शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

परिस्थिती पुढे हतबल; बालशौर्य पुरस्कारप्राप्त नदाफवर मोलमजुरीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 18:53 IST

शिक्षणासाठी लागणारा खर्च झेपत नसल्याने मोलमजुरी करून पैसे जमा करून शिक्षण घेण्याची इच्छा

ठळक मुद्देबाल शौर्य विजेता एजाज नदाफने दहावीत ६० .०० टक्के उत्तीर्ण झाला होता. बारावी उत्तीर्ण झाल्यावर पोलिस किंवा आर्मीत जाण्याची इच्छा आहे

पार्डी : अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथील बाल शौर्य विजेता एजाज नदाफ सध्या मोलमजुरीचे काम करीत आहे. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने शिक्षणासाठी लागणारा खर्च झेपत नसल्याने त्याला यावर्षी १२ वीची परीक्षा सुद्धा देता आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बाल शौर्य विजेता एजाज नदाफच्या घराची परिस्थिती हालाखाची असून आई वडील मोलमजुरी करून एजाज नदाफला शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत परंतु शिक्षणासाठी लागणारा पैसा त्यांच्या झेपत नसल्याने एजाज नदाफने शिक्षण अर्धवट सोडून केळीच्या गाड्या भरण्याचे काम करीत आहे मात्र एजाज नदाफचे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे. परंतु शिक्षणासाठी लागणारा खर्च झेपत नसल्याने मोलमजुरी करून पैसे जमा करून शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे .

बाल शौर्य विजेता एजाज नदाफने दहावीत ६० .०० टक्के उत्तीर्ण झाला होता. नांदेड येथील कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. मात्र नांदेड येथे शिक्षण घेण्यासाठी लागणारा पैसा कमी पडत असल्याने त्याने बारावीला डोगरकडा येथील कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. मात्र त्याला बारावीची परीक्षा देता आली नाही. यामुळे त्याचे एक वर्ष वाया गेले आहे. त्याला पुढील शिक्षणासाठी पैशाची व मार्गदर्शनाची गरज आहे.

पार्डी ( म ) येथील गावाच्या शेजारी वाहणाऱ्या नदीतील बंधाऱ्यात चार महिला कपडे धुण्यासाठी गेल्या असता एक महिला पाय घसरून पडली असता तिला वाचविण्यासाठी दुसऱ्या मुलींनी पाण्यात उडी मारली मात्र तीही पाण्यात बुडत असताना तिसऱ्या मुलींनी आरडाओरडा केल्याने एजाज नदाफ यांनी जिवाची पर्वा न करता दोन मुलीचा जावं वाचविला होता. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०१८ रोजी  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

पोलीस किंवा सैन्यात जाण्याची इच्छाबारावी उत्तीर्ण झाल्यावर पोलिस किंवा आर्मीत जाण्याची तयारी आहे यासाठी बारावी उत्तीर्ण होण्याची गरज आहे मात्र नांदेड येथे शिक्षणासाठी जास्त पैसे लागत असल्याने कला शाखेत प्रवेश घेतला आहे बारावी पास झाल्यावर पोलीस किंवा आमीर्ची तयारी करणार आहे़           - बाल शौर्य पुरस्कार एजाज नदाफ

टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थी