शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

सॉफ्ट स्किल्स यशस्वी जीवनाचे सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:48 IST

मानवाला आपल्या जीवनात अनेक संकटांवर मात करून उभे राहावयाचे असेल तर माणूस म्हणून उभे राहण्याचे शास्त्र समजून घ्यावे लागेल. माणसाच्या यशामागे ८५ टक्के वाटा हा सॉफ्ट स्किल्सचा असतो. त्यामुळे प्रत्येकाने हे सॉफ्ट स्किल्स आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी व लेखिका अंजली धानोरकर यांनी केले.

ठळक मुद्देस्वारातीम विद्यापीठ : उपजिल्हाधिकारी धानोरकर यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मानवाला आपल्या जीवनात अनेक संकटांवर मात करून उभे राहावयाचे असेल तर माणूस म्हणून उभे राहण्याचे शास्त्र समजून घ्यावे लागेल. माणसाच्या यशामागे ८५ टक्के वाटा हा सॉफ्ट स्किल्सचा असतो. त्यामुळे प्रत्येकाने हे सॉफ्ट स्किल्स आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी व लेखिका अंजली धानोरकर यांनी केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर उपस्थित होते. तसेच प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षा प्रतीक्षा लोंढे यांची उपस्थिती होती.अध्यक्षीय समारोपात कुलगूरू डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाची मशागत केली पाहिजे. माणूस घडण्याची प्रकिया समजून घेतली पाहिजे. सध्याच्या काळात ग्लोबल निकष महत्त्वाचे आहे.त्यामुळे हे निकष नीटपणे समजून घेऊन पुढे जायला हवे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स किती महत्त्वाचे आहेत, हे आपणास धानोरकरांच्या व्याख्यानातून लक्षात आले आहे. हे स्किल्स आपण आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची अध्यक्षा प्रतीक्षा लोंढे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे सदस्य स्वामी सुरेंद्र यांनी केले. तर आभार गंगाप्रसाद इंगोले यांनी मानले. यावेळी दूरशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. राम जाधव, अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल, सहायक कुलसचिव डॉ. सरिता यन्नावार यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभागातील कर्मचारी संभा कांबळे, सुनील कांबळे, बालाजी शिंदे, दत्ता येवले, प्रवीण राठोड या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद