शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

मन्याडच्या मातीला संघर्षाचा गंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:35 IST

मन्याड खोºयातील मातीला राजकीय संघर्षाचा गंध आहे. कंधार तालुक्यातील दोघांना स्वातंत्र्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत यश आले. १९७७ मध्ये केशवराव धोंडगे व २०१९ ला प्रताप पा.चिखलीकर यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली.

ठळक मुद्देमन्याड खोऱ्याने दिले दोन खासदारकेशवराव धोंडगेंनंतर प्रताप चिखलीकर

गंगाधर तोगरे।कंधार : मन्याड खोºयातील मातीला राजकीय संघर्षाचा गंध आहे. कंधार तालुक्यातील दोघांना स्वातंत्र्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत यश आले. १९७७ मध्ये केशवराव धोंडगे व २०१९ ला प्रताप पा.चिखलीकर यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, दोघांनीही कॉग्रेसच्या मातब्बर पुढाऱ्यांना पराभूत करण्याची किमया साधली.कंधार तालुक्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक संवर्धनाचा समृद्ध वारसा आहे. तसेच राजकीय संघर्षाने मन्याड खोरे सतत चर्चेत राहत आले आहे. भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी शेकापच्या माध्यमातून कॉग्रेस पक्षाविरोधात सतत संघर्ष केला. मन्याड खोºयात शेकापची मजबूत पकड निर्माण केली. त्यांना भाई गुरूनाथराव कुरुडे यांची साथ लाभली. त्यामुळे केशवरावांनी तीन दशके विधानसभेत या भागाचे प्रतिनिधित्व केले. तत्कालीन मुख्यमंत्री कै.शंकरराव चव्हाण यांच्यासोबत ते राजकीय संघर्ष करत राहिले. १९७७ ला केशवराव धोंडगे यांना नांदेड लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली.तुटपुंजी राजकीय रसद, प्रचाराची अपुरी साधने, वाहनांची वाणवा राहिली. परंतु कार्यकर्ते मात्र स्वखर्चाने पायाला भिंगरी बांधल्यासमान केशवरावांना विजयी करण्यासाठी फिरले. आणि केशवराव कॉग्रेस उमेदवाराविरोधात प्रचंड मतांनी विजयी झाले. हा कंधार तालुक्याला पहिला खासदार व लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान धोंडगे यांच्यामुळे मिळाला. चार दशकानंतर प्रताप पा. चिखलीकर यांच्या रुपाने २०१९ ला दुसºयांदा तालुक्याच्या भूमिपुत्राला संधी मिळाली.प्रताप पा. चिखलीकर यांची राजकीय जडणघडण कॉग्रेस पक्षात सुरूवातीच्या काळात झाली. गावचे सरपंच ते बारूळ, पेठवडज, कलंबर जि.प. सर्कलमधून विजयी होत राजकीय सत्तेत दमदार प्रवेश करत आपली धाडसी नेता अशी ओळख निर्माण केली. कॉग्रेसला बळकट करत असताना विधानसभेची उमेदवारी मागितली. परंतु उमेदवारी नाकारली तरी पक्षाचा आदेश मानत पक्ष उमेदवाराचा प्रचार केला. पुन्हा २००४ साली पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आणि विजयी होऊन राजकीय क्षमता सिद्ध केली.प्रताप पा.चिखलीकर हे एक अजब राजकीय रसायन आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहत काम करत राहिले. तरीही पक्षाने अन्याय केला तर काहीकाळ सहन करायचा.परंतु सतत अन्याय होत राहिला तर समर्थक, कार्यकर्ते यांच्याशी विचारविमर्श करत राजकीय निर्णय घ्यायचा. अशी अफलातून खुबी त्यांची राहत आली. शिवसेनेविरोधात राजकीय मतभेद झाले आणि भाजपाशी राजकीय सलगी वाढवत पक्ष मजबूत करण्यावर भर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मैत्री केली आणि धाडशी निर्णय घेत एकेकाळी असलेल्या मित्राविरोधात लोकसभा निवडणूक रिंगणात उडी घेतली. जिल्ह्यात राजकीय जाळे भक्कम असलेल्या व मॅनेजमेंट गुरू असलेल्या अशोकराव चव्हाण यांचा राजकीय चक्रव्यूह भेदण्याची किमया साधली. राजकीय संघर्ष मन्याड खोºयातला सतत चर्चेत असतो. त्यावर मात करत यशस्वी होणे ही या भागातील नेत्यांची विशेषत: आहे. तालुक्याने लोकसभेत मोठ्या संघर्षाने दोनदा संधी मिळवली. म्हणून मन्याड खोºयाला राजकीय संघर्षाचा गंध आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.विलासरावांच्या जवळीकतेमुळे तिकीट कापलेनिवडून आल्यानंतर कॉग्रेस-रा.कॉ. आघाडी सरकारला पाठिंबा दिला. कंधार-लोहा तालुक्याचा विकास करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांच्याशी जवळीक साधली. परंतु याची मोठी राजकीय किंमत त्यांना पुन्हा २००९ साली कॉग्रेसने उमेदवारी नाकारल्याने चुकवावी लागली.तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी चिखलीकर यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी कोणतीच कसर ठेवली नाही. चिखलीकर पराभूत झाले तरीही ते नव्या उमेदीने कार्यकर्त्याशी, जनतेशी कधी नाळ तुटू दिली नाही.२०१४ साली विधानसभा निवडणुकीत हाती धनुष्यबाण घेत झंझावात निर्माण केला. मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली तरीही चिखलीकरांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९nanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा