शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’त पवार, ठाकरे होणार सहभागी; ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 07:53 IST

७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात आगमन, दोन शहरांत जाहीर सभा

नांदेड : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात देगलूर येथून दाखल होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आदी सहभागी होणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

कन्याकुमारीपासून निघालेली ही ‘भारत जोडाे’ यात्रा तेलंगणात पोहोचली आहे. यात्रेच्या महाराष्ट्रातील कार्यक्रमाची माहिती देताना चव्हाण यांनी सांगितले की, यात्रेत सहभागी होण्यासाठी शरद पवार हे ८ नोव्हेंबर राेजी नांदेडात मुक्कामी असतील आणि ९ नोव्हेंबर रोजी ते नायगाव येथून यात्रेत सहभागी होतील. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी सहभागी होणार आहेत. 

नांदेड जिल्ह्यात १२० किलोमीटरचा प्रवास

भारत जोडो यात्रेचे आगमन देगलूर तालुक्यातून होणार आहे. सर्वाधिक १२० किलोमीटरचे अंतर नांदेड जिल्ह्यात असेल. देगलूर, शंकरनगर, कृष्णूर, जवाहरनगर तुप्पा, नांदेड, अर्धापूर असे सहा दिवस यात्रा नांदेडात मुक्कामी राहणार आहे. 

‘धर्मांधता, जातीयवाद थांबविण्यासाठी यात्रा’

ही ‘भारत जोडो’ यात्रा देशातील वाढती धर्मांधता, जातीयवाद रोखण्यासाठी आहे. १७, १८ व १९ नोव्हेंबर असे तीन दिवस राज्यात सर्वच जिल्हा शाखांनी वातावरण निर्मितीसाठी पदयात्रा, प्रभातफेरी आयोजित केली आहे, असे माजी मुख्यमंत्री व या यात्रेचे राज्यातील समन्वयक पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

या जिल्ह्यांतून जाणार यात्रा

नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे. नांदेड आणि शेगाव येथे राहुल गांधी यांची जाहीर सभादेखील होणार असल्याचे चव्हाण म्हणाले. त्यानंतर ही यात्रा मध्य प्रदेशकडे रवाना होईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस