाने पाणी घेतले जाणार आहे. त्यातून जवळपास १५ दिवस पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.मृतसाठ्यातून पाणी घेण्याची तयारी केली जात असताना प्रत्यक्षात मृत जलसाठा किती उपलब्ध होईल, याबाबत आता साशंकता आहे. दोन ते अडीच दलघमी पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात प्रकल्पात गाळ किती आहे, यावरच सर्व काही अवलंबून आहे.आता बैठ्या पथकाद्वारे पाण्याची राखणही परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आता विष्णूपुरी प्रकल्प परिसरात दोन्ही बाजुंच्या आठ गावांमध्ये आता बैठे पथक नेमण्याचे निर्देश दिले आहेत. हे पथक केवळ पाणी कुठे उपसले जात आहे याची माहिती अधिका-यांना देणार आहे.पाणी उपसणा-याविरुद्ध आता थेट फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पथकांच्या स्थापनेची प्रक्रिया महापालिका प्रशासन करीत आहे. या पथकात तीन पोलीस कर्मचारी, ५ मजूर, एक वाहन टेम्पो, वीज वितरण कंपनीचा एक कर्मचारी समाविष्ठ राहणार आहे. या पथकाद्वारे पाणी उपसा थांबेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणelectricityवीजFarmerशेतकरी