शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सॉफ्ट स्किल्स यशस्वी जीवनाचे सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:48 IST

मानवाला आपल्या जीवनात अनेक संकटांवर मात करून उभे राहावयाचे असेल तर माणूस म्हणून उभे राहण्याचे शास्त्र समजून घ्यावे लागेल. माणसाच्या यशामागे ८५ टक्के वाटा हा सॉफ्ट स्किल्सचा असतो. त्यामुळे प्रत्येकाने हे सॉफ्ट स्किल्स आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी व लेखिका अंजली धानोरकर यांनी केले.

ठळक मुद्देस्वारातीम विद्यापीठ : उपजिल्हाधिकारी धानोरकर यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मानवाला आपल्या जीवनात अनेक संकटांवर मात करून उभे राहावयाचे असेल तर माणूस म्हणून उभे राहण्याचे शास्त्र समजून घ्यावे लागेल. माणसाच्या यशामागे ८५ टक्के वाटा हा सॉफ्ट स्किल्सचा असतो. त्यामुळे प्रत्येकाने हे सॉफ्ट स्किल्स आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी व लेखिका अंजली धानोरकर यांनी केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर उपस्थित होते. तसेच प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षा प्रतीक्षा लोंढे यांची उपस्थिती होती.अध्यक्षीय समारोपात कुलगूरू डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाची मशागत केली पाहिजे. माणूस घडण्याची प्रकिया समजून घेतली पाहिजे. सध्याच्या काळात ग्लोबल निकष महत्त्वाचे आहे.त्यामुळे हे निकष नीटपणे समजून घेऊन पुढे जायला हवे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स किती महत्त्वाचे आहेत, हे आपणास धानोरकरांच्या व्याख्यानातून लक्षात आले आहे. हे स्किल्स आपण आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची अध्यक्षा प्रतीक्षा लोंढे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे सदस्य स्वामी सुरेंद्र यांनी केले. तर आभार गंगाप्रसाद इंगोले यांनी मानले. यावेळी दूरशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. राम जाधव, अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल, सहायक कुलसचिव डॉ. सरिता यन्नावार यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभागातील कर्मचारी संभा कांबळे, सुनील कांबळे, बालाजी शिंदे, दत्ता येवले, प्रवीण राठोड या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद